शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

घागरभर पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३७ गावांमध्ये ठणठणाट

By विजय सरवदे | Updated: April 8, 2024 12:04 IST

चिंता वाढली : वाढत्या उन्हाबरोबरच नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

छत्रपती संभाजीनगर : मागील पावसाळ्यात वरुणराजा रुसल्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. सद्यस्थितीत २८९ गावे आणि ४८ वाड्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत असून जिल्हा परिषदेच्या ४४३ टँकरद्वारे तेथील नागरिकांची तहान भागविली जात आहे. एप्रिल महिन्यात सुरुवातीचेच असे भीषण चित्र असेल, तर मे व जूनमध्ये काय स्थिती राहील, याचा यावरून अंदाज यावा.

पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पाण्याचे अनेक स्रोत आटले आहेत. परिणामी, ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. नागरिकांना मोलमजुरी सोडून घागरभर पाण्यासाठी टँकरच्या प्रतीक्षेत दिवसभर बसावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावे आणि ४८ वाड्या अशा एकूण ३३७ गावांसाठी ४४३ टँकरच्या दोन खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्या जिल्ह्यातील ९ पैकी खुलताबाद व सोयगाव या दोन तालुक्यांत पाणीटंचाई फारसा परिणाम जाणवत नाही. सध्या तरी या दोन्ही तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. मात्र, उर्वरित सातही तालुक्यांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामध्ये गंगापूर तालुक्यातील सर्वाधिक गावे, तर सर्वाधिक कमी कन्नड तालुक्यातील गावे तहानलेली आहेत. गंगापूर तालुक्यातील ७० गावे, पैठण तालुका- ६२, छत्रपती संभाजीनगर तालुका- ५९, वैजापूर तालुका- ५७, फुलंब्री-४०, सिल्लोड- ३७ आणि कन्नड तालुक्यातील १२ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढलीवाढत्या उन्हाबरोबर आता पाणीटंचाईही वाढत आहे. भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालवत गेल्यामुळे नद्यांसह ओढे- नाले, मध्यम, लघु प्रकल्प, विहिरी, हापसे कोरडी पडली आहेत. काही ठिकाणी विहिरींना थोडे पाणी आहे, अशा टंचाईग्रस्त गावांतील २२६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याच अधिग्रहीत विहिरींचे पाणी टँकरद्वारे ३३७ गावांना पुरविले जात आहे.

अडीच महिने कसे काढणार?एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच नागरिकांना पाणीटंचाईच्या भीषण वास्तवाला सामोरे जावे लागत असेल, तर पुढील अडीच महिने कसे काढावेत, अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे. माणसांनाच पिण्याच्या पाण्याचे वांधे असेल, तर जनावरांचे काय हाल होतील. शासनाने जनावरांसाठीही पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीने आता जोर धरला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका