शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

‘वेट अँड वॉच’ औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:53 IST

Colleges only closed in Aurangabad district विद्यार्थ्यांना सतावते आपल्या भवितव्याची चिंता

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण महाविद्यालये : १५३एकूण विद्यार्थी संख्या : १ लाख ६० हजार

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे तब्बल दहा महिन्यांनंतर इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविद्यालये कधी उघडणार, याकडे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि प्राचार्यांचे लक्ष लागले आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून महाविद्यालये बंदच असून, अद्यापही ती उघडलेली नाहीत. २३ नोव्हेंबरपासून शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले. अलीकडे बऱ्यापैकी कोरोना आटोक्यात आल्यामुळे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शाळाही सुरू झाली. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासनाने अजूनही निर्णय जाहीर केलेला नाही. ‘ऑनलाइन’ क्लासेस घेतले जातात; परंतु त्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. आभासी पद्धतीच्या अध्यापनाचे आकलन नीट होत नाही. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. दुसरीकडे, पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची चांगली समज आहे, असे असताना राज्य शासन महाविद्यालये बंद ठेवून काय साध्य करू इच्छिते, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना सतावत आहे.

मदिरालये, मॉल उघडले; मग कॉलेजेस्‌ का नाहीअलीकडे शासनाने मदिरालये, मॉल उघडले. शाळा सुरू केल्या. मग, महाविद्यालये उघडण्यास काय अडचण आहे. बारावीनंतर पदवी प्रथम वर्ष ते पीएच.डी.पर्यंत शिक्षण बंद आहे. विद्यार्थी आपल्या भवितव्याबाबत चिंतेत आहेत. शासनाने ही बाब गांभीर्याने घेत महाविद्यालये व विद्यापीठातील अध्यापन तात्काळ सुरू केले पाहिजेत.-निकेतन कोठारी, महानगरमंत्री, अ.भा.वि.प.

विमानसेवा सुरू केली. ज्यामुळे कोरोना भारतात आला, ती विमानसेवा सुरू केली. बाजारपेठा उघडल्या, शाळा सुरू केल्या. महाविद्यालयातील शिक्षण बंद का. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनाचा फायदा होत नाही. महाविद्यालये व विद्यापीठ लवकरात लवकर सुरू करावेत; अन्यथा आम्ही महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्यांचे वर्ग घेऊ.- लोकेश कांबळे, जिल्हाध्यक्ष, एसएफआय

आम्ही मानसिक तणावाखालीआमची मनापासून इच्छा आहे, महाविद्यालय आता उघडले पाहिजे. कारण एका वर्षापासून आम्ही घरी बसलेलो आहेत. खूप मानसिक तणावाखाली आम्ही वावरत आहोत. कुटुंबातील लोकही चिंतेत आहेत. आम्हाला भवितव्याबाबतची चिंता सतावत आहे.-आकाश मारकळ (विद्यार्थी, विवेकानंद महाविद्यालय)

आता शासनाने निर्णय घेतला पाहिजेतब्बल ११ महिन्यांपासून विद्यार्थी व महाविद्यालयाचा संपर्क तुटलेला आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धत लाभदायक नाही. सद्य:स्थितीत जनजीवन पूर्वपदावर आले आहे, राज्य सरकारने तात्काळ प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार पुन्हा खुले करून द्यावे.-आंबादास मेव्हणकर (विद्यार्थी) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीSchoolशाळा