शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

घाटीतील डॉक्टरांनी मुलाला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 8:32 PM

घाटी रुग्णालयाच्या बालरोग विभागाने दहा वर्षीय बालकाला औषधोपचार करून आजारातील गुंतागूत दूर केली.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या बालरोग विभागाने दहा वर्षीय बालकाला औषधोपचार करून आजारातील गुंतागूत दूर केली. त्यामुळे अंथरुणावर खिळून असलेला बालक आता चालू-फिरू लागला असून, तो शाळेतही जायला लागला आहे. आम्ही आशा सोडून दिली होती, पण घाटीतील डॉक्टरांनी मुलाला जीवदान दिले, आशा भावना त्याच्या कुटुंबियांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.

बाचोटी (ता. कंधार) येथे चौथीत शिकणाऱ्या शिवप्रसाद स्वामी याला जुलै २०१८ मध्ये अचानक चक्कर आली. त्यानंतर त्याला झटके येण्यास सुरुवात झाली. त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर २० दिवस उपचार करण्यात आले. दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटीत बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे यांच्या युनिटने वॉर्ड २४ मध्ये त्याच्यावर यशस्वी उपचार केले. योग्य निदान झाल्याने त्याचे झटके बंद झाले. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सुटी मिळाली. त्यावेळी तो त्याच्या पायावर चालत घरी गेला.

अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, डॉ. स्मिता मुंदडा, डॉ. प्राजीत गिवर्गीस, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. वर्षा चौरे, डॉ. हिना कौसर, डॉ. निला जोशी, डॉ. निलेश हातझाडे यांनी शिवप्रसादवर उपचार केले. तसेच रजनी कुलकर्णी, स्वरुपा खेकडे यांच्यासह परिचारिका आणि कर्मचा-यांनी प्रयत्न केल्याने शिवप्रसादला नवे आयुष्य मिळाल्याचे त्याचे काका धनंजय स्वामी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

मेंदूचा टीबीघाटीत या बालकाच्या मेंदुच्या टीबीचे वेळीच निदान झाले. त्यामुळे उपचार यशस्वी करता आले. या आजाराचे बालरोगात दोन ते तीन टक्के प्रमाण आहे. त्याचे पालक नियमित तपासणीसाठी येतात.

-डॉ. प्रभा खैरे, विभागप्रमुख, बालरोग विभाग, घाटी रुग्णालय

 

 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद