शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत मतदान नियोजनाचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:47 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेच्या गटातील ३७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यात मतदानासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा फज्जा उडाला.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेच्या गटातील ३७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यात मतदानासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा फज्जा उडाला. उस्मानाबाद उपकेंद्राच्या मतपत्रिका दुपारी दोन वाजेनंतर पोहोचल्या. तर अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठीची योग्य ती काळजी घेतली नसल्याचे समोर आले. या गोंधळातही प्राध्यापकांनी विक्रमी मतदान केले आहे.विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले. यात महाविद्यालयातील शिक्षक गटात १० जागा, विद्यापीठीय शिक्षकांसाठी ३, प्राचार्य- ८ (दोन बिनविरोध), प्राचार्य- ८ (दोन बिनविरोध), संस्थाचालक-४ (दोन बिनविरोध) आणि विद्यापरिषदेसाठी- ७ (एक बिनविरोध) जागांचा समावेश होता. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. हे मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालले. यात प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकांनी हिरीरीने सहभागी होऊन मतदानाच्या आकडेवारीत भर घातली. पहिल्या टप्प्यातील मतदान पात्र-अपात्रेपासून सुरू असलेला गोंधळ मतदान होईपर्यंत कायम राहिला. अनेक मतदान केंद्रांतील अधिकाºयांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नव्हते. ज्या सूचना होत्या त्यातील अनेक सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष केंद्रांवर झालेलीच नसल्याचे स्पष्ट झाले. मतदान केंद्रांवर पाळण्यात येणारे नियम, सूचना, उमेदवारांचे प्रतिनिधी, उमेदवारांचे ओळखपत्र या सर्वांमध्ये प्रत्यक्षात सावळा गोंधळ असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी नेते, मतदार नसलेले लोक मतदान केंद्रात बसून फोन करणे, मतदार मतदानासाठी जात असताना सूचना देण्याचे काम करीत असल्याचेही दिसून आले.या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र त्यांनी अनुपस्थित राहण्यालाच पसंती दिल्याबद्दलही सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतआहे.मतपत्रिका दुपारनंतर पोहोचल्याविद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रातील मतदारांसाठीच्या मतपत्रिका दुपारी दोन वाजेनंतर पोहोचल्या. यानंतर मतदान झाले. या मतपत्रिका घेऊन जाणाºया गाडीत वाटेतच बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. मात्र उपकेंद्रातील मतदान विद्यापीठ विकास मंचला मिळणार नसल्यामुळे जाणीवपूर्वक मतपत्रिकाच पाठविण्यास विद्यापीठ प्रशासनाने कुचराई केल्याचा आरोप उत्कर्षचे उमेदवार कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी केला आहे. तर कायमच उपकेंद्राकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रा. संभाजी भोसले यांनी सांगितले.उमेदवारांना अडवलेविद्यापीठात मतदान संपल्यानंतर मतपेट्या सील करण्यासाठी उमेदवारांच्या सह्या घेतल्या जातात. या सह्या करण्यासाठी उत्कर्षचे उमेदवार कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. राम चव्हाण मतदान केंद्रात जात असताना पोलिसांनी त्यांनाच अडवले. उमेदवार असल्याचे सांगितल्यानंतरही आत सोडण्यात आले नाही. शेवटी बाचाबाची झाल्यानंतर आत सोडण्यात आले. तर याच केंद्रावर काही वेळ मतदारांना लाल शाईचा पेन मतदान करण्यासाठी दिला होता.