शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान केअर फंडातून औरंगाबादेस आलेले व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 07:41 IST

किती व्हेंटिलेटर वापरात आहेत, किती बाहेरच्या जिल्ह्यात दिले आहेत, नादुरुस्त किती आहेत, याचा अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सोमवारी ताबडतोब हाती घेतले आहे.

  औरंगाबाद: पंतप्रधान केअर फंडातून औरंगाबाद जिल्ह्यासाठी आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा खळबळजनक आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी केला. त्याला प्रत्युत्तर देत खासदार डॉ. भागवत कराड यांनीही पुराव्यानिशी आरोप करण्याची मागणी केली. दोन्ही खासदारांच्या व्हेंटिलेटरवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांत प्रशासनाची मात्र कोंडी झाली.किती व्हेंटिलेटर वापरात आहेत, किती बाहेरच्या जिल्ह्यात दिले आहेत, नादुरुस्त किती आहेत, याचा अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सोमवारी ताबडतोब हाती घेतले आहे. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये सोमवारी कोरोना नियंत्रण आणि उपाययोजनांबाबत बैठक झाली. यावेळी खासदार जलील म्हणाले, पंतप्रधान साहाय्यता निधीतून मिळालेल्या व्हेंटिलेटर्सचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. ते व्हेंटिलेटर नादुरुस्त झाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे आहेत, असे वाटू लागले आहे.खासदार जलील यांच्या आरोपामुळे संतप्त झालेले भाजप खासदार कराड, आमदार अतुल सावे हे प्रत्युत्तर देताना यावेळी म्हणाले, तंत्रज्ञ बोलावून व्हेंटिलेटर्स तपासण्यात येतील. तसेच केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव राजेशभूषण यांनादेखील याप्रकरणी बोलून व्हेंटिलेटरसाठी असलेली एसओपी मागविलेली आहे.

केंद्राने दिले सुमारे २० कोटींचे व्हेंटिलेटर्सगेल्यावर्षी केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी १०० व्हेंटिलेटर्स दिले होते. त्यातील ६० हून अधिक व्हेंटिलेटर्स बिघडले होेते, ते प्रशासनाने दुरुस्त करून घेतल्याचा दावा प्रशासन करीत आहे. दुसऱ्या लाटेतही केंद्राकडून जिल्ह्याला पुन्हा १०० व्हेंटिलेटर्स देण्यात आले. त्यातील ५५ व्हेंटिलेटर्स परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्याला देण्यात आले आहेत. १० लाख याप्रमाणे २० कोटींचे हे व्हेंटिलेटर्स आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादNarendra Modiनरेंद्र मोदी