शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; किशनचंद तनवाणींची पालकमंत्र्यांकडे जबाबदारी देण्याबाबत विचारणा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 13:01 IST

Kishanchand Tanwani : शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांना आता कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले जात नाही. तनवाणी पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले की त्यांना भेटतात

ठळक मुद्देपालकमंत्री आल्यावर भेटीअंती ते प्रत्येक वेळी जबाबदारी मिळणार असे सांगत आहेत. ती जबाबदारी काय असेल, दोन वर्षांपासून जबाबदारी कशात अडकली आहे

औरंगाबाद: भाजपातून शिवसेनेत आलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी ( Kishanchand Tanwani ) यांना भाजपा ( BJP ) सोडणे चांगलेच महागात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेने ( Shiv Sena ) त्यांना पक्षात प्रवेश तर दिला; मात्र दोन वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी न देताच ताटकळत ठेवले आहे. ( Kishanchand Tanwani's question about giving responsibility to Guardian Minister Subhash Desai ) ?

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांना आता कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले जात नाही. तनवाणी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) शहरात आले की त्यांना भेटतात, काही जबाबदारी देता की नाही, याची विचारणा करतात. देसाईही त्यांचा रोष थोपविण्यासाठी हो म्हणून उत्तर देतात. दोन दिवसांपूर्वी देसाई शहरात आले असताना देसाईंकडून तनवाणी यांना ‘जबाबदारी दिली जाईल’, असे उत्तर मिळाल्याचे समजते. असा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असल्याने तनवाणी हताश झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

तनवाणी यांना महापालिकेच्या निवडणुका घोषित होतील या पार्श्वभूमीवर शिवसेनेत घेतले. १० ते १२ वॉर्डांवर त्यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांचा विचार केला गेला. परंतु कोरोनामुळे एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका दीड वर्षांपासून लांबल्या आहेत. त्यामुळे पक्षातील संघटनात्मक फेरबदलही केले गेले नाहीत. तनवाणी यांना शिवसेनेत घेताना महानगरप्रमुखपद देण्याबाबत ठरल्याची चर्चा आहे. परंतु त्या पदावरही त्यांना नियुक्ती दिली गेली नाही. मात्र त्यांना महानगरप्रमुखपद नको असल्याचे मध्यंतरी बोलले गेले. मागील वर्षी किमान पक्ष कार्यक्रमाचे निरोप तनवाणी यांच्यापर्यंत दिले जात होते. आता गटबाजीमुळे त्यांना निरोपही बंद झाले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीपेक्षा भाजपा बरे होेते, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे.

मनपाच्या निवडणुकांची वाट पाहत आहेतपालकमंत्री आल्यावर भेटीअंती ते प्रत्येक वेळी जबाबदारी मिळणार असे सांगत आहेत. परंतु ती जबाबदारी काय असेल, दोन वर्षांपासून जबाबदारी कशात अडकली आहे हे काही तनवाणी यांना समजण्यास तयार नाही. दोन ते चार वेळा मुंबई वाऱ्या केल्या, परंतु तेथेही काही हाती न लागल्यामुळे तनवाणींसह त्यांचे समर्थक आत्मचिंतन करीत असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या निवडणुका केव्हा लागतात, याची तनवाणी व समर्थक वाट पाहू लागले आहेत. दरम्यान, याप्रकरणी तनवाणी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यासंदर्भात बोलणे टाळले.

टॅग्स :Kishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीSubhash Desaiसुभाष देसाईShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद