शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज एमआयडीसीतील तोडफोडीचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नाही : पोलीस आयुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:34 IST

तोडफोड आणि जाळपोळ ही मुद्दामहून वैयक्तीक वादातून कंपन्यांना धडा शिकविण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीमध्ये ९आॅगस्ट रोजी झालेली तोडफोड आणि जाळपोळ ही मुद्दामहून वैयक्तीक वादातून कंपन्यांना धडा शिकविण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या तोडफोडीशी मराठा क्रांती मोर्चाचा संबंध अद्याप दिसून आला नाही, असे  पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  

पोलीस आयुक्त  म्हणाले की,मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी आरक्षणाच्या मागण्यासाठी राज्यस्तरीय बंद पुकारला होता. औरंगाबाद शहरात हा बंद अत्यंत शांततेत पार पडला. आंदोलकांनी केलेल्या सहकार्यामुळे अनेक ठिकाणी दोन समाजात होणारे लहान-मोठ्या तणावाचे प्रसंग टाळता आले. या आंदोलनादरम्यान मात्र वाळूज एमआयडीसी परिसरातील विविध कारखान्यामध्ये काही समाजकंटकांनी तोडफोड, जाळपोळ  केली. एवढेच नाही तर त्यांनी तेथील मालही लुटून नेला.  याप्रकरणी सात गुन्हे नोंदविण्यात आले. या तोडफोडीच्या तपासात आतापर्यंत मात्र मराठा क्रांती मोर्चाचा संबंध आढळून आला नाही.  शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात हे समाजकंटक घुसले. त्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेत ही तोडफोड केल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत ५३ समाजकंटकांना अटकया तोडफोड, जाळपोळप्रकरणी पोलिसांनी आजपर्यंत ५३ जणांना अटक केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले की, विविध कंपन्यांनी दिलेले सीसीटिव्ही फुटेज,पोलीस आणि सामान्य नागरीकांनी आंदोलकाचे मोबाईलवर छायाचित्रण केले, फोटो काढले, त्याआधारे ही कारवाई सुरू आहे. जो तोडफोड करताना आढळला, त्यांनाच अटक केली जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा