शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : महायुतीचे ‘ते’ मतदार इगतपुरीच्या ‘विवांत’मध्ये नजरकैदेत ‘निवांत!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:47 IST

अंतर्गत धुसफूस होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ‘मातोश्री’च्या आदेशानुसार ठाणे आणि मुंबई येथील शिवसैनिक त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत.

ठळक मुद्देऔषधांचा बहाणा कोणीही करू नये, यासाठी खासगी आरोग्य पथक

औरंगाबाद/ नाशिक : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेने महायुतीच्या मतदारांना इगतपुरी येथील दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. तळेगाव भागातील विवांत आणि बलायदुरी येथील बोध व्हॅली (पूर्वीचे रेन फॉरेस्ट) या दोन ठिकाणी त्यांना शाही वागणूक दिली जात आहे. अंतर्गत धुसफूस होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ‘मातोश्री’च्या आदेशानुसार ठाणे आणि मुंबई येथील शिवसैनिक त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत. तसेच गोपनीय माहिती मिळविण्यासाठी पोलिसांचे पथकही त्या भागात तैनात आहे. 

महायुतीच्या मतदानासाठी इगतपुरी येथे मतदार आणण्याचे निश्चित झाल्यावर लोकमतचे प्रतिनिधी भास्कर सोनवणे यांनी हॉटेल्सचा शोध घेतला. विवांत आणि बलायदुरी येथील बोध व्हॅलीत मतदार असल्याचे त्यांना आढळून आले. शनिवारी संध्याकाळी शिवसेनेचे मुंंबईतील पदाधिकारी इगतपुरी येथे आढावा घेणार असून, मते पक्की करण्यासाठी अर्थकारणातून मार्ग काढणार आहेत. औषधांचा बहाणा कोणीही करू नये, यासाठी खासगी आरोग्य पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. 

या निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडे ३३०, महाआघाडीकडे २५० तर एमआयएम-अपक्ष मिळून ७७, असे ६५७ मतदारांचा आकडा निवडणुकीसाठी आहे. १५ आॅगस्ट रोजी दुपारी २ वा. जालना रोडवरील एका ठिकाणावरून शहरातील महायुतीच्या मतदारांना इगतपुरीकडे पाठविण्यात आले. फोडाफ ोडीचे राजकारण आणि मतदार विरोधकांच्या प्रलोभनाला बळी पडू नयेत यासाठी महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्यासाठी पूर्ण दक्षता घेतली आहे. तसेच महाआघाडीनेदेखील उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांच्यासाठी मतदारांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे. १८ आॅगस्ट रोजी सकाळी महायुतीचे मतदार शहरात दाखल होतील. तेथून १७ मतदान केंद्रांवर गटनिहाय त्यांना पाठविण्यात येणार आहे. महाआघाडीनेदेखील मतदारांची पूर्ण दक्षता घेतली असून, पसंतीक्रमाचे गणित जुळविल्याचा दावा आघाडीकडून केला जात आहे. तर महायुतीने पहिल्याच पसंतीसाठी पूर्ण तयारी केली आहे. महायुतीचे दुसऱ्या पसंतीचे मतदान कुणालाही जाणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी माजी खा.चंद्रकांत खैरे हे इगतपुरीला महायुतीच्या मतदारांच्या भेटीसाठी जाणार आहेत. 

मागील अनुभवामुळे पारदर्शकता२०१३ साली झालेल्या निवडणुकीत की- चेन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यामुळे यावेळी पारदर्शकतेसाठी काही कडक नियम अंमलात आणले जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेला विशेष पेन मतदारांना देण्यात येईल. तसेच विशेष डिटेक्टरच्या साह्याने मतदारांची तपासणी करून त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाईल. गुप्त कॅमेरा, वाहनांच्या चाव्या, बटनमधील गुप्त कॅमेरा त्यांच्याकडे असल्यास तो जप्त करण्यात येईल. आजवरच्या निवडणुकीतील अनुभवामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

चार वातानुकूलित बसेस, शाही पाहुणचारएमएच १६ पासिंग असणाऱ्या आनंद ट्रॅव्हल्स कंपनीच्या ४ बस हॉटेलच्या बाहेर सज्ज असून, हॉटेल परिसरात इतर चारचाकींसह शिवसेनेचे पक्षचिन्ह अंकित बरीच वाहनेही उभी आहेत. प्रत्येक बसमधील वाहकालाही बसमध्ये सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सगळे नियंत्रित करण्यासाठी विश्वासू व्यक्ती भरपावसात लक्ष ठेवून आहेत. अनेक मतदार परिवारासह या सहलीला आले आहेत. हवा तसा पाहुणचार असूनही घरच्यांमुळे तळीराम मतदारांची अडचण झाली आहे. इगतपुरी भागातील धरणे, धबधबे वगैरे पाहावे म्हणून काही मतदारांचा आग्रह आहे. मात्र नियोजनानुसार हट्ट पूर्ण करता येत नसल्यामुळे अंतर्गत धुसफूस सुरू आहे. निकालानंतर पुन्हा पर्यटनाला येऊ, असे आश्वासन पाहुण्या मतदारांना दिली जात आहे.कोणालाही बाहेर जाऊ न देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदारांनी त्यांना दिलेल्या रूममधून बाहेर पडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादJalanaजालना