शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : महायुतीचे ‘ते’ मतदार इगतपुरीच्या ‘विवांत’मध्ये नजरकैदेत ‘निवांत!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:47 IST

अंतर्गत धुसफूस होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ‘मातोश्री’च्या आदेशानुसार ठाणे आणि मुंबई येथील शिवसैनिक त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत.

ठळक मुद्देऔषधांचा बहाणा कोणीही करू नये, यासाठी खासगी आरोग्य पथक

औरंगाबाद/ नाशिक : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेने महायुतीच्या मतदारांना इगतपुरी येथील दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. तळेगाव भागातील विवांत आणि बलायदुरी येथील बोध व्हॅली (पूर्वीचे रेन फॉरेस्ट) या दोन ठिकाणी त्यांना शाही वागणूक दिली जात आहे. अंतर्गत धुसफूस होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ‘मातोश्री’च्या आदेशानुसार ठाणे आणि मुंबई येथील शिवसैनिक त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत. तसेच गोपनीय माहिती मिळविण्यासाठी पोलिसांचे पथकही त्या भागात तैनात आहे. 

महायुतीच्या मतदानासाठी इगतपुरी येथे मतदार आणण्याचे निश्चित झाल्यावर लोकमतचे प्रतिनिधी भास्कर सोनवणे यांनी हॉटेल्सचा शोध घेतला. विवांत आणि बलायदुरी येथील बोध व्हॅलीत मतदार असल्याचे त्यांना आढळून आले. शनिवारी संध्याकाळी शिवसेनेचे मुंंबईतील पदाधिकारी इगतपुरी येथे आढावा घेणार असून, मते पक्की करण्यासाठी अर्थकारणातून मार्ग काढणार आहेत. औषधांचा बहाणा कोणीही करू नये, यासाठी खासगी आरोग्य पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. 

या निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडे ३३०, महाआघाडीकडे २५० तर एमआयएम-अपक्ष मिळून ७७, असे ६५७ मतदारांचा आकडा निवडणुकीसाठी आहे. १५ आॅगस्ट रोजी दुपारी २ वा. जालना रोडवरील एका ठिकाणावरून शहरातील महायुतीच्या मतदारांना इगतपुरीकडे पाठविण्यात आले. फोडाफ ोडीचे राजकारण आणि मतदार विरोधकांच्या प्रलोभनाला बळी पडू नयेत यासाठी महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्यासाठी पूर्ण दक्षता घेतली आहे. तसेच महाआघाडीनेदेखील उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांच्यासाठी मतदारांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे. १८ आॅगस्ट रोजी सकाळी महायुतीचे मतदार शहरात दाखल होतील. तेथून १७ मतदान केंद्रांवर गटनिहाय त्यांना पाठविण्यात येणार आहे. महाआघाडीनेदेखील मतदारांची पूर्ण दक्षता घेतली असून, पसंतीक्रमाचे गणित जुळविल्याचा दावा आघाडीकडून केला जात आहे. तर महायुतीने पहिल्याच पसंतीसाठी पूर्ण तयारी केली आहे. महायुतीचे दुसऱ्या पसंतीचे मतदान कुणालाही जाणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी माजी खा.चंद्रकांत खैरे हे इगतपुरीला महायुतीच्या मतदारांच्या भेटीसाठी जाणार आहेत. 

मागील अनुभवामुळे पारदर्शकता२०१३ साली झालेल्या निवडणुकीत की- चेन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यामुळे यावेळी पारदर्शकतेसाठी काही कडक नियम अंमलात आणले जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेला विशेष पेन मतदारांना देण्यात येईल. तसेच विशेष डिटेक्टरच्या साह्याने मतदारांची तपासणी करून त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाईल. गुप्त कॅमेरा, वाहनांच्या चाव्या, बटनमधील गुप्त कॅमेरा त्यांच्याकडे असल्यास तो जप्त करण्यात येईल. आजवरच्या निवडणुकीतील अनुभवामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

चार वातानुकूलित बसेस, शाही पाहुणचारएमएच १६ पासिंग असणाऱ्या आनंद ट्रॅव्हल्स कंपनीच्या ४ बस हॉटेलच्या बाहेर सज्ज असून, हॉटेल परिसरात इतर चारचाकींसह शिवसेनेचे पक्षचिन्ह अंकित बरीच वाहनेही उभी आहेत. प्रत्येक बसमधील वाहकालाही बसमध्ये सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सगळे नियंत्रित करण्यासाठी विश्वासू व्यक्ती भरपावसात लक्ष ठेवून आहेत. अनेक मतदार परिवारासह या सहलीला आले आहेत. हवा तसा पाहुणचार असूनही घरच्यांमुळे तळीराम मतदारांची अडचण झाली आहे. इगतपुरी भागातील धरणे, धबधबे वगैरे पाहावे म्हणून काही मतदारांचा आग्रह आहे. मात्र नियोजनानुसार हट्ट पूर्ण करता येत नसल्यामुळे अंतर्गत धुसफूस सुरू आहे. निकालानंतर पुन्हा पर्यटनाला येऊ, असे आश्वासन पाहुण्या मतदारांना दिली जात आहे.कोणालाही बाहेर जाऊ न देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदारांनी त्यांना दिलेल्या रूममधून बाहेर पडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादJalanaजालना