शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; किशनचंद तनवाणींची पालकमंत्र्यांकडे जबाबदारी देण्याबाबत विचारणा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 13:01 IST

Kishanchand Tanwani : शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांना आता कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले जात नाही. तनवाणी पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले की त्यांना भेटतात

ठळक मुद्देपालकमंत्री आल्यावर भेटीअंती ते प्रत्येक वेळी जबाबदारी मिळणार असे सांगत आहेत. ती जबाबदारी काय असेल, दोन वर्षांपासून जबाबदारी कशात अडकली आहे

औरंगाबाद: भाजपातून शिवसेनेत आलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी ( Kishanchand Tanwani ) यांना भाजपा ( BJP ) सोडणे चांगलेच महागात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेने ( Shiv Sena ) त्यांना पक्षात प्रवेश तर दिला; मात्र दोन वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी न देताच ताटकळत ठेवले आहे. ( Kishanchand Tanwani's question about giving responsibility to Guardian Minister Subhash Desai ) ?

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांना आता कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले जात नाही. तनवाणी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) शहरात आले की त्यांना भेटतात, काही जबाबदारी देता की नाही, याची विचारणा करतात. देसाईही त्यांचा रोष थोपविण्यासाठी हो म्हणून उत्तर देतात. दोन दिवसांपूर्वी देसाई शहरात आले असताना देसाईंकडून तनवाणी यांना ‘जबाबदारी दिली जाईल’, असे उत्तर मिळाल्याचे समजते. असा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असल्याने तनवाणी हताश झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

तनवाणी यांना महापालिकेच्या निवडणुका घोषित होतील या पार्श्वभूमीवर शिवसेनेत घेतले. १० ते १२ वॉर्डांवर त्यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांचा विचार केला गेला. परंतु कोरोनामुळे एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका दीड वर्षांपासून लांबल्या आहेत. त्यामुळे पक्षातील संघटनात्मक फेरबदलही केले गेले नाहीत. तनवाणी यांना शिवसेनेत घेताना महानगरप्रमुखपद देण्याबाबत ठरल्याची चर्चा आहे. परंतु त्या पदावरही त्यांना नियुक्ती दिली गेली नाही. मात्र त्यांना महानगरप्रमुखपद नको असल्याचे मध्यंतरी बोलले गेले. मागील वर्षी किमान पक्ष कार्यक्रमाचे निरोप तनवाणी यांच्यापर्यंत दिले जात होते. आता गटबाजीमुळे त्यांना निरोपही बंद झाले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीपेक्षा भाजपा बरे होेते, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे.

मनपाच्या निवडणुकांची वाट पाहत आहेतपालकमंत्री आल्यावर भेटीअंती ते प्रत्येक वेळी जबाबदारी मिळणार असे सांगत आहेत. परंतु ती जबाबदारी काय असेल, दोन वर्षांपासून जबाबदारी कशात अडकली आहे हे काही तनवाणी यांना समजण्यास तयार नाही. दोन ते चार वेळा मुंबई वाऱ्या केल्या, परंतु तेथेही काही हाती न लागल्यामुळे तनवाणींसह त्यांचे समर्थक आत्मचिंतन करीत असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या निवडणुका केव्हा लागतात, याची तनवाणी व समर्थक वाट पाहू लागले आहेत. दरम्यान, याप्रकरणी तनवाणी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यासंदर्भात बोलणे टाळले.

टॅग्स :Kishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीSubhash Desaiसुभाष देसाईShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद