शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
2
अमेरिका-आयर्लंड सामना रद्द केल्याची घोषणा झाली अन् नंतर आला ट्विस्ट; ५-५ षटकांची मॅच
3
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
4
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
5
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
6
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
8
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
9
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
10
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
11
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
12
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
13
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
14
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
15
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
16
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
17
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
18
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
19
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
20
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...

बीड बायपासवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:25 AM

बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवाहनांच्या सात ते आठ किलो मिटरपर्यंत रांगा लागल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवाहनांच्या सात ते आठ किलो मिटरपर्यंत रांगा लागल्या.शहराची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवर सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत जडवाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. यामुळे जडवाहने कालपर्यंत बीड बायपास रस्त्याचा वापर करीत होते. बीड बायपासवर महिनाभरात पाच जणांचे अपघातात बळी गेले. सततच्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी बायपासवरील जडवाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत प्रवेशबंदी करण्याचा ़निर्णय कालच पोलीस आयुक्तांनी घेतला. प्रायोगिक तत्त्वावर ९ सप्टेंबरपर्यंत हा आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जारी केली. जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयाचा रविवारी पहिला दिवस होता. पोलीस आयुक्तांच्या अधिसूचनेत जालना, बीडकडून येणा-या जडवाहनांना पाचोड-पैठण लिंकरोड किंवा केम्ब्रिज चौक-सावंगी बायपास- फुलंब्री-खुलताबाद-कसाबखेडा या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले. नाशिक आणि धुळ्याकडे येणा-या-जाणा-या जडवाहनांना पैठण लिंकरोड, पाचोड मार्गाचा पर्याय सुचविण्यात आला. एक तर तीन तास एकाच ठिकाणी उभे राहणे; अथवा सुमारे चाळीस ते पन्नास कि.मी. लांबीच्या पर्यायी मार्गाचा वापर करणे, असे दोन पर्याय ट्रक, हायवाचालकासमोर होते. यामुळे दुस-या पर्यायाचा वापर केल्यास अतिरिक्त इंधन खर्च होऊन ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यामुळे जडवाहनचालकांनी रविवारी सकाळी आणि सायंकाळी त्यांचे वाहन आहे तेथे उभे केले. परिणामी, सकाळी ८ ते ११ या वेळेत एकही जडवाहन बीड बायपासने मार्गक्रमण करू शकले नाही. सकाळी ८ ते रात्री ११ या कालावधीत बीड बायपास ते केम्ब्रिज चौकाच्या पुढे आणि बीड रोडवर सुमारे दोन ते अडीच हजार ट्रक, हायवांच्या रांगा लागल्या. तसेच लिंक रोड ते पैठण रोड आणि ए.एस. क्लबच्या पुढे चार ते पाच किमी वाहने उभी होती.स्पीड गण गायब,वेगावर नियंत्रण नाहीबीड बायपास रस्त्यावरील अपघातांमध्ये बºयाचदा वाहनांचा वेग कारणीभूत असल्याचे समोर आले. सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बायपासवर स्पीड गण बसविले होते. मात्र, वर्षभरात स्पीड गण नादुरुस्त झाल्याने बायपासवरून ही यंत्रणा गायब झाली. शिवाय आजपर्यंतच्या अपघातांना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे हे महत्त्वाचे कारण असल्याचे अधिका-यांनी नमूद केले.सर्व्हिस रोड बांधणे गरजेचेबीड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरी वसाहती अस्तित्वात आल्या. या वसाहतींमुळे बायपास आता शहरातील मार्ग झाला. या मार्गाला सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे. सर्व्हिस रस्ता बांधल्यास या मार्गावरील अपघात रोखण्यास मदत हाईल, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी बायपासवरील सर्व्हिस रोड होत नाही.केवळ एकच लेन वाहतुकीसाठी मोकळीवाहनचालकांना बायपासवरील जडवाहनांना प्रवेशबंदीची माहिती नव्हती. यामुळे नेहमीप्रमाणे बायपासने निघालेल्या जडवाहनांना अचानक आहे तेथे थांबण्यास सांगितल्याने बायपासवरील एक लेन जडवाहनांनी व्यापली होती. परिणामी, एकच लेन वाहतुकीसाठी मोकळी होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक