शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ समितीस वैद्यनाथ महाविद्यालयाच्या चौकशीस मुभा; मात्र तूर्तास निर्णय घेण्यास मनाई - खंडपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 19:36 IST

संस्थेची अधिकृत कार्यकारिणी व व्यवस्थापनामध्ये वाद-विवाद असल्याचे कारण दाखवून महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची कारवाई विद्यापीठ स्तरावरून करण्यात आली होती.

औरंगाबाद : परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ महाविद्यालयाची विद्यापीठातर्फे नियुक्त समिती चौकशी करू शकेल. मात्र, समितीने तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये, अशा आशयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी आज (दि. १९) दिला.

संस्थेची अधिकृत कार्यकारिणी व व्यवस्थापनामध्ये वाद-विवाद असल्याचे कारण दाखवून महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची कारवाई विद्यापीठ स्तरावरून करण्यात आली होती. त्यास संस्थेतर्फे खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी, संचालक, उच्च शिक्षण पुणे व सहसंचालक उच्च शिक्षण, औरंगाबाद विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार वस्तुनिष्ठ माहिती तपासण्यासाठी व अहवाल सादर करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने २७ डिसेंबर २०२१ रोजीच्या बैठकीत सर्वानुमते ठराव पास केला. व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार कुलगुरूंनी प्रा. डॉ. राजाभाऊ करपे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. यात प्रा. डॉ. करपेंसह डॉ. फुलचंद सलामपुरे, व प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांचा समावेश होता. तिन्ही व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधून निवडून आल्याचे संस्थेच्यावतीने दाखल याचिकेत ॲड. सतीश तळेकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. 

यामुळे चौकशी नि:पक्षपाती व स्वतंत्ररित्या होणार नाही, असा युक्तीवाद करण्यात आला. महाविद्यालयासंबंधी विद्यापीठाकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्याशिवाय चौकशी समिती गठीत करता येणार नाही. महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याचा निर्णय रद्द करावा. कुलगुरू यांनी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार याचिकेचा निकाल लागेपर्यंत कुठलीही आक्षेपार्ह कारवाई करू नये, अशी विनंती करण्यात आली. खंडपीठाने वरील प्रमाणे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण