शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
3
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
4
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
5
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
6
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
7
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
8
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
9
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
10
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
11
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
12
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
13
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
14
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
15
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
16
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
17
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
18
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
19
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?

विद्यापीठ प्रशासनाने मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:56 IST

विद्यापीठाच्या अधिकृत पत्रावर शहराचे चुकीचे नाव लिहिल्यावरून मंगळवारी काँग्रेस पक्षाने धारेवर धरल्यावर विद्यापीठ प्रशासनाने माफी मागितली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अडचणी कमी होण्याचे काही संकेत दिसत नाहीत. एकामागून एक वादविवादात अडकल्यानंतर विद्यापीठाच्या अधिकृत पत्रावर शहराचे चुकीचे नाव लिहिल्यावरून मंगळवारी काँग्रेस पक्षाने धारेवर धरल्यावर विद्यापीठ प्रशासनाने माफी मागितली.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.११) कुलगुरूंची भेट घेऊन विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत लवकर कारवाई सुरू करावी, अशी मागणी केली. यावर कुलगुरूंनी लेखी पत्र देऊन प्राधिकरण निवडणुकांनंतर पुतळ्याबाबत ठरावानुसार योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासनदिले.मात्र, खा. चंद्रकांत खैरे यांच्या नावे दिलेल्या या पत्रावर औरंगाबादऐवजी शहराचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केला. चूक लक्षात आल्यावर विद्यापीठाने सुधारित पत्र काढण्याऐवजी तेथे खोडून हाताने औरंगाबाद लिहिले. विद्यापीठासारख्या स्वायत्त शासकीय संस्थेने शहराचे अधिकृत नाव न वापरता चुकीचे नाव वापरावे याविषयी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी कुलगुरूंची भेट घेऊन या चुकीबाबत खुलासा मागितला. कुलगुरूंच्या दालनात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान कार्यकर्त्यांनी अशी चूक करणाºया संबंधिताला नोकरीवरून बडतर्फ करण्याची मागणी करून विद्यापीठाने जाहीर माफी मागावी, अशी आग्रही भूमिका घेतली. अखेर विद्यापीठाने लेखी पत्राद्वारे याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.‘विद्यापीठाच्या पत्रावर पत्ता टाकताना चुकीचा उल्लेख झाला, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर विद्यापीठ प्रशासन जाहीर दिलगिरी व्यक्त करत आहे’ असे या पत्रात नमूद आहे. यावर कुलसचिवांची स्वाक्षरी आहे. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये शहराध्यक्ष नामदेव पवार, खालेद पठाण, बाबा तायडे,अनिल माळोदे, मोईन कुरेशी, इद्रिस नवाब, सुभाष देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते.मराठा क्रांती मोर्चाचा शुक्रवारी आंदोलनाचा इशाराशिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम त्वरित सुरू करावे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी कुलगुरूंना करण्यातआली.दोन वर्षांपूर्वी ठराव पारित होऊन आर्थिक तरतूद करूनही केवळ काही संघटनांच्या दबावापोटी पुतळ्याचे काम सुरू झालेले नाही. तसेच संजय शिंदे यांची चौकशी न करता त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. हे अधिकाराचे उल्लंघन असून निलंबन तात्काळ रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली.यावर कुलगुरूंनी एक समिती स्थापन करून आठ दिवसांत या प्रकरणावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, शुक्रवारपर्यंत (दि.१५) दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण मराठवाड्यातील समाज विद्यापीठात जोरदार आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यातआला.