शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उस्मानपुरा पोलिसांनी चोरट्यांकडून केल्या पाच दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:26 IST

एका चोरट्याने अल्पवयीन मुलाला(विधीसंघर्षग्रस्त)सोबत घेऊन  उस्मानपुरा परिसरातून पाच दुचाकी आणि तीन महागड्या सायकली पळविणाऱ्या चोरट्याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद: सायकल चोर म्हणून पोलिसांना परिचित असलेल्या एका चोरट्याने अल्पवयीन मुलाला(विधीसंघर्षग्रस्त)सोबत घेऊन  उस्मानपुरा परिसरातून पाच दुचाकी आणि तीन महागड्या सायकली पळविणाऱ्या चोरट्याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. या चोरट्याकडून चोरीच्या पाच दुचाकीसह आठ वाहने  जप्त केल्या. 

नदीम खान नजीर खान (वय २३,रा.शम्सनगर, शहानुरवाडी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, नदीम खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सायकल चोर आहे. सायकली चोरता,चोरता तो मोटारसायकल चोर बनला आणि गेल्या काही महिन्यामध्ये  त्याने १७वर्षीय तरुणाला सोबत घेऊन उस्मानपुरा परिसरातून पाच मोटारसायकली आणि तीन महागड्या सायकली चोरल्या. 

उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, कर्मचारी संजयसिंग डोबाळ, मनोज बनसोडे, संतोष शिरसाठ यांच्या पथकाला नदीमखान हा दुचाकी चोरी करीत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर त्याला संशयावरून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अल्पवयीन मुलासोबत मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.  यात तीन मोटारसायकली आणि दोन मोपेडचा समावेश आहे. शिवाय महागड्या तीन सायकलीही त्यांनी चोरल्याचे  सांगितले. चोरलेली सर्व वाहने त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवली होती. ही वाहने त्याने पोलिसांना काढून दिली.आरोपीचा साथीदार असलेल्या विधीसंघर्षग्रस्त मुलाला बालन्यायमंडळासमोर  हजर करून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी