शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मुले पळविणारे समजून दोन बहुरूप्यांना जमावाकडून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : चोर समजून आठ दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चांदगाव येथे गावकऱ्यांच्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची ...

ठळक मुद्देपडेगाव येथील घटना : नागरिकांच्या तावडीतून पोलिसांनी केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चोर समजून आठ दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चांदगाव येथे गावकऱ्यांच्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात शुक्र वारी सकाळी मुले पळविणारे असल्याचे समजून शेकडो लोकांनी दोन बहुरूप्यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.मोहननाथ भैरूनाथ सोडा (३८) आणि विक्रमनाथ लालूनाथ भाटी (३५, दोघे रा. हर्सूल सावंगी, मूळ रा. मध्यप्रदेश), अशी मारहाणीत जखमी झालेल्या बहुरूप्यांची नावे आहेत. यापैकी मोहननाथ यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अतीव दक्षता कक्षात दाखल करण्यात आले.छावणी पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मुले पळविणारी टोळी आणि चोरटे फिरत असल्याच्या अफवांचे पेव फुटले आहे. त्यामुळे चोर समजून वाटसरूंनाही मारहाण होण्याच्या घटना घडत आहेत. पडेगाव परिसरातील विविध वसाहतींमध्ये गुरुवारी रात्री लहान मुले पळवून नेऊन त्यांची किडनी विकणारे आणि लहान मुलांना कापून त्यांचे काळीज खाणारे लोक फिरत असल्याची अफवा पसरली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी बहुरूपी मोहननाथ आणि विक्रमनाथ हे पडेगाव परिसरातील नवीन वसाहतीत भिक्षा मागण्यासाठी गेले. शरीराने मजबूत आणि डोक्याचेकेस, दाढीचे खुंट वाढलेल्या अवस्थेतील दोघांना पाहून ते मुले पळविणारेच असल्याचा नागरिकांचा समज झाला. त्यांना पाहताच नागरिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. बघता-बघता सुमारे दीडशे ते दोनशे नागरिक जमा झाले आणि त्यांनी दोघांना मारहाण केली.दरम्यान, नागरिकांनी त्यांची चौकशीही सुरू केली. मारहाण होत असताना दोघेही ‘आम्ही बहुरूपी आहोत’, असे ओरडून सांगत होते. मात्र, कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. येईल तो प्रत्येक नागरिक त्यांना एक-दोन फटके देत होता. यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाले.पोलीस धावलेया घटनेची माहिती छावणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा शेकडो लोकांचे दोन गट मोहननाथ आणि विक्रमनाथला वेगवेगळे घेरून मारहाण करीत होते. या मारहाणीमुळे त्यांच्या अंगावरील कपडे त्यांनी फाडले होते. नागरिकांच्या तावडीतून त्यांची सुटका करून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना घाटीत दाखल करण्यात आले.