शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा सापळा अनुभवायचाय... औरंगाबादच्या बीड बायपासवर जा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 14:57 IST

अविरत  वर्दळीचा बीड  बायपास सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत जड वाहनांनी व्यापला जातो.  

ठळक मुद्देधोकादायक अन् जीव गुदमरविणाऱ्या १२ किलोमीटर कार प्रवासासाठी लागले ५३  मिनिटेबायपासवर प्रवेश खुला होताच जडवाहनचालक लहान वाहनाकरिता राखीव असलेल्या लेनवर अतिक्रमण करतात आणि प्रवास करतात.

- बापू सोळुंके

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा अनुभवायचा असेल, तर औरंगाबादच्या बीड बायपासवर एकदा जाऊनच या. बेफाम  जाणारी जड वाहने व त्यांच्या कचाट्यातून मार्ग काढणारे दुचाकीस्वार व पादचारी, असे चित्र येथे दररोजच पाहावयास मिळते. अनेक जण या रस्त्यावरून नेहमीच जीवघेणा प्रवास करीत आहेत. वाहनांच्या या गर्दीतून  सामान्य माणसाला केवळ १२ किलोमीटरचा रस्ता पार करण्यास तब्बल एक तास वेळ वाया घालवावा लागत आहे. भीतीयुक्त आणि त्रस्त झालेले वाहनचालकांचे चेहरे आणि वाहनचालकांची कसरत ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आली. 

अविरत  वर्दळीचा बीड  बायपास सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत जड वाहनांनी व्यापला जातो.  बीड बायपासच्या दोन्ही बाजूंना नागरी वसाहती वाढत आहेत. बायपास परिसर, देवळाई, सातारा गाव आणि परिसरातील लाखो नागरिकांना बायपास ओलांडून शहरात ये-जा करावी लागते. बायपासवर गतवर्षी सतत प्राणांतिक अपघात व्हायचे. यामुळे बायपासवरील जड वाहनांना सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत प्रवेश मनाई करण्यात आली आहे. बीड, जालन्याकडून येणारी जडवाहने ७ ते  सकाळी ११ पर्यंत  झाल्टा फाट्याजवळ, तर धुळे, नगरकडून येणारी जड वाहने पैठण लिंक रोडजवळ रोखली जातात. ११ वाजता वाहनांना बायपासवर प्रवेश दिला जातो तेव्हा जडवाहनचालकांची  जीवघेणी स्पर्धा सुरू होते. ही स्पर्धा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते. 

१२ किलोमीटर पार करण्यास लागली ५३ मिनिटेबुधवारी सकाळी ११.२९  वाजता महानुभाव आश्रम चौकीपासून झाल्टा फाट्याच्या दिशेने कार प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा बायपासवर जडवाहनांनी ताबा घेतल्याचे दिसून आले. या प्रवासादरम्यान महूनगर टी-पॉइंट, बजाज रुग्णालय, एमआयटी चौक, वखार महामंडळासमोर, गोदावरी टी-पॉइंट, सातारा पोलीस ठाण्याचा दुभाजक कट, रेणुकामाता मंदिर, आयप्पामंदिर दुभाजक कट, देवळाई चौक,  नाईकनगर दुभाजक कट आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. जडवाहनांच्या रांगेमधून कारला पुढे जाण्यासाठी रस्ता देत नव्हती. परिणामी, काही ठिकाणी बायपासलगतच्या कच्चा रस्त्यावरून कार न्यावी लागली. झाल्टा  फाट्यापर्यंत जाण्यासाठी १२.२२ तब्बल ५३  मिनिटे लागली, तर झाल्टा फाट्यापासून महानुभाव आश्रमपर्यंत ५९ मिनिटे लागली. 

जडवाहनचालक पाळत नाहीत नियम बायपासवर प्रवेश खुला होताच जडवाहनचालक लहान वाहनाकरिता राखीव असलेल्या लेनवर अतिक्रमण करतात आणि प्रवास करतात. डाव्या लेनवर जडवाहन आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. मात्र, वाहनांची संख्या अधिक असल्याने पोलिसांना वाहतूक नियमन करताना कारवाईकरिता वेळ देता येत नाही. शिवाय बायपासवर साईन बोड नसल्याचा फटकाही बसतो. यामुळे या रस्त्यावरील जडवाहनांना सकाळपासून प्रवेश दिल्यास जडवाहनांची स्पर्धा कमी होऊ शकते.

रात्रीचा प्रवास महाभयंकरबायपासवर रात्री ९ नंतर जडवाहतूक सुरू होते. तेव्हा छोट्या वाहनाने बायपासवरून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असते. ट्रकचालक सर्व रस्ता व्यापतात आणि कार असो वा दुचाकीला ते रस्ता देत नाहीत. असा एकदा अनुभव आल्यापासून बायपासवरील हॉटेल आणि ढाब्यावर जेवणासाठी गेल्यावर रात्री ९ वाजेपूर्वीच जेवण आटोपून   घरी परततो. -महेंद्र घोडेले, व्यावसायिक

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी