शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

दान केलेल्या नेत्रांचा वापर संशोधनासाठी

By admin | Updated: July 9, 2017 00:42 IST

औरंगाबाद : वर्षभराच्या कालावधीत जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांना दृष्टी प्राप्त झाल्याची माहिती आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वर्षभराच्या कालावधीत जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांना दृष्टी प्राप्त झाल्याची माहिती आहे. मोठ्या संख्येने नेत्रदान होऊनही ते अंधांच्या कामी आले नसल्याने आणि त्याचा संशोधनासाठी उपयोग केला जात असल्याने नेत्रदानाच्या संकल्पनेलाच तडा जात असल्याचे ‘चित्र’ आहे. जिल्ह्यात सरकारी आणि खाजगी अशा सात नेत्रपेढ्यांतर्फे नेत्रसंकलनाचे काम होते.गतवर्षी जिल्ह्यात १८९ नेत्रसंकलन झाले. सर्वसाधारणपणे शंभरामागे ३० ते ४० टक्के नेत्ररोपण होत असते, असे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. निलांबरी कानडे यांनी सांगितले. अनेक कारणांमुळे नेत्ररोपण टळते. प्रत्यक्षात डोळे काढल्यानंतरच ते रोपण करण्यायोग्य आहेत की नाही, हे समजते. रोपण करण्यायोग्य नसलेले डोळे संशोधनासाठी वापरले जातात. मृत्यूनंतर काढलेले डोळे आयबँकेत जतन करुन ठेवले जातात. हे डोळे नंतर गरजूंना दिले जातात. औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांवर रोपण करण्यात आले. ही आकडेवारी समाधानकारक नसल्याचे नेत्रशल्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी स्पष्ट केले. काही वेळा मानवी चुकीमुळे डोळा वाया जाण्याची शक्यता अधिक असते. नेत्रसंकलनाचा अधिकाधिक उपयोग अंधजणांसाठी व्हावा, ही समाजाची अपेक्षा असते. अशा वेळी नेत्रपेढ्यांची ‘दृष्टी‘ही सुधारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. नेत्ररोपणाचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के असल्याचे चित्र असले तरी दान देणाऱ्यांनी ज्या भावनेने ते केले आहे याचा विचार नेत्रपेढ्यांना करणे आवश्यक ठरत आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या दात्याचे डोळे उपयोगी पडतीलच असे नाही. तरीही नेत्ररोपणाचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे मत मांडले जात आहे.