शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

पाणी जपून वापरा; छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पाणीपातळीत मोठी घट

By साहेबराव हिवराळे | Updated: April 3, 2024 18:23 IST

जलसाक्षर व्हा : शहरात ज्यांंनीही बोअरवेल पुनर्भरण केलेले आहे, त्यांना उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळते.

छत्रपती संभाजीनगर : रखरखत्या उन्हात नद्या-नाले व तसेच पाणथळ कोरड्या होत आहेत. शहरात सिमेंटचे जंगल वाढल्याने बोअरवेलनेही तळ गाठला आहे. केवळ पाच मिनिटेही बोअरवेल चालणे अवघड आहे. आता जलसाक्षर होण्याची व बोअरवेल पुनर्भरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मालमत्ताधारकांकडून मनपा प्रशासनाने घरांच्या बांधकाम परवान्यातच बोअरवेल पुनर्भरणाची एक अट टाकावी, जेणेकरून जलसाक्षर होणे गरजेचे आहे. नळाला तोट्या लावणे, पावसाळ्यात घराच्या छतावरील पाणी वाहून न जाऊ देता ते बोअरवेलमध्ये जिरविणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि ऐन हिवाळ्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. शहरात ज्यांंनीही बोअरवेल पुनर्भरण केलेले आहे, त्यांना उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळते. परंतु घर आणि दार आणि अंगणातही सिमेंटचा गिलावाच शहरवासीयांनी घालण्याचा सपाटा लावला असल्याने जमिनीत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण होत नसेल तर पाणीपातळी वाढणार कशी, असा सवाल आहे.

मार्च २०२४ची पाणीपातळी घट मीटरमध्ये पुढीलप्रमाणे :छत्रपती संभाजीनगर- ०.४८, गंगापूर- १.१६, कन्नड - ०.५२, पैठण- १.००, सिल्लोड- १.५४, सोयगाव- १.०७, वैजापूर- २.८४, खुलताबाद- २.८६, फुलंब्री- १.७४ घट झाल्याचे निदर्शनास येते.

घर तिथं बोअर, पुनर्भरणाचा संकल्प कराशहरात जमिनीत पाणी साठविण्याऐवजी उपसाच सुरू आहे. हजारो बोअरवेल मोडल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केलेला दिसतो. घेतलेले बोअरवेल तळ गाठत असेल तर पुनर्भरणाचा संकल्प करणे गरजेचे आहे.-डॉ. प्रशांत अवसरमल

जलसाक्षर होणे गरजेचेपाणीपातळी वाढविण्यासाठी आपणही छोटे-छोटे उपाय करू शकतो. पाण्याचे महत्त्व जनतेला पटवून देणे गरजेचे आहे. घरामध्ये विनाकारण तोटी फिरवून ते पाणी वाया घालवण्यापेक्षा ते वाचविण्यासाठी अधिक प्रयत्न व्हावेत.-जीवन बेडवाल, वरिष्ठ भूवैज्ञानिक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी