शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

औरंगाबाद जिल्ह्यात वाहन विक्रीत पडला ‘रिव्हर्स गीअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 8:13 PM

तब्बल २५ कोटींनी महसूल घटला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही कालावधीत प्रत्येक वर्षी वाहनांची संख्या वाढत होती. यंदा मात्र गतवर्षीपेक्षा ११ हजारांनी वाहन संख्या घटल्याचे समोर आले. त्यासाठी जीएसटी, महागाई आणि दुष्काळाचे कारण पुढे केले जात आहे. या सगळ्यामुळे आरटीओ कार्यालयाला २०१८-१९ या आर्थिक वर्षात दिलेले उद्दिष्टही पूर्ण करता आले नाही. तब्बल २५ कोटींनी महसूल घटला आहे.

औरंगाबाद आरटीओ कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड, अशी तीन जिल्हे आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या तीन जिल्ह्यांत ९० हजार ८८७ नव्या वाहनांची नोंद झाली होती. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ३ हजार ६६९ वाहनांची नोंद झाली होती. या आर्थिक वर्षात १८९ कोटी रुपयांच्या महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते. उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल गोळा झाला.

तब्बल २३३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तुलनेत २०१८-१९ या आर्थिक वर्षात औरंगाबाद जिल्ह्यात ९१ हजार ८४७ वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंद झाली. गतवर्षीपेक्षा तब्बल ११ हजार ८२२ वाहनांची घट झाल्याचे समोर आले आहे. वाहनांची संख्या घटल्यामुळे आरटीओ कार्यालयास देण्यात आलेल्या २५६ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी के वळ २२९ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला. वाहन संख्या कमी होण्यासाठी जीएसटी, महागाई आणि दुष्काळ ही कारणे असल्याचे बोलले जात आहे.

उद्दिष्टासाठी प्रयत्नआरटीओ कार्यालयास दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जातो; परंतु ११ हजारांनी वाहनांची संख्या कमी झाली. त्याचा परिणाम महसुलावर झाला. तरीही जुन्या वाहनांकडून त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  -सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी

अनेक कारणेगेल्या चार महिन्यांपासून वाहनांची विक्री मंदावली आहे. त्यासाठी अनेक कारणे आहेत. दुष्काळाचा १० ते १५ टक्के परिणाम आहे; परंतु जीएसटीचा परिणाम म्हणता येणार नाही. जीएसटीमुळे वाहन स्वस्त झाले आहे. -राहुल पगारिया, वाहन वितरक

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादTaxकर