शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला १० वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:54 IST

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या दहा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...

ठळक मुद्दे टँकरवरच भिस्त : समांतर जलवाहिनीनंतर पाणी देण्याचे मनपाचे अजब उत्तर

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या दहा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्राधिकरणाने पाण्यासाठी महापालिके कडे ४ इंच जलवाहिनी जोडणीची मागणी केली; परंतु समांतर जलवाहिनीनंतरच पाणी देणे शक्य असल्याचे अजब उत्तर मनपाने दिले आहे. परिणामी विमानतळ टँकरवर अवलंबून असून त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.विमानतळाला सध्या पुरवठा होणारे पाणी अपुरे पडत आहे. दररोज सुमारे २५ हजार लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे प्राधिकरणाकडून वारंवार महापालिकेकडे ४ इंची जलवाहिनीची जोडणी देण्याची मागणी केली जात आहे. विमानतळावर शुक्रवारी झालेल्या बैठकीतही संचालक डी.जी. साळवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विभागीय आयुक्तांनी पाणी देण्याची सूचना केली आहे. दहा वर्षांपासून मागणी करीत आहोत. तरीही पाण्याचा प्रश्न काही केल्या सुटत नाही. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे.टँकरच्या पाण्यामुळे विमानतळावर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. पाणी कडू लागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांतून होत आहे, असे असतानाही समांतर जलवाहिनी झाल्याशिवाय पाणी देणार नसल्याचे पत्र देण्यात आल्याचे डी.जी. साळवे यांनी बैठकीत सांगितले. बैठकीत उपस्थित महापालिकेच्या अधिकाºयांनीही समांतरनंतरच पाणी देता येईल, याचा पुनरुच्चार केला. कोट्यवधींचा कर घेऊनही मनपा विमानतळाला पाणी देण्याची खबरदारी घेत नसल्याचे दिसते.‘मिनी घाटी’ला हवे जादा पाणीचिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ४ इंचाची जोडणी आहे. सध्या केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरूआहे. त्यामुळे मनपाकडून देण्यात येणारे पाणी पुरेसे ठरत आहे; परंतु येथे आंतररुग्ण विभाग सुरूकेला जाणार आहे. हा विभाग सुरूझाल्यानंतर अधिक पाणी लागणार आहे. त्यासाठी सिडकोतील पाण्याच्या जलकुंभावरून थेट रुग्णालयासाठी जलवाहिनी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलवाहिनीसाठीची फाईल शासनाक डे गेली आहे. निधी मंजूर झाल्यानंतर जलवाहिनीचे काम होईल,असे जिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.‘आयपीडी’नंतर अडचणजिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरूआहे. त्यामुळे आजघडीला पाणी पुरेसे ठरत आहे. रुग्णालयात आंतररुग्ण विभाग सुरूझाल्यानंतर मात्र पाण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागेल.-एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईairplaneविमान