शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

काय खाताय, बघा नीट! शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर विकला जातोय भाजीपाला

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 23, 2024 16:34 IST

तुम्ही उकिरड्यावरच्या भाज्या खाता का ? मग नक्कीच आजारी पडाल

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही उकिरड्यावरची भाजी खाता का? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला धक्काच बसेल. अहो, शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर भाजीपाला विकला जातोय. सडलेले फळ भाजीपाला व हॉटेलमधील कुजलेले अन्नपदार्थ आणून टाकले जाते व त्याच्या बाजूला भाजीपाला विकला जात आहेत. भाज्यांवरून हात फिरविला की, हजारो माश्या घोंगावत उडतात. अशी अवस्था असूनही ग्राहक येथून भाजीपाला खरेदी करतात हेही विशेष.

शहागंजमध्ये पूर्वी भाजीपाल्याचा अडत बाजार भरविल्या जात होता. १९९७ मध्ये येथील अडत बाजार जाधववाडी मार्केट यार्डमध्ये स्थानांतरित करण्यात आला आणि तेथील गाळ पाडण्यात आली. त्याच वेळी मॉडर्न मार्केटच्या नावाखाली महानगरपालिकेने भाजी मंडई उद्ध्वस्त केली. येथे २०१२ पासून होलसेल मार्केटच्या ढिगाऱ्यावर भाजी मंडई भरत आहे. जिथे जागा मिळेल तिथे बस्तान मांडून विक्रेते भाज्या विकत आहेत. जागा नसल्याने अखेर अनेक विक्रेते उकिरड्यालगतच भाज्या विकत आहेत. 

या उकिरड्यावर मनपातर्फे दररोज ओला व सुका कचरा साफ केला जातो, पण सडलेल्या पालेभाज्या फेकून दिला जातो. आसपासचे हॉटेलवाले कुजलेले अन्नपदार्थ येथेच आणून टाकतात. यामुळे दिवसभर येथे चिलटे, माश्यांचा प्रादुर्भाव असतो. त्याच माश्या मग आसपासच्या हातगाड्यांवरील भाज्यांवर जाऊन बसतात. हातगाडीवरील भाज्यांवर नुसता वरून हात फिरविला की, हजारो चिल्टे, माश्या उडतात एवढी घाण परिस्थिती तेथे आहे. उकिरड्यावर दुर्गंधीही असतेच, ग्राहक नाकाला रुमाल बांधून येथे पालेभाज्या खरेदी करताना दिसून आले.

स्वस्त टोमॅटोमुळे दुर्गंधीकडे दुर्लक्षभाजी मंडई परिसरात गावरान टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. या टोमॅटोवरही माश्या घोंगावत होत्या, पण १० रुपये किलोने टोमॅटो तेही गावरान मिळत असल्याने ग्राहक दुर्गंधी सहन करीत टोमॉंटो खरेदी करीत होते.

आम्ही माणसं आहोत याचा मनपाला विसरमागील १५ वर्षांपासून मी येथे भाजी विकते. जागा मिळत नसल्याने उकिरड्याच्या बाजूला बसून भाज्या विकते. पोटासाठी उकिरड्यावर दुर्गंधी सहन करत बसावेच लागते. पण, आम्ही माणसं आहोत याचा मनपाला विसर पडला आहे. यामुळेच कचरा वेळेवरच उचलला जात नाही.-करिमा पठाण, ज्येष्ठ भाजी विक्रेत्या

हॉटेलवाल्यांचे कुजलेले अन्नपदार्थ उकिरड्यावरमनपाचे सफाई कर्मचारी सकाळी येऊन कचरा साफ करून जातात. पण, सकाळी १० वाजेनंतर आसपासचे हॉटेलवाले त्यांच्याकडील कुजलेले अन्नपदार्थ येथे उकिरड्यावर आणून टाकतात. भाजीपालावाले त्यांच्यकडील खराब झालेले कांदे, बटाटे आदी फळभाज्या येथेच फेकून दिले जातात.- सलीम बागवान

अन्नपदार्थ, कॅरिबॅग जनावरांच्या पोटातशहागंज भाजी मंडईतील उकिरड्यावर मोठ्या प्रमाणात जनावरांचा वावर असतो. त्यात गायीची संख्या अधिक असते. कॅरिबॅगसह कुजलेले अन्नपदार्थ त्या खाऊन टाकतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार