शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालगृहाला टाळे; अनाथ मुलींचे मुंबई, राहुरीसह अन्यत्र स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:56 IST

छावणीच्या विद्यादीप बालगृहातून नऊ मुलींनी ३० जून रोजी पलायन केल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले.

छत्रपती संभाजीनगर : मुलींचा छळ व अमानवीय वागणूक दिल्या प्रकरणात विद्यादीप बालगृहाची मान्यता रद्द झाल्यानंतर मुलींना तत्काळ अन्यत्र स्थलांतरित करण्याचे आदेश न्यायालयासह राज्य सरकारने दिले होते. अखेर, गेल्या तीन दिवसांत ७९ मुलींना मुंबई, राहुरीसह शहरातील अन्य बालगृहांत पाठवण्यात आले. ३० जूनच्या मुलींच्या पलायनानंतर अखेर १८ दिवसांनी शुक्रवारी ७० वर्षांपेक्षाही जुने विद्यादीप बालगृह अखेर पोरके झाले.

छावणीच्या विद्यादीप बालगृहातून नऊ मुलींनी ३० जून रोजी पलायन केल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले. विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालगृहाची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले. नऊपैकी एका मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहायक अधीक्षिका वेलरी भगवान जोसेफ, सिस्टर सुचिता भास्कर गायकवाड, केअर टेकर अलका फकीर साळुंके यांना अटक करण्यात आली होती.

बुधवारी औरंगाबाद खंडपीठाने विद्यादीप बालगृहातील मुलींचे स्थलांतर का केले नाही, अशी विचारणा करत केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बाल कल्याण समितीने राज्यभरातील सर्व बालगृहांना पत्र पाठवून रिक्त जागांबाबत विचारणा केली होती. त्यानंतर मुंबईच्या माटुुंग्यातील बालगृहात ११, राहुरीच्या बालगृहात २२ तर अन्य मुलींना शहरातील बालगृहात पाठवण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

साध्या वेशात महिला पोलिस, सुस्थितीत वाहनांचा वापरतीन दिवसांपासून मुलींना हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. साध्या वेशातील महिला पोलिसांच्या बंदोबस्तात वाहनांमधून मुलींचे स्थलांतर करावे, प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी, असे आदेश बाल कल्याण समितीने दिले होते.

शहरात आता एकच संस्थाविद्यादीपची मान्यता रद्द झाल्यानंतर क्रमाने वाळूजमधील एका बालगृहाने स्वत:हून मुलींचा सांभाळ अशक्य असल्याचे सांगून बालगृह बंद करण्यासाठी शासनाला पत्र पाठवले आहे. त्यामुळे शहरात आता केवळ एकच बालगृह राहिले असून त्याची १०० मुलींची क्षमता आहे.

नियम पालन करुन स्थलांतरसर्व निर्देशांचे पालनसंबंधित बालगृहांना सदर मुलींची योग्य काळजी घेण्यासाठी संवाद साधला आहे. तिकडे त्यांचे नियमाप्रमाणे शिक्षण सुरू होईल. नियम, निकर्षांचे पालन करुन मुलींचे स्थलांतर करण्यात आले.- ॲड. आशा शेरखाने-कटके, अध्यक्ष, बाल कल्याण समिती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी