शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ऑर्डरचे प्रमाण वाढले; अनेक उद्योगांपुढे आता कुशल मनुष्यबळाचा पेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:56 IST

पुढील काळात कोविडचा संसर्ग आटोक्यात आला, संपूर्णपणे बाजारपेठा उघडल्या, तर साधारणपणे १५ सप्टेंबरपासून उद्योगांची गती वाढेल. 

ठळक मुद्देई-पासची सक्ती उठवली तरच मनुष्यबळाचा प्रश्न सुटेल

औरंगाबाद : दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू आॅर्डरचे प्रमाण वाढत आहे. सध्या ६० ते ७० टक्के उत्पादन क्षमतेने औरंगाबादचे उद्योग सुरू आहेत. १५ सप्टेंबरपासून यात आणखी वाढ अपेक्षित असून, तेव्हा मात्र येथील उद्योगांना कुशल कामगारांची तीव्र टंचाई जाणवणार आहे. 

यासंदर्भात खास ‘लोकमत’शी बोलताना ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, लॉकडॉऊन शिथिल झाल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून कोविड संबंधीच्या नियमांची अंमलबजावणी करीत शासनाने येथील उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, लॉकडाऊनमुळे देश-विदेशातील उद्योग व बाजारपेठा बंद असल्यामुळे आॅर्डरचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. या महिन्यात आॅर्डर मिळण्याचे प्रमाण जवळपास ६० ते ७० टक्क्यांपर्यंत आले आहे. 

यंदा पाऊसपाणी बरा आहे. दसरा-दिवाळीसारखे सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत. तथापि, पुढील काळात कोविडचा संसर्ग आटोक्यात आला, संपूर्णपणे बाजारपेठा उघडल्या, तर साधारणपणे १५ सप्टेंबरपासून उद्योगांची गती वाढेल. आॅर्डरचे प्रमाण वाढेल. तेव्हा मात्र उद्योगांना कुशल मनुष्यबळाची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू शकते. सध्या ई-पासची सक्ती असल्याने परप्रांतीय, तसेच आपल्या राज्यातील कामगार येण्यासाठी धजावत नाहीत. त्यासाठी शासनाने आता ई-पासची सक्ती उठवली पाहिजे. सध्या स्थानिक अकुशल कामगारांच्या माध्यमातून उद्योगांचे काम सुरू आहे; पण हे कामगार मधूनच गायब होतात. यांचे सातत्यपूर्ण काम नसल्यामुळेही अडचणी येत आहेत. 

बँकेचे हप्ते भरण्यासाठी हवी मुदतवाढअभय हंचनाळ म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये उद्योगांची आर्थिक घडी विसकटली आहे. त्यामुळे बँकांनी चार महिन्यांच्या काळातील उद्योगांचे व्याज माफ करावे, अशी उद्योग संघटनांची मागणी आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे, शासनाने बँकेचे हप्ते भरण्यासाठी चार महिन्यांची सूट दिली होती. ती आता संपुष्टात आली असून, एक सप्टेंबरपासून हप्ते भरावे लागणार आहेत. अजूनही उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्यामुळे शासनाने हप्ते भरण्यासाठी आणखी तीन महिने मुदतवाढ दिली पाहिजे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकMIDCएमआयडीसी