शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालगृहाला टाळे; अनाथ मुलींचे मुंबई, राहुरीसह अन्यत्र स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:56 IST

छावणीच्या विद्यादीप बालगृहातून नऊ मुलींनी ३० जून रोजी पलायन केल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले.

छत्रपती संभाजीनगर : मुलींचा छळ व अमानवीय वागणूक दिल्या प्रकरणात विद्यादीप बालगृहाची मान्यता रद्द झाल्यानंतर मुलींना तत्काळ अन्यत्र स्थलांतरित करण्याचे आदेश न्यायालयासह राज्य सरकारने दिले होते. अखेर, गेल्या तीन दिवसांत ७९ मुलींना मुंबई, राहुरीसह शहरातील अन्य बालगृहांत पाठवण्यात आले. ३० जूनच्या मुलींच्या पलायनानंतर अखेर १८ दिवसांनी शुक्रवारी ७० वर्षांपेक्षाही जुने विद्यादीप बालगृह अखेर पोरके झाले.

छावणीच्या विद्यादीप बालगृहातून नऊ मुलींनी ३० जून रोजी पलायन केल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले. विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालगृहाची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले. नऊपैकी एका मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहायक अधीक्षिका वेलरी भगवान जोसेफ, सिस्टर सुचिता भास्कर गायकवाड, केअर टेकर अलका फकीर साळुंके यांना अटक करण्यात आली होती.

बुधवारी औरंगाबाद खंडपीठाने विद्यादीप बालगृहातील मुलींचे स्थलांतर का केले नाही, अशी विचारणा करत केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बाल कल्याण समितीने राज्यभरातील सर्व बालगृहांना पत्र पाठवून रिक्त जागांबाबत विचारणा केली होती. त्यानंतर मुंबईच्या माटुुंग्यातील बालगृहात ११, राहुरीच्या बालगृहात २२ तर अन्य मुलींना शहरातील बालगृहात पाठवण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

साध्या वेशात महिला पोलिस, सुस्थितीत वाहनांचा वापरतीन दिवसांपासून मुलींना हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. साध्या वेशातील महिला पोलिसांच्या बंदोबस्तात वाहनांमधून मुलींचे स्थलांतर करावे, प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी, असे आदेश बाल कल्याण समितीने दिले होते.

शहरात आता एकच संस्थाविद्यादीपची मान्यता रद्द झाल्यानंतर क्रमाने वाळूजमधील एका बालगृहाने स्वत:हून मुलींचा सांभाळ अशक्य असल्याचे सांगून बालगृह बंद करण्यासाठी शासनाला पत्र पाठवले आहे. त्यामुळे शहरात आता केवळ एकच बालगृह राहिले असून त्याची १०० मुलींची क्षमता आहे.

नियम पालन करुन स्थलांतरसर्व निर्देशांचे पालनसंबंधित बालगृहांना सदर मुलींची योग्य काळजी घेण्यासाठी संवाद साधला आहे. तिकडे त्यांचे नियमाप्रमाणे शिक्षण सुरू होईल. नियम, निकर्षांचे पालन करुन मुलींचे स्थलांतर करण्यात आले.- ॲड. आशा शेरखाने-कटके, अध्यक्ष, बाल कल्याण समिती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी