शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

वेरूळ-अजिंठा महोत्सव तूर्तास रद्द;आयोजनासाठी कमी कालावधी असल्याने निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:15 AM

९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान महोत्सवाची संभाव्य तारीख होती. परंतु हा काळ परीक्षांचा आहे. तसेच पर्यटक परतीचा कालखंड आहे. त्यातच आयोजनासाठी अतिशय कमी कालावधी आहे. समिती सदस्यांनी महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. सध्या तारीख निश्चित केली नाही. परंतु आॅक्टोबरमध्ये महोत्सव घेतल्यास यापुढे पुढील तीन वर्षे तोच कालखंड निश्चित केला जाईल. महोत्सवासाठी लागणारा निधी इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्या उभारतील.

ठळक मुद्देप्रशासन : आॅक्टोबरमध्ये महोत्सवाचा मानस

औरंगाबाद : बहुचर्चित वेरूळ-अजिंठा महोत्सव तूर्तास रद्द करण्यात आला असून, आॅक्टोबर २०१८ मध्ये हा महोत्सव घेण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सूतोवाच केले. गुरुवारी ५ इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्यांसोबत आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांचे सादरीकरण पाहिले. तसेच महोत्सव आयोजन समिती सदस्य, जिल्हा प्रशासन, एमटीडीसी, मनपा अधिका-यांशी चर्चा केली. आयुक्त डॉ.भापकर यांनी सांगितले, शासनाकडून मिळणा-या निधीचा काही मुद्दा नाही. ९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान महोत्सवाची संभाव्य तारीख होती. परंतु हा काळ परीक्षांचा आहे. तसेच पर्यटक परतीचा कालखंड आहे. त्यातच आयोजनासाठी अतिशय कमी कालावधी आहे. समिती सदस्यांनी महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. सध्या तारीख निश्चित केली नाही. परंतु आॅक्टोबरमध्ये महोत्सव घेतल्यास यापुढे पुढील तीन वर्षे तोच कालखंड निश्चित केला जाईल. महोत्सवासाठी लागणारा निधी इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्या उभारतील.

जिल्हाधिकारी म्हणाले...महोत्सव आयोजनाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, एमटीडीसीचा हा महोत्सव आहे. पर्यटक येण्यासाठी सप्टेंबर ते फेबु्रवारी हा काळ असतो. फेबु्रवारीमध्ये स्थानिक नागरिकांसाठीच आयोजन केल्यासारखे होईल. विदेशी पर्यटक आल्यास महोत्सवाचे मार्केटिंग जगभर होईल. तसेच जानेवारी ते मार्च हा काळ महसूल प्रशासनासाठी वसुलीचा असतो. विभागीय यंत्रणादेखील महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी तत्पर असते. तर जिल्हा प्रशासनावरही तीच कामे असतात. त्यामुळे चांगले नियोजन करून हा महोत्सव घेण्याचे ठरले आहे.