शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

विद्यापीठात उभारणार ‘मियावाकी घनवन प्रकल्प’; अर्ध्या एकरात लावणार ५ हजार झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 14:33 IST

Miyawaki Forest Project in Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागाकडे जाताना डाव्या बाजूला व संशोधक विद्यार्थी वसतिगृहाजवळील नाल्यालगत अर्धा एकर जागेवर होणार प्रकल्प

ठळक मुद्देराष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मे पर्यंत हा प्रकल्प साकारला जाणार आहे.या प्रकल्पात ‘इकोसत्त्व एन्हायर्नमेंट सोल्युशन्स’ ही संस्था मदत करीत आहे.

औरंगाबाद : कमीत कमी जागेत जास्तीत-जास्त झाडांची लागवड करून घनदाट जंगल निर्माण करण्याचा जपानमध्ये  यशस्वी झाला आहे. हा प्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येणार असून, अवघ्या अर्धा एकर जागेत तब्बल पाच हजार झाडांची याअंतर्गत लागवड करण्यात येणार आहे. विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागाकडे जाताना डाव्या बाजूला व संशोधक विद्यार्थी वसतिगृहाजवळील नाल्यालगत अर्धा एकर जागेवर विविध प्रकारची ५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. 

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मे पर्यंत हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पात ‘इकोसत्त्व एन्हायर्नमेंट सोल्युशन्स’ ही संस्था मदत करीत आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, ‘इकोसत्त्व’च्या संचालक नताशा झरीन, रासेयो संचालक डॉ. टी.आर. पाटील, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, उद्यान अधीक्षक डॉ. गोविंद हुंबे, भारत अभियानच्या प्रकल्प अधिकारी आम्रपाली त्रिभुवन, प्रकल्प व्यवस्थापक सिद्धार्थ इंगळे, प्रेम राजपूत आदींची उपस्थिती होती.

या प्रकल्पाबद्दल रासेयो संचालक डॉ. टी. आर. पाटील म्हणाले की, जपानमधील वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांची ही मूळ संकल्पना आहे. केवळ स्थानिक प्रजातींचा वापर करून रोपांची दाट लागवड केली जाते. रोपे निवडतानाही दुर्मीळ प्रजातींना प्राधान्य देण्यात येते. ज्या मातीची प्रत प्राधान्याने खराब असते, अशा चार स्तरांमध्ये एक ते बारा महिने वयाची रोपे या पद्धतीत लावण्यात येतात. यातून विविध प्रजातींच्या वृक्षांचे जंगल तयार केले जाते. मृदा सर्वेक्षण, प्रजातींची निवड आणि वर्गीकरण, बायोमास सर्वेक्षण, वृक्षारोपण आणि देखभाल असे विविध टप्पे मियावाकी पद्धतीत पार पाडावे लागतात. कोंडा, शेणखत, तणस, जीवामृत, बांबू काठ्या, गूळ, शेण, बेसन आणि गोमूत्र यांचा वापरही माती आणि रोपांच्या संवर्धनासाठी केला जातो.

तीन वर्षांनंतर खर्च करावा लागणार नाहीमियावाकी पद्धतीत समाजाचा सहभाग घेऊन वृक्षारोपण केले जाते. रोपे लावल्यानंतर दहा वर्षांच्या कालावधीत दाट जंगल तयार होण्यास सुरुवात होते. एका एकरात सुमारे १२ हजार झाडे विकसित केली जाऊ शकतात. एक ते तीन वर्षांनंतर या झाडांकरिता कोणताही खर्च करावा लागत नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादenvironmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद