शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

छत्रपती संभाजीनगरहून ८२५ रिकाम्या सीट घेऊन धावली नांदेडला पळवलेली वंदे भारत एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:43 IST

नांदेडला पळविलेल्या रेल्वेची पहिली नियमित फेरी; नव्या वेळेच्या संदेशाअभावी प्रवाशांची दमछाक

छत्रपती संभाजीनगर : नांदेडला पळविलेल्या जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची गुरुवारपासून नियमित फेरी सुरू झाली. मात्र, बदललेली वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची झाल्याचे पहिल्याच नियमित फेरीत स्पष्ट झाले. काही मोजकेच प्रवासी छत्रपती संभाजीनगरहून रवाना झाले. तब्बल ८२५ रिकाम्या सीट घेऊन ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून रवाना झाली.

जालन्याहून धावताना ही रेल्वे पूर्वी छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ५:५० वाजता सुटत होती आणि दुपारी ११:५५ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचत होती. आता ही रेल्वे नांदेडला पळविल्यानंतर नव्या वेळापत्रकानुसार छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ८:१५ वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. त्यामुळे सकाळी मुंबईला गेल्यानंतर सायंकाळी रेल्वेने परतणे अशक्य आहे. ‘वंदे भारत’ची अवस्था ‘जनशताब्दी’प्रमाणे होईल आणि प्रवाशांसाठी ती उपयोगी ठरणार नाही. नांदेडहून धावणाऱ्या पहिल्या नियमित फेरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्येही, ही रेल्वे आता गैरसोयीची झाल्याचीच चर्चा सुरू होती. अनेक दिवसांपूर्वी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेची वेळ बदलल्याचे संदेशही आले नाहीत. त्यामुळे अनेक प्रवासी सकाळी ५:५० वाजेपूर्वीच स्टेशनवर दाखल झाले होते. रेल्वे ८:१५ वाजता सुटणार असल्याचे कळताच काही जण परत गेले, तर काही जण स्टेशनवरच थांबले.

मुंबईत मुक्कामाची वेळवंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेल्याने कनेक्टिव्हिटी वाढली. पण, छत्रपती संभाजीनगरकरांसाठी ही रेल्वे गैरसोयीची झाली आहे. एका दिवसात मुंबईला ये-जा करणे अशक्य होईल. मुंबईत मुक्काम करण्याचीच वेळ येईल. बदललेल्या वेळेचा रेल्वेकडून मेसेज आला नाही. त्यामुळे मी सकाळी ५:५० वाजता स्टेशनवर येऊन परत गेलो.- अक्षय पाटील, प्रवासी

जास्त पैसे देऊन गैरसोय विकतवंदे भारत एक्स्प्रेसची वेळ बदलल्याने आता जास्त पैसे देऊन गैरसोय विकत घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे. विविध कामांसाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही रेल्वे आता गैरसोयीची झाली आहे.- ॲड. सुयश जांगडा, प्रवासी

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेड