शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दुर्दैवी ! स्वातंत्र्य सैनिकाच्या ८४ वर्षीय विधवेची पेन्शनसाठी दुसरी लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:21 IST

डिसेंबर २०१५ ला कोणतीही  माहिती न देता स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी पेन्शन बंद केली. 

ठळक मुद्देकेंद्राने ३ लाख रुपये  जमा करण्याचे खंडपीठाचे आदेशयाचिकेवर पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.

औरंगाबाद : स्वातंत्र्य सैनिकाच्या ८४ वर्षांच्या विधवेच्या कौटुंबिक पेन्शनपोटी केंद्र शासनाने चार आठवड्यांत ३ लाख रुपये जमा करावेत, असा आदेश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला. याचिकेवर पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.

गोलटगाव (ता. जि. औरंगाबाद)  येथील स्वातंत्र्य सैनिक अर्जुनराव   साळुंके यांना स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजनेंतर्गत  राज्य सरकार  आणि केंद्र सरकारमार्फत  स्वातंत्र्य सैनिक पेन्शन मिळत होते.  १९८६-८७  साली अर्जुनराव यांनी त्यांचा   पी.पी.एफ. अर्जावर  वारस म्हणून  द्रौपदाबाई  यांचे नाव घातले होते.  अर्जुनराव हयात असेपर्यंत  त्यांना पेन्शन मिळत होती.  २०१४ साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी द्रोपदाबाई यांना नोव्हेंबर २०१५ पर्यंत कौटुंबिक पेन्शन मिळाली;  परंतु डिसेंबर २०१५ ला द्रोपदाबाई यांना कोणतीही  माहिती न देता स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी पेन्शन बंद केली. 

याबाबत बँकेकडे विचारणा केली असता  द्रोपदाबाई यांनी हयात प्रमाणपत्र जमा केले नाही म्हणून पेन्शन बंद केल्याचे बँकेने  सांगितले.आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यानंतरही पेन्शन सुरू न केल्यामुळे द्रोपदाबाई यांनी ॲड. संदीप आंधळे यांच्या मार्फत  याचिका दाखल केली होती. प्राथमिक सुनावणीत  खंडपीठाने  ८४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला लवकरात लवकर पेन्शन देण्याची उपाययोजना दोन्ही सरकारने एका आठवड्यात  करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती; परंतु त्यानंतरही याचिकाकर्तीला पेन्शन  मिळाली नाही. म्हणून खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ