शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पाणी जपून वापरा; छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पाणीपातळीत मोठी घट

By साहेबराव हिवराळे | Updated: April 3, 2024 18:23 IST

जलसाक्षर व्हा : शहरात ज्यांंनीही बोअरवेल पुनर्भरण केलेले आहे, त्यांना उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळते.

छत्रपती संभाजीनगर : रखरखत्या उन्हात नद्या-नाले व तसेच पाणथळ कोरड्या होत आहेत. शहरात सिमेंटचे जंगल वाढल्याने बोअरवेलनेही तळ गाठला आहे. केवळ पाच मिनिटेही बोअरवेल चालणे अवघड आहे. आता जलसाक्षर होण्याची व बोअरवेल पुनर्भरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मालमत्ताधारकांकडून मनपा प्रशासनाने घरांच्या बांधकाम परवान्यातच बोअरवेल पुनर्भरणाची एक अट टाकावी, जेणेकरून जलसाक्षर होणे गरजेचे आहे. नळाला तोट्या लावणे, पावसाळ्यात घराच्या छतावरील पाणी वाहून न जाऊ देता ते बोअरवेलमध्ये जिरविणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि ऐन हिवाळ्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. शहरात ज्यांंनीही बोअरवेल पुनर्भरण केलेले आहे, त्यांना उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळते. परंतु घर आणि दार आणि अंगणातही सिमेंटचा गिलावाच शहरवासीयांनी घालण्याचा सपाटा लावला असल्याने जमिनीत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण होत नसेल तर पाणीपातळी वाढणार कशी, असा सवाल आहे.

मार्च २०२४ची पाणीपातळी घट मीटरमध्ये पुढीलप्रमाणे :छत्रपती संभाजीनगर- ०.४८, गंगापूर- १.१६, कन्नड - ०.५२, पैठण- १.००, सिल्लोड- १.५४, सोयगाव- १.०७, वैजापूर- २.८४, खुलताबाद- २.८६, फुलंब्री- १.७४ घट झाल्याचे निदर्शनास येते.

घर तिथं बोअर, पुनर्भरणाचा संकल्प कराशहरात जमिनीत पाणी साठविण्याऐवजी उपसाच सुरू आहे. हजारो बोअरवेल मोडल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केलेला दिसतो. घेतलेले बोअरवेल तळ गाठत असेल तर पुनर्भरणाचा संकल्प करणे गरजेचे आहे.-डॉ. प्रशांत अवसरमल

जलसाक्षर होणे गरजेचेपाणीपातळी वाढविण्यासाठी आपणही छोटे-छोटे उपाय करू शकतो. पाण्याचे महत्त्व जनतेला पटवून देणे गरजेचे आहे. घरामध्ये विनाकारण तोटी फिरवून ते पाणी वाया घालवण्यापेक्षा ते वाचविण्यासाठी अधिक प्रयत्न व्हावेत.-जीवन बेडवाल, वरिष्ठ भूवैज्ञानिक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी