शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रांजणगावात रस्त्यासाठी अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:14 PM

रस्त्याच्या दुरावस्था झाल्यामुळे गुरुवारी महिला व नागरिकांनी अनोखे आंदोलन केले.

वाळूज महानगर : रांजणगावच्या त्रिमूर्ती कॉलनीतील रस्त्याच्या दुरावस्था झाल्यामुळे गुरुवारी महिला व नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महिलांनी रस्त्यावर साड्या बांधून ग्रामपंचायतीचा निषेध केला.

या वसाहतीतील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे त्रिमूर्ती कॉलनीतील रस्त्यावर पाणी साचले असून, नागरिक व वाहनधारकांना चिखल तुडवतच ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वार व वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळे अपघात वाढले आहेत. या भागातील रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला आहे.

मात्र ग्रामपंचायतीकडून रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. गतवर्षीही शिवसेनेच्या वतीने गाढवांच्या मदतीने गावातील खड्डे बुजविण्याची मागणी केली होती.

मात्र, अनेक वसाहतीतील रस्त्याचा प्रश्न निकाल न निघाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन -तीन दिवसांपूर्वीही सेनेचे विभाग प्रमुख कैलास हिवाळे, शहर प्रमुख रावसाहेब भोसले, जावेद शेख, भगवान साळुंके, विशाल काळे, बंडु तरटे, अर्जुन जाधव, अशोक लोहकरे आदींनी गावातील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करुन ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला होता.

ग्रामपंचायत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिक व वाहनधारकात नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :Walujवाळूज