शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

मृत्यूचा सापळा अनुभवायचाय... औरंगाबादच्या बीड बायपासवर जा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 14:57 IST

अविरत  वर्दळीचा बीड  बायपास सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत जड वाहनांनी व्यापला जातो.  

ठळक मुद्देधोकादायक अन् जीव गुदमरविणाऱ्या १२ किलोमीटर कार प्रवासासाठी लागले ५३  मिनिटेबायपासवर प्रवेश खुला होताच जडवाहनचालक लहान वाहनाकरिता राखीव असलेल्या लेनवर अतिक्रमण करतात आणि प्रवास करतात.

- बापू सोळुंके

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा अनुभवायचा असेल, तर औरंगाबादच्या बीड बायपासवर एकदा जाऊनच या. बेफाम  जाणारी जड वाहने व त्यांच्या कचाट्यातून मार्ग काढणारे दुचाकीस्वार व पादचारी, असे चित्र येथे दररोजच पाहावयास मिळते. अनेक जण या रस्त्यावरून नेहमीच जीवघेणा प्रवास करीत आहेत. वाहनांच्या या गर्दीतून  सामान्य माणसाला केवळ १२ किलोमीटरचा रस्ता पार करण्यास तब्बल एक तास वेळ वाया घालवावा लागत आहे. भीतीयुक्त आणि त्रस्त झालेले वाहनचालकांचे चेहरे आणि वाहनचालकांची कसरत ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आली. 

अविरत  वर्दळीचा बीड  बायपास सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत जड वाहनांनी व्यापला जातो.  बीड बायपासच्या दोन्ही बाजूंना नागरी वसाहती वाढत आहेत. बायपास परिसर, देवळाई, सातारा गाव आणि परिसरातील लाखो नागरिकांना बायपास ओलांडून शहरात ये-जा करावी लागते. बायपासवर गतवर्षी सतत प्राणांतिक अपघात व्हायचे. यामुळे बायपासवरील जड वाहनांना सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत प्रवेश मनाई करण्यात आली आहे. बीड, जालन्याकडून येणारी जडवाहने ७ ते  सकाळी ११ पर्यंत  झाल्टा फाट्याजवळ, तर धुळे, नगरकडून येणारी जड वाहने पैठण लिंक रोडजवळ रोखली जातात. ११ वाजता वाहनांना बायपासवर प्रवेश दिला जातो तेव्हा जडवाहनचालकांची  जीवघेणी स्पर्धा सुरू होते. ही स्पर्धा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते. 

१२ किलोमीटर पार करण्यास लागली ५३ मिनिटेबुधवारी सकाळी ११.२९  वाजता महानुभाव आश्रम चौकीपासून झाल्टा फाट्याच्या दिशेने कार प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा बायपासवर जडवाहनांनी ताबा घेतल्याचे दिसून आले. या प्रवासादरम्यान महूनगर टी-पॉइंट, बजाज रुग्णालय, एमआयटी चौक, वखार महामंडळासमोर, गोदावरी टी-पॉइंट, सातारा पोलीस ठाण्याचा दुभाजक कट, रेणुकामाता मंदिर, आयप्पामंदिर दुभाजक कट, देवळाई चौक,  नाईकनगर दुभाजक कट आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. जडवाहनांच्या रांगेमधून कारला पुढे जाण्यासाठी रस्ता देत नव्हती. परिणामी, काही ठिकाणी बायपासलगतच्या कच्चा रस्त्यावरून कार न्यावी लागली. झाल्टा  फाट्यापर्यंत जाण्यासाठी १२.२२ तब्बल ५३  मिनिटे लागली, तर झाल्टा फाट्यापासून महानुभाव आश्रमपर्यंत ५९ मिनिटे लागली. 

जडवाहनचालक पाळत नाहीत नियम बायपासवर प्रवेश खुला होताच जडवाहनचालक लहान वाहनाकरिता राखीव असलेल्या लेनवर अतिक्रमण करतात आणि प्रवास करतात. डाव्या लेनवर जडवाहन आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. मात्र, वाहनांची संख्या अधिक असल्याने पोलिसांना वाहतूक नियमन करताना कारवाईकरिता वेळ देता येत नाही. शिवाय बायपासवर साईन बोड नसल्याचा फटकाही बसतो. यामुळे या रस्त्यावरील जडवाहनांना सकाळपासून प्रवेश दिल्यास जडवाहनांची स्पर्धा कमी होऊ शकते.

रात्रीचा प्रवास महाभयंकरबायपासवर रात्री ९ नंतर जडवाहतूक सुरू होते. तेव्हा छोट्या वाहनाने बायपासवरून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असते. ट्रकचालक सर्व रस्ता व्यापतात आणि कार असो वा दुचाकीला ते रस्ता देत नाहीत. असा एकदा अनुभव आल्यापासून बायपासवरील हॉटेल आणि ढाब्यावर जेवणासाठी गेल्यावर रात्री ९ वाजेपूर्वीच जेवण आटोपून   घरी परततो. -महेंद्र घोडेले, व्यावसायिक

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी