शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day : सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेले दाम्पत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 12:20 IST

समाजकार्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलो, असे सांगत शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा यांनी सहजीवनाचा प्रवास उलगडला

- रूचिका पालोदकर 

औरंगाबाद : नवरा म्हणून निवड करताना ना त्याची नोकरी महत्त्वाची वाटली ना त्याच्याकडे घर आहे का, हा विचार डोक्यात आला. सांपत्तिक स्थितीपेक्षा त्याची एक माणूस म्हणून असणारी प्रतिमा, सामाजिक कार्यातले झपाटलेपण मनात भरले आणि आर्थिक, सामाजिक परिस्थितीत मोठी तफावत असूनही आम्ही समाजकार्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलो, असे सांगत शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा या दाम्पत्याने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर त्यांचा सहजीवनाचा प्रवास उलगडून सांगितला.

सामाजिक क्षेत्रात वाहून घेतलेले शहरातील लोकप्रिय जोडपे म्हणजे शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा. त्यांचा सहजीवनाचा अनुभव ४० वर्षांपेक्षाही मोठा. राशीन (ता. वैजापूर) येथील सुखवस्तू मारवाडी घरात वाढलेल्या मंगलतार्इंची वयाच्या जेमतेम १८ व्या वर्षी शांताराम यांच्याशी गाठ पडली. युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते असणाऱ्या शांताराम यांनी पूर्णवेळ चळवळीसाठी देण्याचे ठरविले आणि त्यासाठी घर (मुंबई) सोडून त्यांनी मराठवाडा कार्यक्षेत्र निवडले. याच दरम्यान दोघांची भेट झाली, विचार जुळले आणि त्यांचा विवाह झाला. लग्न झाले तेव्हा खिशात दमडीही नव्हती. भूक लागली तर काय खाणार, असा प्रश्न होता. पण संघटना आणि बांधिलकी मानणारे कार्यकर्ते, त्यांच्याशी शांतारामचे जोडलेले नाते यामुळे भूक पळूनच गेली, असे मंगलताई आवर्जून सांगतात. 

दोन परस्परविरोधी आर्थिक-सांस्कृतिक वातावरण व विपरीत परिस्थितीतून संघर्ष करत जात असताना आणि एकाच ध्येयाने बांधले गेलो असल्यामुळे दोघांतील नाते काळानुसार अधिकच मजबूत होत गेले. जीवनातील अत्यंत कठीण काळात मंगलने ज्या कमालीच्या धीराने परिस्थितीला तोंड दिले, तसे कदाचित मलाही जमले नसते. मंगलच्या या धैर्य व योगदानाला साष्टांग दंडवत, असे शांताराम प्रांजळपणे कबूल करतात. 

तो सोनेरी क्षणजिद्द, चिकाटी, कसोटी, तत्त्वाने जगणे यातूनही माणूस मोठा होतो. मोठे होण्यासाठी पैसा लागत नाही. आमच्या दोघांच्या आयुष्यात पैसा हा कधी महत्त्वाचा नव्हता आणि असणारही नाही. या सहजीवनात कधी उपाशी राहिलो, कधी अनवाणी चाललो; पण साथ सोडली नाही. माणूस म्हणून जगणारा आणि इतरांनाही तसे जगण्याचा अधिकार देणारा सहचर असावा लागतो. म्हणूनच लग्न करण्याचा निर्णय हा आमच्या आयुष्यातील सोनेरी क्षण होता, असे या द्वयांनी सांगितले.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबाद