शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

‘वंदे मातरम्’च राष्ट्रगीत हवे, त्यासाठी संघर्ष करावा लागेल; रामगिरी महाराजांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:44 IST

सरालाबेटचे रामगिरी महाराज यांचे छत्रपती संभाजीनगरात वादग्रस्त विधान

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रगीत हे ‘वंदे मातरम्’च हवे “जन गण मन...’ नको. कारण ते त्या काळचे राजे जॉर्ज पंचम यांना खुश करण्यासाठी, त्याचा उदो उदो करण्यासाठी गायलेले गीत होय. आता अयोध्येनंतर राष्ट्रगीतासाठी संघर्ष करावा लागेल, असे वादग्रस्त विधान रामगिरी महाराज (सरालाबेट) यांनी छत्रपती संभाजीनगरात ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या उद्घाटनप्रसंगी केले.

थिएटर्समध्ये कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर रामगिरी महाराज म्हणाले की, जेव्हा देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा ब्रिटिश राजा जॉर्ज पंचमला खुश करण्यासाठी १९११ साली हे गीत सादर केले गेले. खरे तर वंदे मातरम् च राष्ट्रगीत हवे होते. राम मंदिराचा ५०० वर्षांनंतरचा लढा आपण जिंकला आहे. आता राष्ट्रगीतासाठी संघर्ष करावा लागेल. पूर्वीच्या चित्रपटातून सनातन धर्म, हिंदूंना बदनामच केलेले आहे. हिंदूंवर अन्याय, अत्याचारच झाले आहेत. हिंदू एकत्र आल्यावर काय होते, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. अन्याय, अत्याचाराविरोधात एकत्र येण्याची गरज आहे.

ते पुढे म्हणाले, रामायण, महाभारत, गीता या तत्त्वज्ञानाची सध्या गरज आहे. एक काळ असा होता साधू-संत म्हटल्यानंतर काहीही विकृत दाखवले जात होते. कधीही साधूबद्दल चांगली भूमिका कुठल्याही चित्रपटात दाखवली नाही. एखाद्या मौलानाबद्दल अशाप्रकारे विकृत दाखविण्याची हिंमत या चित्रपटांची झाली नाही. एखाद्या फादरबद्दल दाखविण्याची हिंमत झाली नाही. पण हिंदू सनातन धर्म हा श्रेष्ठ आणि सहनशील आहे याचा गैरफायदा घेऊन या चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून आजपर्यंत हिंदू धर्माला, सनातन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण आज आनंदाची गोष्ट आहे की अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये जागृती निर्माण झालेली आहे. या चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून आणि योग्य अशा प्रकारे चित्रपट समाजासमोर येत आहेत. त्याचा परिणाम निश्चित पुढच्या पिढीसाठी होणार आहे, असेही रामगिरी महाराज म्हणाले.

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर