शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

औरंगाबाद जिल्ह्याचे ‘व्हिजन-२०२०’ फसले; ‘व्हिजन-२०३०’ची तयारी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:57 IST

१० वर्षांपूर्वी तयार केलेले दस्तावेज झाले कालबाह्य 

ठळक मुद्देशहरासह जिल्ह्यात समस्यांचे डोंगरजिल्ह्याचा कायापालट झालाच नाहीसर्व यंत्रणांनी एकत्रित काम करणे गरजेचे

- विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यासह शहरातील पर्यटन, दळणवळण, नागरी सेवा-सुविधा आणि औद्योगिक क्रांतीमध्ये अग्रेसर करण्यासाठी २०१० मध्ये जिल्हा प्रशासनाने तयार केलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट-२०२०’ राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी रद्दीत जमा झाले आहे. कागदावरच राहिलेल्या या डॉक्युमेंटचा (दस्तावेज) सध्या काहीही विचार होत नसून २०२० साल २० दिवसांवर आले आहे. नागरी सुविधांशी निगडित यंत्रणांनी ‘व्हिजन डॉक्युमेंट-२०२०’चा काहीही विचार न केल्याने आता ‘व्हिजन-२०३०’अशी घोषणा होण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. 

दहा लाख कुशल मनुष्यबळ, अडीच लाखांहून अधिक रोजगार निर्मिती करण्यासोबतच कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून जिल्ह्याचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठरवून तयार करण्यात आलेले ‘व्हिजन-२०२०’ आता कालबाह्य झाले आहे. जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तत्कालीन जिल्हाधिकारी कुणालकुमार यांच्या काळात तयार करण्यात आले होते. त्याचा प्राथमिक आराखडा सेवानिवृत्त सनदी अधिकारी के. बी. भोगे यांच्या काळात समोर आला होता. कुणालकुमार त्यांच्या बदलीनंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी त्याकडे लक्ष दिले, परंतु त्यांच्या बदलीनंतर जिल्हा प्रशासन, महापालिका आयुक्तांना त्या व्हिजनकडे लक्ष देता आले नाही. 

‘व्हिजन-२०२०’ चा मसुदा तयार करण्यासचे काम जिल्हा प्रशासनाने २०१० मध्ये हाती घेतले होते. तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी विविध सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ मंडळी यांच्या मदतीने मसुदा तयार केला होता. जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध क्षेत्रातील १६ तज्ज्ञ, अधिकारी व नागरिकांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली होती. सरकारी यंत्रणा, नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका व कार्यशाळा घेतल्या. सर्वांच्या मतांचा अंतर्भाव डॉक्युमेंटमध्ये करण्यात आला होता. ते व्हिजन जिल्ह्याचे असले तरी त्याचा  फायदा शहर व मनपा हद्दीला होणार होता. शहराची लोकसंख्या सध्या १८ लाखांच्या पुढे सरकली आहे. झालर क्षेत्रातील २८ गावांतही बांधकामे वाढली आहेत. आगामी काळात ही गावे प्राधिकरणाच्या रेट्याखाली येतील. त्यामुळे वाढणाºया लोकसंख्येला सुविधा देण्याची जबाबदारी पालिका व प्राधिकरणावर असणार आहे. यासाठी ‘व्हिजन-२०२०’ डॉक्युमेंट महत्त्वाचे ठरले असते. परंतु त्याकडे मागील १० वर्षांत दुर्दैवाने दुर्लक्ष झाले. 

सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करणे गरजेचे‘व्हिजन-२०२०’ याबाबत मनपा, जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करणे गरजेचे होते. मुळात शहराला अग्रेसर करण्यासाठी मनपाची भूमिका महत्त्वाची असते. व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून पालिका काहीही निर्णय घेत नाही. शहराचा विचार करीत नाही. शहर, जिल्हा विकासासाठी जेव्हा एखादे मॉडेल तयार होते. तेव्हा त्यासाठी अनुदानाची तरतूद करावी लागते. त्यानुसार कामांचे नियोजन झाले तर व्हिजनला ‘दृष्टी’ मिळते, असे मत सेवानिवृत्त सनदी अधिकारी के. बी. भोगे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद