शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महावितरणचा ‘फ्रँचायजी’चा प्रयोग तूर्त टळला; दूरगामी नियोजनाचे संचालकांकडून सादरीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 13:47 IST

राज्यभरातील शहरे व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करणे, खंडित करणे, दुरुस्ती, बिलाची वसुली, मीटर रीडिंग, वीजचोरी रोखणे आदी कामांचे दूरगामी नियोजन करण्यात आल्याचे वीज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिले. त्यामुळे औरंगाबाद व जळगाव शहरातील वीजपुरवठ्याचे काम खाजगी संस्थेकडे (फ्रँचायजी) देण्याच्या हालचाली तूर्तास टळल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ठळक मुद्देमहावितरण कंपनीतील प्रमुख सहा कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसमोर मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात येणार्‍या जबाबदारीचे सादरीकरण केले. येत्या १ एप्रिलपासून महावितरणच्या संचलन व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र तीन विभाग अस्तित्वात येणार आहेत. कर्मचार्‍यांची कपात न करता आहे त्या कर्मचार्‍यांची विभागणी तीन विभागांत केली जाणार आहे.

औरंगाबाद : राज्यभरातील शहरे व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करणे, खंडित करणे, दुरुस्ती, बिलाची वसुली, मीटर रीडिंग, वीजचोरी रोखणे आदी कामांचे दूरगामी नियोजन करण्यात आल्याचे वीज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिले. त्यामुळे औरंगाबाद व जळगाव शहरातील वीजपुरवठ्याचे काम खाजगी संस्थेकडे (फ्रँचायजी) देण्याच्या हालचाली तूर्तास टळल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महावितरण कंपनीतील प्रमुख सहा कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसमोर मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात येणार्‍या जबाबदारीचे सादरीकरण केले. येत्या १ एप्रिलपासून महावितरणच्या संचलन व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र तीन विभाग अस्तित्वात येणार आहेत. कर्मचार्‍यांची कपात न करता आहे त्या कर्मचार्‍यांची विभागणी तीन विभागांत केली जाणार आहे. सुपरवायझर केडरमधील कर्मचारी प्रत्यक्षात फिल्डवरील कामासाठी नियुक्त केले जातील. वीज ग्राहकांना दरमहा बिलासंबंधीचा संदेश मोबाईलवरच दिला जाईल. यापुढे एप्रिलपासून तांत्रिक कामगार ज्या विभागात कार्यरत असतील त्यांच्यावर त्याच कामांची जबाबदारी राहील. शहरी व निमशहरी भागात विद्युत पुरवठ्यासंबंधीची दुरुस्ती, दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा बंद ठेवणे, बिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणे, बिल भरल्यास पुन्हा वीज जोडणे आदी कामांसाठी स्वतंत्र पथके कार्यरत केली जातील. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी केली जाईल.

भविष्यात मीटर प्रयोगशाळा अस्तित्वात आणण्याचा महावितरणचा मानस आहे. १ एप्रिलपासून सहायक अभियंता हे बिलिंग विभागाचे प्रमुख असतील. त्यांच्यावरच यापुढे ग्राहकांच्या बिलासंबंधीच्या तक्रारी, मीटर रीडिंग, वीज चोरीचे बिल, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जबाबदारी असेल. ग्रामीण उपविभागात बिलिंग व महसूलसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे. बहुतेक सर्वच कामे आॅनलाईन होतील. त्यामुळे प्रचलित टिपणी लिहिण्याची कामे इतिहासजमा होतील. 

तांत्रिक कामगार समाधानीमहावितरणने तब्बल ५७ वर्षांनंतर कर्मचार्‍यांच्या कामाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून, तांत्रिक कामगारांवरील मोठा ताण यामुळे कमी होणार आहे. महावितरणच्या कार्यपद्धतीची पुनर्रचना राज्यातील १६ झोन, ४४ सर्कल, १४० विभाग, ६६३ उपविभाग व ३२२८ शाखा कार्यालयांमध्ये होणार आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष एन. के. मगर, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, भाऊसाहेब भाकरे, टी. डी. कोल्हे, आर. पी. थोरात आदींनी समाधान व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद