शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला १० वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:54 IST

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या दहा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...

ठळक मुद्दे टँकरवरच भिस्त : समांतर जलवाहिनीनंतर पाणी देण्याचे मनपाचे अजब उत्तर

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या दहा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्राधिकरणाने पाण्यासाठी महापालिके कडे ४ इंच जलवाहिनी जोडणीची मागणी केली; परंतु समांतर जलवाहिनीनंतरच पाणी देणे शक्य असल्याचे अजब उत्तर मनपाने दिले आहे. परिणामी विमानतळ टँकरवर अवलंबून असून त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.विमानतळाला सध्या पुरवठा होणारे पाणी अपुरे पडत आहे. दररोज सुमारे २५ हजार लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे प्राधिकरणाकडून वारंवार महापालिकेकडे ४ इंची जलवाहिनीची जोडणी देण्याची मागणी केली जात आहे. विमानतळावर शुक्रवारी झालेल्या बैठकीतही संचालक डी.जी. साळवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विभागीय आयुक्तांनी पाणी देण्याची सूचना केली आहे. दहा वर्षांपासून मागणी करीत आहोत. तरीही पाण्याचा प्रश्न काही केल्या सुटत नाही. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे.टँकरच्या पाण्यामुळे विमानतळावर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. पाणी कडू लागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांतून होत आहे, असे असतानाही समांतर जलवाहिनी झाल्याशिवाय पाणी देणार नसल्याचे पत्र देण्यात आल्याचे डी.जी. साळवे यांनी बैठकीत सांगितले. बैठकीत उपस्थित महापालिकेच्या अधिकाºयांनीही समांतरनंतरच पाणी देता येईल, याचा पुनरुच्चार केला. कोट्यवधींचा कर घेऊनही मनपा विमानतळाला पाणी देण्याची खबरदारी घेत नसल्याचे दिसते.‘मिनी घाटी’ला हवे जादा पाणीचिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ४ इंचाची जोडणी आहे. सध्या केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरूआहे. त्यामुळे मनपाकडून देण्यात येणारे पाणी पुरेसे ठरत आहे; परंतु येथे आंतररुग्ण विभाग सुरूकेला जाणार आहे. हा विभाग सुरूझाल्यानंतर अधिक पाणी लागणार आहे. त्यासाठी सिडकोतील पाण्याच्या जलकुंभावरून थेट रुग्णालयासाठी जलवाहिनी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलवाहिनीसाठीची फाईल शासनाक डे गेली आहे. निधी मंजूर झाल्यानंतर जलवाहिनीचे काम होईल,असे जिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.‘आयपीडी’नंतर अडचणजिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरूआहे. त्यामुळे आजघडीला पाणी पुरेसे ठरत आहे. रुग्णालयात आंतररुग्ण विभाग सुरूझाल्यानंतर मात्र पाण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागेल.-एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईairplaneविमान