शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

दोन वर्षांपासून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; किशनचंद तनवाणींची पालकमंत्र्यांकडे जबाबदारी देण्याबाबत विचारणा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 13:01 IST

Kishanchand Tanwani : शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांना आता कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले जात नाही. तनवाणी पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले की त्यांना भेटतात

ठळक मुद्देपालकमंत्री आल्यावर भेटीअंती ते प्रत्येक वेळी जबाबदारी मिळणार असे सांगत आहेत. ती जबाबदारी काय असेल, दोन वर्षांपासून जबाबदारी कशात अडकली आहे

औरंगाबाद: भाजपातून शिवसेनेत आलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी ( Kishanchand Tanwani ) यांना भाजपा ( BJP ) सोडणे चांगलेच महागात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेने ( Shiv Sena ) त्यांना पक्षात प्रवेश तर दिला; मात्र दोन वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी न देताच ताटकळत ठेवले आहे. ( Kishanchand Tanwani's question about giving responsibility to Guardian Minister Subhash Desai ) ?

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांना आता कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले जात नाही. तनवाणी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) शहरात आले की त्यांना भेटतात, काही जबाबदारी देता की नाही, याची विचारणा करतात. देसाईही त्यांचा रोष थोपविण्यासाठी हो म्हणून उत्तर देतात. दोन दिवसांपूर्वी देसाई शहरात आले असताना देसाईंकडून तनवाणी यांना ‘जबाबदारी दिली जाईल’, असे उत्तर मिळाल्याचे समजते. असा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असल्याने तनवाणी हताश झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

तनवाणी यांना महापालिकेच्या निवडणुका घोषित होतील या पार्श्वभूमीवर शिवसेनेत घेतले. १० ते १२ वॉर्डांवर त्यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांचा विचार केला गेला. परंतु कोरोनामुळे एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका दीड वर्षांपासून लांबल्या आहेत. त्यामुळे पक्षातील संघटनात्मक फेरबदलही केले गेले नाहीत. तनवाणी यांना शिवसेनेत घेताना महानगरप्रमुखपद देण्याबाबत ठरल्याची चर्चा आहे. परंतु त्या पदावरही त्यांना नियुक्ती दिली गेली नाही. मात्र त्यांना महानगरप्रमुखपद नको असल्याचे मध्यंतरी बोलले गेले. मागील वर्षी किमान पक्ष कार्यक्रमाचे निरोप तनवाणी यांच्यापर्यंत दिले जात होते. आता गटबाजीमुळे त्यांना निरोपही बंद झाले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीपेक्षा भाजपा बरे होेते, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे.

मनपाच्या निवडणुकांची वाट पाहत आहेतपालकमंत्री आल्यावर भेटीअंती ते प्रत्येक वेळी जबाबदारी मिळणार असे सांगत आहेत. परंतु ती जबाबदारी काय असेल, दोन वर्षांपासून जबाबदारी कशात अडकली आहे हे काही तनवाणी यांना समजण्यास तयार नाही. दोन ते चार वेळा मुंबई वाऱ्या केल्या, परंतु तेथेही काही हाती न लागल्यामुळे तनवाणींसह त्यांचे समर्थक आत्मचिंतन करीत असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या निवडणुका केव्हा लागतात, याची तनवाणी व समर्थक वाट पाहू लागले आहेत. दरम्यान, याप्रकरणी तनवाणी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यासंदर्भात बोलणे टाळले.

टॅग्स :Kishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीSubhash Desaiसुभाष देसाईShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद