शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मुले पळविणारे समजून दोन बहुरूप्यांना जमावाकडून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : चोर समजून आठ दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चांदगाव येथे गावकऱ्यांच्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची ...

ठळक मुद्देपडेगाव येथील घटना : नागरिकांच्या तावडीतून पोलिसांनी केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चोर समजून आठ दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चांदगाव येथे गावकऱ्यांच्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात शुक्र वारी सकाळी मुले पळविणारे असल्याचे समजून शेकडो लोकांनी दोन बहुरूप्यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.मोहननाथ भैरूनाथ सोडा (३८) आणि विक्रमनाथ लालूनाथ भाटी (३५, दोघे रा. हर्सूल सावंगी, मूळ रा. मध्यप्रदेश), अशी मारहाणीत जखमी झालेल्या बहुरूप्यांची नावे आहेत. यापैकी मोहननाथ यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अतीव दक्षता कक्षात दाखल करण्यात आले.छावणी पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मुले पळविणारी टोळी आणि चोरटे फिरत असल्याच्या अफवांचे पेव फुटले आहे. त्यामुळे चोर समजून वाटसरूंनाही मारहाण होण्याच्या घटना घडत आहेत. पडेगाव परिसरातील विविध वसाहतींमध्ये गुरुवारी रात्री लहान मुले पळवून नेऊन त्यांची किडनी विकणारे आणि लहान मुलांना कापून त्यांचे काळीज खाणारे लोक फिरत असल्याची अफवा पसरली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी बहुरूपी मोहननाथ आणि विक्रमनाथ हे पडेगाव परिसरातील नवीन वसाहतीत भिक्षा मागण्यासाठी गेले. शरीराने मजबूत आणि डोक्याचेकेस, दाढीचे खुंट वाढलेल्या अवस्थेतील दोघांना पाहून ते मुले पळविणारेच असल्याचा नागरिकांचा समज झाला. त्यांना पाहताच नागरिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. बघता-बघता सुमारे दीडशे ते दोनशे नागरिक जमा झाले आणि त्यांनी दोघांना मारहाण केली.दरम्यान, नागरिकांनी त्यांची चौकशीही सुरू केली. मारहाण होत असताना दोघेही ‘आम्ही बहुरूपी आहोत’, असे ओरडून सांगत होते. मात्र, कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. येईल तो प्रत्येक नागरिक त्यांना एक-दोन फटके देत होता. यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाले.पोलीस धावलेया घटनेची माहिती छावणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा शेकडो लोकांचे दोन गट मोहननाथ आणि विक्रमनाथला वेगवेगळे घेरून मारहाण करीत होते. या मारहाणीमुळे त्यांच्या अंगावरील कपडे त्यांनी फाडले होते. नागरिकांच्या तावडीतून त्यांची सुटका करून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना घाटीत दाखल करण्यात आले.