शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात उभारणार ‘मियावाकी घनवन प्रकल्प’; अर्ध्या एकरात लावणार ५ हजार झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 14:33 IST

Miyawaki Forest Project in Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागाकडे जाताना डाव्या बाजूला व संशोधक विद्यार्थी वसतिगृहाजवळील नाल्यालगत अर्धा एकर जागेवर होणार प्रकल्प

ठळक मुद्देराष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मे पर्यंत हा प्रकल्प साकारला जाणार आहे.या प्रकल्पात ‘इकोसत्त्व एन्हायर्नमेंट सोल्युशन्स’ ही संस्था मदत करीत आहे.

औरंगाबाद : कमीत कमी जागेत जास्तीत-जास्त झाडांची लागवड करून घनदाट जंगल निर्माण करण्याचा जपानमध्ये  यशस्वी झाला आहे. हा प्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येणार असून, अवघ्या अर्धा एकर जागेत तब्बल पाच हजार झाडांची याअंतर्गत लागवड करण्यात येणार आहे. विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागाकडे जाताना डाव्या बाजूला व संशोधक विद्यार्थी वसतिगृहाजवळील नाल्यालगत अर्धा एकर जागेवर विविध प्रकारची ५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. 

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मे पर्यंत हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पात ‘इकोसत्त्व एन्हायर्नमेंट सोल्युशन्स’ ही संस्था मदत करीत आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, ‘इकोसत्त्व’च्या संचालक नताशा झरीन, रासेयो संचालक डॉ. टी.आर. पाटील, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, उद्यान अधीक्षक डॉ. गोविंद हुंबे, भारत अभियानच्या प्रकल्प अधिकारी आम्रपाली त्रिभुवन, प्रकल्प व्यवस्थापक सिद्धार्थ इंगळे, प्रेम राजपूत आदींची उपस्थिती होती.

या प्रकल्पाबद्दल रासेयो संचालक डॉ. टी. आर. पाटील म्हणाले की, जपानमधील वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांची ही मूळ संकल्पना आहे. केवळ स्थानिक प्रजातींचा वापर करून रोपांची दाट लागवड केली जाते. रोपे निवडतानाही दुर्मीळ प्रजातींना प्राधान्य देण्यात येते. ज्या मातीची प्रत प्राधान्याने खराब असते, अशा चार स्तरांमध्ये एक ते बारा महिने वयाची रोपे या पद्धतीत लावण्यात येतात. यातून विविध प्रजातींच्या वृक्षांचे जंगल तयार केले जाते. मृदा सर्वेक्षण, प्रजातींची निवड आणि वर्गीकरण, बायोमास सर्वेक्षण, वृक्षारोपण आणि देखभाल असे विविध टप्पे मियावाकी पद्धतीत पार पाडावे लागतात. कोंडा, शेणखत, तणस, जीवामृत, बांबू काठ्या, गूळ, शेण, बेसन आणि गोमूत्र यांचा वापरही माती आणि रोपांच्या संवर्धनासाठी केला जातो.

तीन वर्षांनंतर खर्च करावा लागणार नाहीमियावाकी पद्धतीत समाजाचा सहभाग घेऊन वृक्षारोपण केले जाते. रोपे लावल्यानंतर दहा वर्षांच्या कालावधीत दाट जंगल तयार होण्यास सुरुवात होते. एका एकरात सुमारे १२ हजार झाडे विकसित केली जाऊ शकतात. एक ते तीन वर्षांनंतर या झाडांकरिता कोणताही खर्च करावा लागत नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादenvironmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद