शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये होणारा विलंब हा अतिशय घातक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 13:24 IST

मुख्य न्यायमूर्ती नंद्राजोग यांचे मार्गदर्शन

ठळक मुद्देघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांचा वारसा चालवावा

औरंगाबाद : न्यायदान प्रक्रियेत विलंब होणे हे अतिशय घातक आहे. हा एक प्रकारे अन्याय करणे होय. यावर न्यायाधीश आणि विधिज्ञांनी एकत्रितपणे मार्ग काढणे आवश्यक आहे. न्यायदानाचे काम जलद गतीने कसे होईल, याची खबरदारी घेतली पाहिजे. कायदेमंडळानेही याबाबत भरीव योगदान दिले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी औरंगाबाद खंडपीठात बोलताना व्यक्त केले. 

मुख्य न्यायमूर्ती नंद्राजोग एक आठवड्याच्या न्यायिक कामकाजासाठी येथे आले होते. याचे औचित्य साधून खंडपीठ वकील संघातर्फे गुरुवारी (दि.२६) त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर खंडपीठातील वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, वकील संघाच्या अध्यक्ष अ‍ॅड. सुरेखा महाजन आणि सचिव अ‍ॅड. शहाजी घाटोळ पाटील उपस्थित होते. मुख्य न्या. नंद्राजोग पुढे म्हणाले की, सध्याच्या इंटरनेटच्या युगात अत्याधुनिक बाबींचा वापर करून न्यायिक क्षेत्रात बदल घडवून न्यायदान करणे गरजेचे आहे. वकिलांनी न्यायनिवाडे सादर करून निकाल प्रभावीपणे देण्यास सहकार्य करावे. नवीन वकिलांनी प्रकरणे सादर करताना परिस्थितीची योग्य प्रकारे मांडणी करावी. 

न्या. वराळे म्हणाले की, मुख्य न्यायमूर्ती हे ज्ञानी व तपस्वी व्यक्तिमत्त्व आहेत. न्यायिक क्षेत्रातील सर्व शाखांत त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांची कामकाजाची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा आदर्श घेऊन सर्व न्यायमूर्ती आणि वकिलांनी त्यांचे काम प्रभावीपणे करावे. अ‍ॅड. महाजन यांनी प्रास्ताविकात वकिलांचे विविध प्रश्न, खंडपीठ परिसरातील पार्किंगची सुविधा, वकिलांचे चेम्बर्स आदी भौतिक सोयी-सुविधांकरीता निधीची मागणी केली, तसेच अंतर्गत रस्ते, जलवाहिन्या, पाणीपुरवठा, अखंड वीजपुरवठा आणि इलेक्ट्रिक फीडर आदी सुविधा पुरविण्याचीही मागणी केली. अ‍ॅड. अनघा पेडगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव शहाजी घाटोळ पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी वकील संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांचा वारसा चालवावामहाराष्ट्रास राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभला आहे. त्यांच्या न्यायिक तत्त्वांचे सर्वांनी पालन करावे व त्यांचा वारसा सर्वांनी अखंडपणे चालवावा. समानता, बंधुता आणि व्यक्ती स्वातंत्र्य या मूलतत्त्वांची अंमलबजावणी होईल, याची दक्षता सर्वांनी घ्यावी आणि समाजाला नवी दिशा देण्याचे काम करण्याचे आवाहन मुख्य न्यायमूर्ती नंद्राजोग यांनी केले.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी