शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

‘वेट अँड वॉच’ औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:53 IST

Colleges only closed in Aurangabad district विद्यार्थ्यांना सतावते आपल्या भवितव्याची चिंता

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण महाविद्यालये : १५३एकूण विद्यार्थी संख्या : १ लाख ६० हजार

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे तब्बल दहा महिन्यांनंतर इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविद्यालये कधी उघडणार, याकडे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि प्राचार्यांचे लक्ष लागले आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून महाविद्यालये बंदच असून, अद्यापही ती उघडलेली नाहीत. २३ नोव्हेंबरपासून शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले. अलीकडे बऱ्यापैकी कोरोना आटोक्यात आल्यामुळे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शाळाही सुरू झाली. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासनाने अजूनही निर्णय जाहीर केलेला नाही. ‘ऑनलाइन’ क्लासेस घेतले जातात; परंतु त्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. आभासी पद्धतीच्या अध्यापनाचे आकलन नीट होत नाही. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. दुसरीकडे, पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची चांगली समज आहे, असे असताना राज्य शासन महाविद्यालये बंद ठेवून काय साध्य करू इच्छिते, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना सतावत आहे.

मदिरालये, मॉल उघडले; मग कॉलेजेस्‌ का नाहीअलीकडे शासनाने मदिरालये, मॉल उघडले. शाळा सुरू केल्या. मग, महाविद्यालये उघडण्यास काय अडचण आहे. बारावीनंतर पदवी प्रथम वर्ष ते पीएच.डी.पर्यंत शिक्षण बंद आहे. विद्यार्थी आपल्या भवितव्याबाबत चिंतेत आहेत. शासनाने ही बाब गांभीर्याने घेत महाविद्यालये व विद्यापीठातील अध्यापन तात्काळ सुरू केले पाहिजेत.-निकेतन कोठारी, महानगरमंत्री, अ.भा.वि.प.

विमानसेवा सुरू केली. ज्यामुळे कोरोना भारतात आला, ती विमानसेवा सुरू केली. बाजारपेठा उघडल्या, शाळा सुरू केल्या. महाविद्यालयातील शिक्षण बंद का. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनाचा फायदा होत नाही. महाविद्यालये व विद्यापीठ लवकरात लवकर सुरू करावेत; अन्यथा आम्ही महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्यांचे वर्ग घेऊ.- लोकेश कांबळे, जिल्हाध्यक्ष, एसएफआय

आम्ही मानसिक तणावाखालीआमची मनापासून इच्छा आहे, महाविद्यालय आता उघडले पाहिजे. कारण एका वर्षापासून आम्ही घरी बसलेलो आहेत. खूप मानसिक तणावाखाली आम्ही वावरत आहोत. कुटुंबातील लोकही चिंतेत आहेत. आम्हाला भवितव्याबाबतची चिंता सतावत आहे.-आकाश मारकळ (विद्यार्थी, विवेकानंद महाविद्यालय)

आता शासनाने निर्णय घेतला पाहिजेतब्बल ११ महिन्यांपासून विद्यार्थी व महाविद्यालयाचा संपर्क तुटलेला आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धत लाभदायक नाही. सद्य:स्थितीत जनजीवन पूर्वपदावर आले आहे, राज्य सरकारने तात्काळ प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार पुन्हा खुले करून द्यावे.-आंबादास मेव्हणकर (विद्यार्थी) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीSchoolशाळा