शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दान केलेल्या नेत्रांचा वापर संशोधनासाठी

By admin | Updated: July 9, 2017 00:42 IST

औरंगाबाद : वर्षभराच्या कालावधीत जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांना दृष्टी प्राप्त झाल्याची माहिती आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वर्षभराच्या कालावधीत जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांना दृष्टी प्राप्त झाल्याची माहिती आहे. मोठ्या संख्येने नेत्रदान होऊनही ते अंधांच्या कामी आले नसल्याने आणि त्याचा संशोधनासाठी उपयोग केला जात असल्याने नेत्रदानाच्या संकल्पनेलाच तडा जात असल्याचे ‘चित्र’ आहे. जिल्ह्यात सरकारी आणि खाजगी अशा सात नेत्रपेढ्यांतर्फे नेत्रसंकलनाचे काम होते.गतवर्षी जिल्ह्यात १८९ नेत्रसंकलन झाले. सर्वसाधारणपणे शंभरामागे ३० ते ४० टक्के नेत्ररोपण होत असते, असे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. निलांबरी कानडे यांनी सांगितले. अनेक कारणांमुळे नेत्ररोपण टळते. प्रत्यक्षात डोळे काढल्यानंतरच ते रोपण करण्यायोग्य आहेत की नाही, हे समजते. रोपण करण्यायोग्य नसलेले डोळे संशोधनासाठी वापरले जातात. मृत्यूनंतर काढलेले डोळे आयबँकेत जतन करुन ठेवले जातात. हे डोळे नंतर गरजूंना दिले जातात. औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांवर रोपण करण्यात आले. ही आकडेवारी समाधानकारक नसल्याचे नेत्रशल्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी स्पष्ट केले. काही वेळा मानवी चुकीमुळे डोळा वाया जाण्याची शक्यता अधिक असते. नेत्रसंकलनाचा अधिकाधिक उपयोग अंधजणांसाठी व्हावा, ही समाजाची अपेक्षा असते. अशा वेळी नेत्रपेढ्यांची ‘दृष्टी‘ही सुधारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. नेत्ररोपणाचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के असल्याचे चित्र असले तरी दान देणाऱ्यांनी ज्या भावनेने ते केले आहे याचा विचार नेत्रपेढ्यांना करणे आवश्यक ठरत आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या दात्याचे डोळे उपयोगी पडतीलच असे नाही. तरीही नेत्ररोपणाचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे मत मांडले जात आहे.