शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

घागरभर पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३७ गावांमध्ये ठणठणाट

By विजय सरवदे | Updated: April 8, 2024 12:04 IST

चिंता वाढली : वाढत्या उन्हाबरोबरच नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

छत्रपती संभाजीनगर : मागील पावसाळ्यात वरुणराजा रुसल्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. सद्यस्थितीत २८९ गावे आणि ४८ वाड्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत असून जिल्हा परिषदेच्या ४४३ टँकरद्वारे तेथील नागरिकांची तहान भागविली जात आहे. एप्रिल महिन्यात सुरुवातीचेच असे भीषण चित्र असेल, तर मे व जूनमध्ये काय स्थिती राहील, याचा यावरून अंदाज यावा.

पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पाण्याचे अनेक स्रोत आटले आहेत. परिणामी, ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. नागरिकांना मोलमजुरी सोडून घागरभर पाण्यासाठी टँकरच्या प्रतीक्षेत दिवसभर बसावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावे आणि ४८ वाड्या अशा एकूण ३३७ गावांसाठी ४४३ टँकरच्या दोन खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्या जिल्ह्यातील ९ पैकी खुलताबाद व सोयगाव या दोन तालुक्यांत पाणीटंचाई फारसा परिणाम जाणवत नाही. सध्या तरी या दोन्ही तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. मात्र, उर्वरित सातही तालुक्यांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामध्ये गंगापूर तालुक्यातील सर्वाधिक गावे, तर सर्वाधिक कमी कन्नड तालुक्यातील गावे तहानलेली आहेत. गंगापूर तालुक्यातील ७० गावे, पैठण तालुका- ६२, छत्रपती संभाजीनगर तालुका- ५९, वैजापूर तालुका- ५७, फुलंब्री-४०, सिल्लोड- ३७ आणि कन्नड तालुक्यातील १२ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढलीवाढत्या उन्हाबरोबर आता पाणीटंचाईही वाढत आहे. भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालवत गेल्यामुळे नद्यांसह ओढे- नाले, मध्यम, लघु प्रकल्प, विहिरी, हापसे कोरडी पडली आहेत. काही ठिकाणी विहिरींना थोडे पाणी आहे, अशा टंचाईग्रस्त गावांतील २२६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याच अधिग्रहीत विहिरींचे पाणी टँकरद्वारे ३३७ गावांना पुरविले जात आहे.

अडीच महिने कसे काढणार?एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच नागरिकांना पाणीटंचाईच्या भीषण वास्तवाला सामोरे जावे लागत असेल, तर पुढील अडीच महिने कसे काढावेत, अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे. माणसांनाच पिण्याच्या पाण्याचे वांधे असेल, तर जनावरांचे काय हाल होतील. शासनाने जनावरांसाठीही पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीने आता जोर धरला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका