शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

वडगाववासीयांची पाण्यासाठी भटकंती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:20 PM

पुरेसा निधी उपलब्ध असतानाही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे वर्षभरापासून गावाचा पाणी प्रश्न रेंगाळला आहे.

वाळूज महानगर : पुरेसा निधी उपलब्ध असतानाही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे वर्षभरापासून गावाचा पाणी प्रश्न रेंगाळला आहे. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांना पाणी असूनही भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अनेक वर्षांपासून वडगावात पाण्याची समस्या आहे. पाणीटंचाईमुळे दरवर्षी वर्षातील सहा महिने, तर नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. गावाचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी तत्कालीन सरपंच महेश भोंडवे यांनी एमआयडीसीचे पाणी घेण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसी जलकुंभ ते वडगाव जलकुंभ जवळपास दीड कोटी रुपये खर्चाची पाईपलाईन टाकून एमआयडीसीचे शुद्ध पाणी गावात आणले. त्यानंतर अंतर्गत लोखंडी पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव तयार करून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधीही मंजूर के ला. सदरील कामाची निविदा काढून हे काम वर्षभरापूर्वी एका खाजगी संस्थेला दिले; परंतु ठेकेदार आणि पदाधिकारी यांच्यातील वादात कामाला गती मिळाली नाही. मध्यंतरी ग्रामपंचायतीने सदरील काम रद्द करण्याचा ठराव घेतला.

या कामासाठी नवीन प्रस्ताव तयार करून निविदा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजून ग्रामपंचायतीकडून अंदाजपत्रकच बनविण्याचे काम सुरू आहे. पाण्यासाठी सुरू असलेली ग्रामस्थांची भटकंती कधी थांबेल, असा प्रश्न रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे. याविषयी सरपंच उषा साळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एमआयडीसीकडूनच कमी पाणी येत आहे. वाढीव पाण्यासाठी त्यांना पत्र दिले आहे. लवकरच नवीन निविदा काढून अंतर्गत पाईपलाइचे काम सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई