शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

दान केलेल्या नेत्रांचा वापर संशोधनासाठी

By admin | Updated: July 9, 2017 00:42 IST

औरंगाबाद : वर्षभराच्या कालावधीत जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांना दृष्टी प्राप्त झाल्याची माहिती आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वर्षभराच्या कालावधीत जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांना दृष्टी प्राप्त झाल्याची माहिती आहे. मोठ्या संख्येने नेत्रदान होऊनही ते अंधांच्या कामी आले नसल्याने आणि त्याचा संशोधनासाठी उपयोग केला जात असल्याने नेत्रदानाच्या संकल्पनेलाच तडा जात असल्याचे ‘चित्र’ आहे. जिल्ह्यात सरकारी आणि खाजगी अशा सात नेत्रपेढ्यांतर्फे नेत्रसंकलनाचे काम होते.गतवर्षी जिल्ह्यात १८९ नेत्रसंकलन झाले. सर्वसाधारणपणे शंभरामागे ३० ते ४० टक्के नेत्ररोपण होत असते, असे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. निलांबरी कानडे यांनी सांगितले. अनेक कारणांमुळे नेत्ररोपण टळते. प्रत्यक्षात डोळे काढल्यानंतरच ते रोपण करण्यायोग्य आहेत की नाही, हे समजते. रोपण करण्यायोग्य नसलेले डोळे संशोधनासाठी वापरले जातात. मृत्यूनंतर काढलेले डोळे आयबँकेत जतन करुन ठेवले जातात. हे डोळे नंतर गरजूंना दिले जातात. औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांवर रोपण करण्यात आले. ही आकडेवारी समाधानकारक नसल्याचे नेत्रशल्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी स्पष्ट केले. काही वेळा मानवी चुकीमुळे डोळा वाया जाण्याची शक्यता अधिक असते. नेत्रसंकलनाचा अधिकाधिक उपयोग अंधजणांसाठी व्हावा, ही समाजाची अपेक्षा असते. अशा वेळी नेत्रपेढ्यांची ‘दृष्टी‘ही सुधारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. नेत्ररोपणाचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के असल्याचे चित्र असले तरी दान देणाऱ्यांनी ज्या भावनेने ते केले आहे याचा विचार नेत्रपेढ्यांना करणे आवश्यक ठरत आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या दात्याचे डोळे उपयोगी पडतीलच असे नाही. तरीही नेत्ररोपणाचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे मत मांडले जात आहे.