शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला १० वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:54 IST

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या दहा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...

ठळक मुद्दे टँकरवरच भिस्त : समांतर जलवाहिनीनंतर पाणी देण्याचे मनपाचे अजब उत्तर

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या दहा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्राधिकरणाने पाण्यासाठी महापालिके कडे ४ इंच जलवाहिनी जोडणीची मागणी केली; परंतु समांतर जलवाहिनीनंतरच पाणी देणे शक्य असल्याचे अजब उत्तर मनपाने दिले आहे. परिणामी विमानतळ टँकरवर अवलंबून असून त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.विमानतळाला सध्या पुरवठा होणारे पाणी अपुरे पडत आहे. दररोज सुमारे २५ हजार लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे प्राधिकरणाकडून वारंवार महापालिकेकडे ४ इंची जलवाहिनीची जोडणी देण्याची मागणी केली जात आहे. विमानतळावर शुक्रवारी झालेल्या बैठकीतही संचालक डी.जी. साळवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विभागीय आयुक्तांनी पाणी देण्याची सूचना केली आहे. दहा वर्षांपासून मागणी करीत आहोत. तरीही पाण्याचा प्रश्न काही केल्या सुटत नाही. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे.टँकरच्या पाण्यामुळे विमानतळावर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. पाणी कडू लागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांतून होत आहे, असे असतानाही समांतर जलवाहिनी झाल्याशिवाय पाणी देणार नसल्याचे पत्र देण्यात आल्याचे डी.जी. साळवे यांनी बैठकीत सांगितले. बैठकीत उपस्थित महापालिकेच्या अधिकाºयांनीही समांतरनंतरच पाणी देता येईल, याचा पुनरुच्चार केला. कोट्यवधींचा कर घेऊनही मनपा विमानतळाला पाणी देण्याची खबरदारी घेत नसल्याचे दिसते.‘मिनी घाटी’ला हवे जादा पाणीचिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ४ इंचाची जोडणी आहे. सध्या केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरूआहे. त्यामुळे मनपाकडून देण्यात येणारे पाणी पुरेसे ठरत आहे; परंतु येथे आंतररुग्ण विभाग सुरूकेला जाणार आहे. हा विभाग सुरूझाल्यानंतर अधिक पाणी लागणार आहे. त्यासाठी सिडकोतील पाण्याच्या जलकुंभावरून थेट रुग्णालयासाठी जलवाहिनी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलवाहिनीसाठीची फाईल शासनाक डे गेली आहे. निधी मंजूर झाल्यानंतर जलवाहिनीचे काम होईल,असे जिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.‘आयपीडी’नंतर अडचणजिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरूआहे. त्यामुळे आजघडीला पाणी पुरेसे ठरत आहे. रुग्णालयात आंतररुग्ण विभाग सुरूझाल्यानंतर मात्र पाण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागेल.-एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईairplaneविमान