शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

‘वेट अँड वॉच’ औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:53 IST

Colleges only closed in Aurangabad district विद्यार्थ्यांना सतावते आपल्या भवितव्याची चिंता

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण महाविद्यालये : १५३एकूण विद्यार्थी संख्या : १ लाख ६० हजार

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे तब्बल दहा महिन्यांनंतर इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविद्यालये कधी उघडणार, याकडे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि प्राचार्यांचे लक्ष लागले आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून महाविद्यालये बंदच असून, अद्यापही ती उघडलेली नाहीत. २३ नोव्हेंबरपासून शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले. अलीकडे बऱ्यापैकी कोरोना आटोक्यात आल्यामुळे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शाळाही सुरू झाली. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासनाने अजूनही निर्णय जाहीर केलेला नाही. ‘ऑनलाइन’ क्लासेस घेतले जातात; परंतु त्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. आभासी पद्धतीच्या अध्यापनाचे आकलन नीट होत नाही. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. दुसरीकडे, पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची चांगली समज आहे, असे असताना राज्य शासन महाविद्यालये बंद ठेवून काय साध्य करू इच्छिते, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना सतावत आहे.

मदिरालये, मॉल उघडले; मग कॉलेजेस्‌ का नाहीअलीकडे शासनाने मदिरालये, मॉल उघडले. शाळा सुरू केल्या. मग, महाविद्यालये उघडण्यास काय अडचण आहे. बारावीनंतर पदवी प्रथम वर्ष ते पीएच.डी.पर्यंत शिक्षण बंद आहे. विद्यार्थी आपल्या भवितव्याबाबत चिंतेत आहेत. शासनाने ही बाब गांभीर्याने घेत महाविद्यालये व विद्यापीठातील अध्यापन तात्काळ सुरू केले पाहिजेत.-निकेतन कोठारी, महानगरमंत्री, अ.भा.वि.प.

विमानसेवा सुरू केली. ज्यामुळे कोरोना भारतात आला, ती विमानसेवा सुरू केली. बाजारपेठा उघडल्या, शाळा सुरू केल्या. महाविद्यालयातील शिक्षण बंद का. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनाचा फायदा होत नाही. महाविद्यालये व विद्यापीठ लवकरात लवकर सुरू करावेत; अन्यथा आम्ही महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्यांचे वर्ग घेऊ.- लोकेश कांबळे, जिल्हाध्यक्ष, एसएफआय

आम्ही मानसिक तणावाखालीआमची मनापासून इच्छा आहे, महाविद्यालय आता उघडले पाहिजे. कारण एका वर्षापासून आम्ही घरी बसलेलो आहेत. खूप मानसिक तणावाखाली आम्ही वावरत आहोत. कुटुंबातील लोकही चिंतेत आहेत. आम्हाला भवितव्याबाबतची चिंता सतावत आहे.-आकाश मारकळ (विद्यार्थी, विवेकानंद महाविद्यालय)

आता शासनाने निर्णय घेतला पाहिजेतब्बल ११ महिन्यांपासून विद्यार्थी व महाविद्यालयाचा संपर्क तुटलेला आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धत लाभदायक नाही. सद्य:स्थितीत जनजीवन पूर्वपदावर आले आहे, राज्य सरकारने तात्काळ प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार पुन्हा खुले करून द्यावे.-आंबादास मेव्हणकर (विद्यार्थी) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीSchoolशाळा