शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पाण्यासाठी दहावीतील विद्यार्थ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:17 IST

पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत पाण्याचा तुटवडा असल्याने मोपेडवर कॅन ठेवून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून सुसाट आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना छावणी रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यंदाच्या उन्हाळ्यातील पाण्यासाठीचा हा पहिला बळी गेला आहे.

ठळक मुद्देमोपेडवर पाणी आणण्यासाठी गेला: रस्यावरील ट्रकने चिरडले; जागीच ठार

औरंगाबाद : पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत पाण्याचा तुटवडा असल्याने मोपेडवर कॅन ठेवून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून सुसाट आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना छावणी रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यंदाच्या उन्हाळ्यातील पाण्यासाठीचा हा पहिला बळी गेला आहे.अक्षय महेंद्र चेट्टी (१६, रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अक्षयने नुकतीच दहावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्याला दोन बहिणी असून एकीचे लग्न ठरले आहे. त्याचे वडील पक्षाघातामुळे बेडवर पडून असल्याने घरातील लहान-मोठी कामे अक्षयला करावी लागत. तो राहतो त्या परिसरात पाणीटंचाई असल्याने अक्षयसह परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. नेहमीप्रमाणे अक्षय शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्लास्टिकची कॅन घेऊन मोपेडवरून पाणी आणण्यासाठी छावणी परिसरात जात होता. लष्कराच्या कॅन्टीनसमोरून जात असताना मागून वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने उजव्या बाजूने त्याला जोराची धडक दिली. त्यात तो मोपेडसह ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. या घटनेत तो घटनास्थळीच गतप्राण झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून छावणी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लष्कराचे जवान आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ट्रकखालील मृतदेह काढून घाटीत हलविला. गुन्हा नोंदवून पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक ठोकळ तपास करीत आहेत.चौकटअर्धा तास होता मृतदेह घटनास्थळी पडूनट्रकच्या चाकाखाली दबलेला मृतदेह कसा काढावा, हे प्रत्यक्षदर्शींना समजत नव्हते. यामुळे सुमारे अर्धा तास घटनास्थळी मृतदेह पडून होता. त्यानंतर आधी मोपेड ओढून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर हळूच ट्रक पुढे सरकवण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या गाडीतून घाटी रुग्णालयात हलविण्यात आला.चौकटवृद्धापकाळाची काठी हरवलीअक्षयचे वडील एमआयडीसीमध्ये खाजगी कंपनीत नोकरीला होते. पॅरेलिसीसमुळे त्यांची नोकरी गेली आणि ते बिछाण्यावर पडून आहेत. वडील आजारी असल्यापासून अक्षय धडपड करीत होता. अक्षयच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांची वृद्धापकाळाची काठी हरवली. दोन बहिणींचा लाडका भाऊराया गेल्याने चेट्टी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

टॅग्स :Accidentअपघातwater scarcityपाणी टंचाई