शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

Valentine Day : सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेले दाम्पत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 12:20 IST

समाजकार्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलो, असे सांगत शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा यांनी सहजीवनाचा प्रवास उलगडला

- रूचिका पालोदकर 

औरंगाबाद : नवरा म्हणून निवड करताना ना त्याची नोकरी महत्त्वाची वाटली ना त्याच्याकडे घर आहे का, हा विचार डोक्यात आला. सांपत्तिक स्थितीपेक्षा त्याची एक माणूस म्हणून असणारी प्रतिमा, सामाजिक कार्यातले झपाटलेपण मनात भरले आणि आर्थिक, सामाजिक परिस्थितीत मोठी तफावत असूनही आम्ही समाजकार्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलो, असे सांगत शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा या दाम्पत्याने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर त्यांचा सहजीवनाचा प्रवास उलगडून सांगितला.

सामाजिक क्षेत्रात वाहून घेतलेले शहरातील लोकप्रिय जोडपे म्हणजे शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा. त्यांचा सहजीवनाचा अनुभव ४० वर्षांपेक्षाही मोठा. राशीन (ता. वैजापूर) येथील सुखवस्तू मारवाडी घरात वाढलेल्या मंगलतार्इंची वयाच्या जेमतेम १८ व्या वर्षी शांताराम यांच्याशी गाठ पडली. युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते असणाऱ्या शांताराम यांनी पूर्णवेळ चळवळीसाठी देण्याचे ठरविले आणि त्यासाठी घर (मुंबई) सोडून त्यांनी मराठवाडा कार्यक्षेत्र निवडले. याच दरम्यान दोघांची भेट झाली, विचार जुळले आणि त्यांचा विवाह झाला. लग्न झाले तेव्हा खिशात दमडीही नव्हती. भूक लागली तर काय खाणार, असा प्रश्न होता. पण संघटना आणि बांधिलकी मानणारे कार्यकर्ते, त्यांच्याशी शांतारामचे जोडलेले नाते यामुळे भूक पळूनच गेली, असे मंगलताई आवर्जून सांगतात. 

दोन परस्परविरोधी आर्थिक-सांस्कृतिक वातावरण व विपरीत परिस्थितीतून संघर्ष करत जात असताना आणि एकाच ध्येयाने बांधले गेलो असल्यामुळे दोघांतील नाते काळानुसार अधिकच मजबूत होत गेले. जीवनातील अत्यंत कठीण काळात मंगलने ज्या कमालीच्या धीराने परिस्थितीला तोंड दिले, तसे कदाचित मलाही जमले नसते. मंगलच्या या धैर्य व योगदानाला साष्टांग दंडवत, असे शांताराम प्रांजळपणे कबूल करतात. 

तो सोनेरी क्षणजिद्द, चिकाटी, कसोटी, तत्त्वाने जगणे यातूनही माणूस मोठा होतो. मोठे होण्यासाठी पैसा लागत नाही. आमच्या दोघांच्या आयुष्यात पैसा हा कधी महत्त्वाचा नव्हता आणि असणारही नाही. या सहजीवनात कधी उपाशी राहिलो, कधी अनवाणी चाललो; पण साथ सोडली नाही. माणूस म्हणून जगणारा आणि इतरांनाही तसे जगण्याचा अधिकार देणारा सहचर असावा लागतो. म्हणूनच लग्न करण्याचा निर्णय हा आमच्या आयुष्यातील सोनेरी क्षण होता, असे या द्वयांनी सांगितले.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबाद