शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मृत्यूचा सापळा अनुभवायचाय... औरंगाबादच्या बीड बायपासवर जा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 14:57 IST

अविरत  वर्दळीचा बीड  बायपास सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत जड वाहनांनी व्यापला जातो.  

ठळक मुद्देधोकादायक अन् जीव गुदमरविणाऱ्या १२ किलोमीटर कार प्रवासासाठी लागले ५३  मिनिटेबायपासवर प्रवेश खुला होताच जडवाहनचालक लहान वाहनाकरिता राखीव असलेल्या लेनवर अतिक्रमण करतात आणि प्रवास करतात.

- बापू सोळुंके

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा अनुभवायचा असेल, तर औरंगाबादच्या बीड बायपासवर एकदा जाऊनच या. बेफाम  जाणारी जड वाहने व त्यांच्या कचाट्यातून मार्ग काढणारे दुचाकीस्वार व पादचारी, असे चित्र येथे दररोजच पाहावयास मिळते. अनेक जण या रस्त्यावरून नेहमीच जीवघेणा प्रवास करीत आहेत. वाहनांच्या या गर्दीतून  सामान्य माणसाला केवळ १२ किलोमीटरचा रस्ता पार करण्यास तब्बल एक तास वेळ वाया घालवावा लागत आहे. भीतीयुक्त आणि त्रस्त झालेले वाहनचालकांचे चेहरे आणि वाहनचालकांची कसरत ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आली. 

अविरत  वर्दळीचा बीड  बायपास सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत जड वाहनांनी व्यापला जातो.  बीड बायपासच्या दोन्ही बाजूंना नागरी वसाहती वाढत आहेत. बायपास परिसर, देवळाई, सातारा गाव आणि परिसरातील लाखो नागरिकांना बायपास ओलांडून शहरात ये-जा करावी लागते. बायपासवर गतवर्षी सतत प्राणांतिक अपघात व्हायचे. यामुळे बायपासवरील जड वाहनांना सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत प्रवेश मनाई करण्यात आली आहे. बीड, जालन्याकडून येणारी जडवाहने ७ ते  सकाळी ११ पर्यंत  झाल्टा फाट्याजवळ, तर धुळे, नगरकडून येणारी जड वाहने पैठण लिंक रोडजवळ रोखली जातात. ११ वाजता वाहनांना बायपासवर प्रवेश दिला जातो तेव्हा जडवाहनचालकांची  जीवघेणी स्पर्धा सुरू होते. ही स्पर्धा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते. 

१२ किलोमीटर पार करण्यास लागली ५३ मिनिटेबुधवारी सकाळी ११.२९  वाजता महानुभाव आश्रम चौकीपासून झाल्टा फाट्याच्या दिशेने कार प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा बायपासवर जडवाहनांनी ताबा घेतल्याचे दिसून आले. या प्रवासादरम्यान महूनगर टी-पॉइंट, बजाज रुग्णालय, एमआयटी चौक, वखार महामंडळासमोर, गोदावरी टी-पॉइंट, सातारा पोलीस ठाण्याचा दुभाजक कट, रेणुकामाता मंदिर, आयप्पामंदिर दुभाजक कट, देवळाई चौक,  नाईकनगर दुभाजक कट आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. जडवाहनांच्या रांगेमधून कारला पुढे जाण्यासाठी रस्ता देत नव्हती. परिणामी, काही ठिकाणी बायपासलगतच्या कच्चा रस्त्यावरून कार न्यावी लागली. झाल्टा  फाट्यापर्यंत जाण्यासाठी १२.२२ तब्बल ५३  मिनिटे लागली, तर झाल्टा फाट्यापासून महानुभाव आश्रमपर्यंत ५९ मिनिटे लागली. 

जडवाहनचालक पाळत नाहीत नियम बायपासवर प्रवेश खुला होताच जडवाहनचालक लहान वाहनाकरिता राखीव असलेल्या लेनवर अतिक्रमण करतात आणि प्रवास करतात. डाव्या लेनवर जडवाहन आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. मात्र, वाहनांची संख्या अधिक असल्याने पोलिसांना वाहतूक नियमन करताना कारवाईकरिता वेळ देता येत नाही. शिवाय बायपासवर साईन बोड नसल्याचा फटकाही बसतो. यामुळे या रस्त्यावरील जडवाहनांना सकाळपासून प्रवेश दिल्यास जडवाहनांची स्पर्धा कमी होऊ शकते.

रात्रीचा प्रवास महाभयंकरबायपासवर रात्री ९ नंतर जडवाहतूक सुरू होते. तेव्हा छोट्या वाहनाने बायपासवरून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असते. ट्रकचालक सर्व रस्ता व्यापतात आणि कार असो वा दुचाकीला ते रस्ता देत नाहीत. असा एकदा अनुभव आल्यापासून बायपासवरील हॉटेल आणि ढाब्यावर जेवणासाठी गेल्यावर रात्री ९ वाजेपूर्वीच जेवण आटोपून   घरी परततो. -महेंद्र घोडेले, व्यावसायिक

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी