शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

विद्यापीठ प्रशासनाने मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:56 IST

विद्यापीठाच्या अधिकृत पत्रावर शहराचे चुकीचे नाव लिहिल्यावरून मंगळवारी काँग्रेस पक्षाने धारेवर धरल्यावर विद्यापीठ प्रशासनाने माफी मागितली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अडचणी कमी होण्याचे काही संकेत दिसत नाहीत. एकामागून एक वादविवादात अडकल्यानंतर विद्यापीठाच्या अधिकृत पत्रावर शहराचे चुकीचे नाव लिहिल्यावरून मंगळवारी काँग्रेस पक्षाने धारेवर धरल्यावर विद्यापीठ प्रशासनाने माफी मागितली.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.११) कुलगुरूंची भेट घेऊन विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत लवकर कारवाई सुरू करावी, अशी मागणी केली. यावर कुलगुरूंनी लेखी पत्र देऊन प्राधिकरण निवडणुकांनंतर पुतळ्याबाबत ठरावानुसार योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासनदिले.मात्र, खा. चंद्रकांत खैरे यांच्या नावे दिलेल्या या पत्रावर औरंगाबादऐवजी शहराचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केला. चूक लक्षात आल्यावर विद्यापीठाने सुधारित पत्र काढण्याऐवजी तेथे खोडून हाताने औरंगाबाद लिहिले. विद्यापीठासारख्या स्वायत्त शासकीय संस्थेने शहराचे अधिकृत नाव न वापरता चुकीचे नाव वापरावे याविषयी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी कुलगुरूंची भेट घेऊन या चुकीबाबत खुलासा मागितला. कुलगुरूंच्या दालनात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान कार्यकर्त्यांनी अशी चूक करणाºया संबंधिताला नोकरीवरून बडतर्फ करण्याची मागणी करून विद्यापीठाने जाहीर माफी मागावी, अशी आग्रही भूमिका घेतली. अखेर विद्यापीठाने लेखी पत्राद्वारे याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.‘विद्यापीठाच्या पत्रावर पत्ता टाकताना चुकीचा उल्लेख झाला, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर विद्यापीठ प्रशासन जाहीर दिलगिरी व्यक्त करत आहे’ असे या पत्रात नमूद आहे. यावर कुलसचिवांची स्वाक्षरी आहे. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये शहराध्यक्ष नामदेव पवार, खालेद पठाण, बाबा तायडे,अनिल माळोदे, मोईन कुरेशी, इद्रिस नवाब, सुभाष देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते.मराठा क्रांती मोर्चाचा शुक्रवारी आंदोलनाचा इशाराशिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम त्वरित सुरू करावे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी कुलगुरूंना करण्यातआली.दोन वर्षांपूर्वी ठराव पारित होऊन आर्थिक तरतूद करूनही केवळ काही संघटनांच्या दबावापोटी पुतळ्याचे काम सुरू झालेले नाही. तसेच संजय शिंदे यांची चौकशी न करता त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. हे अधिकाराचे उल्लंघन असून निलंबन तात्काळ रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली.यावर कुलगुरूंनी एक समिती स्थापन करून आठ दिवसांत या प्रकरणावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, शुक्रवारपर्यंत (दि.१५) दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण मराठवाड्यातील समाज विद्यापीठात जोरदार आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यातआला.