शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घागरभर पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३७ गावांमध्ये ठणठणाट

By विजय सरवदे | Updated: April 8, 2024 12:04 IST

चिंता वाढली : वाढत्या उन्हाबरोबरच नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

छत्रपती संभाजीनगर : मागील पावसाळ्यात वरुणराजा रुसल्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. सद्यस्थितीत २८९ गावे आणि ४८ वाड्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत असून जिल्हा परिषदेच्या ४४३ टँकरद्वारे तेथील नागरिकांची तहान भागविली जात आहे. एप्रिल महिन्यात सुरुवातीचेच असे भीषण चित्र असेल, तर मे व जूनमध्ये काय स्थिती राहील, याचा यावरून अंदाज यावा.

पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पाण्याचे अनेक स्रोत आटले आहेत. परिणामी, ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. नागरिकांना मोलमजुरी सोडून घागरभर पाण्यासाठी टँकरच्या प्रतीक्षेत दिवसभर बसावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावे आणि ४८ वाड्या अशा एकूण ३३७ गावांसाठी ४४३ टँकरच्या दोन खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्या जिल्ह्यातील ९ पैकी खुलताबाद व सोयगाव या दोन तालुक्यांत पाणीटंचाई फारसा परिणाम जाणवत नाही. सध्या तरी या दोन्ही तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. मात्र, उर्वरित सातही तालुक्यांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामध्ये गंगापूर तालुक्यातील सर्वाधिक गावे, तर सर्वाधिक कमी कन्नड तालुक्यातील गावे तहानलेली आहेत. गंगापूर तालुक्यातील ७० गावे, पैठण तालुका- ६२, छत्रपती संभाजीनगर तालुका- ५९, वैजापूर तालुका- ५७, फुलंब्री-४०, सिल्लोड- ३७ आणि कन्नड तालुक्यातील १२ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढलीवाढत्या उन्हाबरोबर आता पाणीटंचाईही वाढत आहे. भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालवत गेल्यामुळे नद्यांसह ओढे- नाले, मध्यम, लघु प्रकल्प, विहिरी, हापसे कोरडी पडली आहेत. काही ठिकाणी विहिरींना थोडे पाणी आहे, अशा टंचाईग्रस्त गावांतील २२६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याच अधिग्रहीत विहिरींचे पाणी टँकरद्वारे ३३७ गावांना पुरविले जात आहे.

अडीच महिने कसे काढणार?एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच नागरिकांना पाणीटंचाईच्या भीषण वास्तवाला सामोरे जावे लागत असेल, तर पुढील अडीच महिने कसे काढावेत, अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे. माणसांनाच पिण्याच्या पाण्याचे वांधे असेल, तर जनावरांचे काय हाल होतील. शासनाने जनावरांसाठीही पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीने आता जोर धरला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका