शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

काय खाताय, बघा नीट! शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर विकला जातोय भाजीपाला

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 23, 2024 16:34 IST

तुम्ही उकिरड्यावरच्या भाज्या खाता का ? मग नक्कीच आजारी पडाल

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही उकिरड्यावरची भाजी खाता का? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला धक्काच बसेल. अहो, शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर भाजीपाला विकला जातोय. सडलेले फळ भाजीपाला व हॉटेलमधील कुजलेले अन्नपदार्थ आणून टाकले जाते व त्याच्या बाजूला भाजीपाला विकला जात आहेत. भाज्यांवरून हात फिरविला की, हजारो माश्या घोंगावत उडतात. अशी अवस्था असूनही ग्राहक येथून भाजीपाला खरेदी करतात हेही विशेष.

शहागंजमध्ये पूर्वी भाजीपाल्याचा अडत बाजार भरविल्या जात होता. १९९७ मध्ये येथील अडत बाजार जाधववाडी मार्केट यार्डमध्ये स्थानांतरित करण्यात आला आणि तेथील गाळ पाडण्यात आली. त्याच वेळी मॉडर्न मार्केटच्या नावाखाली महानगरपालिकेने भाजी मंडई उद्ध्वस्त केली. येथे २०१२ पासून होलसेल मार्केटच्या ढिगाऱ्यावर भाजी मंडई भरत आहे. जिथे जागा मिळेल तिथे बस्तान मांडून विक्रेते भाज्या विकत आहेत. जागा नसल्याने अखेर अनेक विक्रेते उकिरड्यालगतच भाज्या विकत आहेत. 

या उकिरड्यावर मनपातर्फे दररोज ओला व सुका कचरा साफ केला जातो, पण सडलेल्या पालेभाज्या फेकून दिला जातो. आसपासचे हॉटेलवाले कुजलेले अन्नपदार्थ येथेच आणून टाकतात. यामुळे दिवसभर येथे चिलटे, माश्यांचा प्रादुर्भाव असतो. त्याच माश्या मग आसपासच्या हातगाड्यांवरील भाज्यांवर जाऊन बसतात. हातगाडीवरील भाज्यांवर नुसता वरून हात फिरविला की, हजारो चिल्टे, माश्या उडतात एवढी घाण परिस्थिती तेथे आहे. उकिरड्यावर दुर्गंधीही असतेच, ग्राहक नाकाला रुमाल बांधून येथे पालेभाज्या खरेदी करताना दिसून आले.

स्वस्त टोमॅटोमुळे दुर्गंधीकडे दुर्लक्षभाजी मंडई परिसरात गावरान टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. या टोमॅटोवरही माश्या घोंगावत होत्या, पण १० रुपये किलोने टोमॅटो तेही गावरान मिळत असल्याने ग्राहक दुर्गंधी सहन करीत टोमॉंटो खरेदी करीत होते.

आम्ही माणसं आहोत याचा मनपाला विसरमागील १५ वर्षांपासून मी येथे भाजी विकते. जागा मिळत नसल्याने उकिरड्याच्या बाजूला बसून भाज्या विकते. पोटासाठी उकिरड्यावर दुर्गंधी सहन करत बसावेच लागते. पण, आम्ही माणसं आहोत याचा मनपाला विसर पडला आहे. यामुळेच कचरा वेळेवरच उचलला जात नाही.-करिमा पठाण, ज्येष्ठ भाजी विक्रेत्या

हॉटेलवाल्यांचे कुजलेले अन्नपदार्थ उकिरड्यावरमनपाचे सफाई कर्मचारी सकाळी येऊन कचरा साफ करून जातात. पण, सकाळी १० वाजेनंतर आसपासचे हॉटेलवाले त्यांच्याकडील कुजलेले अन्नपदार्थ येथे उकिरड्यावर आणून टाकतात. भाजीपालावाले त्यांच्यकडील खराब झालेले कांदे, बटाटे आदी फळभाज्या येथेच फेकून दिले जातात.- सलीम बागवान

अन्नपदार्थ, कॅरिबॅग जनावरांच्या पोटातशहागंज भाजी मंडईतील उकिरड्यावर मोठ्या प्रमाणात जनावरांचा वावर असतो. त्यात गायीची संख्या अधिक असते. कॅरिबॅगसह कुजलेले अन्नपदार्थ त्या खाऊन टाकतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार