शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

उर्दू भाषिक वकील;मराठीचे करी संवर्धन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 14:14 IST

मराठीतून लिहिली कायदेविषयक पुस्तके

ठळक मुद्देइंग्रजी भाषेतील पुस्तकांचा मराठीतून अनुवाद 

- स. सो. खंडाळकर  

औरंगाबाद : उर्दू भाषिक असूनही शहरातील एका वकिलाने मराठीत एकूण चौदा पुस्तके लिहून मराठीच्या संवर्धनासाठी मोठा हातभार लावला आहे. अ‍ॅड. नवाब पटेल असे या वकिलाचे नाव असून, मराठीबरोबरच त्यांनी उर्दूतून अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. 

अ‍ॅड. नवाब पटेल हे मूळचे उर्दू भाषिक. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण उर्दू भाषेत झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण मात्र मराठी माध्यमातून झाले. पदवी व पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी भाषेत झाले. अ‍ॅड. पटेल यांनी  बी.ए.एलएल.बी., बीजे, एम.एम.सीजे. केले आहे.  मराठी भाषेतून पुस्तक लिहिण्यामागील उद्देशाबद्दल सांगताना पटेल म्हणाले, देशातून इंग्रजी राजवट गेली. पण देशात सर्व कायदे इंग्रजी भाषेत केले जातात. दुसरीकडे इंग्रजी सर्वांना येतेच असे नाही. बहुतांश मंडळी इंग्रजी वाचू- लिहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून जनतेला कायद्याच्या ज्ञानापासून वंचित राहावे लागते. याचा विचार करून इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा मराठी अनुवाद अगदी साध्या, सोप्या व सरळ भाषेत केला आहे. एका अर्थाने माझ्या हातून मराठीच्या संवर्धनाचेच कार्य घडले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीपूर्ण ठरू नये. 

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-२००५, लोकपाल व लोकायुक्त कायदा-२०१३, वक्फ कायदा २००५, सन २०१३ च्या सुधारणेसह, वक्फ नियम २००५ सन २०१४ च्या नियमांसह, मुस्लिम वारसा हक्क कायदा, कायदेशीर तलाख, शरियत कायद्याच्या तरतुदीसह, बालविवाह प्रतिबंध कायदा-२००६, अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा-१९८९, स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन विरोधी कायदा १९८६, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम -२०१२, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा-२०१३, भारतीय पारपत्र अधिनियम-१९६७, मानसिक आरोग्य अधिनियम १९८७, अल्संख्याक समाजाच्या व्यक्तींसाठी राज्यघटना व फौजदारी  कायद्यामधील विशेष तरतुदी, ही अ‍ॅड. नवाब पटेल यांची मराठी भाषेतून लिहिलेली अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके आहेत. 

महत्वाची पुस्तके केली प्रकाशित मूळचे उर्दू भाषिक असलेल्या नवाब पटेल यांनी सर्वसामान्य मुस्लिम बंधू-भगिनींसाठी उर्दू भाषेतही महत्त्वाच्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित केली आहेत. ती अशी : वक्फ कानून २००५, कानून बराए विरासत, घरेलू तशददूदसे खवातिन की हिफाजत कानून-२००५, चेक बाऊन्स हुआ तो क्या करे, वक्फ नियम २००५, या त्यांच्या पुस्तकांनाही चांगली मागणी आहे. अ‍ॅड. नवाब पटेल हे पत्रकारितेचे पदव्युत्तर असल्याने ‘असा गेला आठवडा’ हे मराठीतील साप्ताहिकही चालवतात. मराठीच्या संवर्धनासाठी ते करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते पटेल पती-पत्नीचा सत्कारही करण्यात आला होता.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यAurangabadऔरंगाबाद