शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी दहावीतील विद्यार्थ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:17 IST

पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत पाण्याचा तुटवडा असल्याने मोपेडवर कॅन ठेवून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून सुसाट आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना छावणी रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यंदाच्या उन्हाळ्यातील पाण्यासाठीचा हा पहिला बळी गेला आहे.

ठळक मुद्देमोपेडवर पाणी आणण्यासाठी गेला: रस्यावरील ट्रकने चिरडले; जागीच ठार

औरंगाबाद : पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत पाण्याचा तुटवडा असल्याने मोपेडवर कॅन ठेवून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून सुसाट आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना छावणी रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यंदाच्या उन्हाळ्यातील पाण्यासाठीचा हा पहिला बळी गेला आहे.अक्षय महेंद्र चेट्टी (१६, रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अक्षयने नुकतीच दहावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्याला दोन बहिणी असून एकीचे लग्न ठरले आहे. त्याचे वडील पक्षाघातामुळे बेडवर पडून असल्याने घरातील लहान-मोठी कामे अक्षयला करावी लागत. तो राहतो त्या परिसरात पाणीटंचाई असल्याने अक्षयसह परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. नेहमीप्रमाणे अक्षय शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्लास्टिकची कॅन घेऊन मोपेडवरून पाणी आणण्यासाठी छावणी परिसरात जात होता. लष्कराच्या कॅन्टीनसमोरून जात असताना मागून वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने उजव्या बाजूने त्याला जोराची धडक दिली. त्यात तो मोपेडसह ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. या घटनेत तो घटनास्थळीच गतप्राण झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून छावणी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लष्कराचे जवान आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ट्रकखालील मृतदेह काढून घाटीत हलविला. गुन्हा नोंदवून पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक ठोकळ तपास करीत आहेत.चौकटअर्धा तास होता मृतदेह घटनास्थळी पडूनट्रकच्या चाकाखाली दबलेला मृतदेह कसा काढावा, हे प्रत्यक्षदर्शींना समजत नव्हते. यामुळे सुमारे अर्धा तास घटनास्थळी मृतदेह पडून होता. त्यानंतर आधी मोपेड ओढून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर हळूच ट्रक पुढे सरकवण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या गाडीतून घाटी रुग्णालयात हलविण्यात आला.चौकटवृद्धापकाळाची काठी हरवलीअक्षयचे वडील एमआयडीसीमध्ये खाजगी कंपनीत नोकरीला होते. पॅरेलिसीसमुळे त्यांची नोकरी गेली आणि ते बिछाण्यावर पडून आहेत. वडील आजारी असल्यापासून अक्षय धडपड करीत होता. अक्षयच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांची वृद्धापकाळाची काठी हरवली. दोन बहिणींचा लाडका भाऊराया गेल्याने चेट्टी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

टॅग्स :Accidentअपघातwater scarcityपाणी टंचाई