शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

अस्वस्थता : भाजप, सेना, राकाँतही

By admin | Published: August 24, 2014 1:04 AM

विजय पाटील, हिंगोली आगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजपात प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पक्षाला बळ मिळण्याऐवजी डोकेदुखीच वाढण्याची शक्यता आहे.

विजय पाटील, हिंगोलीआगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजपात प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पक्षाला बळ मिळण्याऐवजी डोकेदुखीच वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या माजी खा.सूर्यकांता पाटील यांचाही निर्णय होत नाही. तो झाला तर काय भूमिका घ्यायची असा प्रश्न राष्ट्रवादीतील त्यांना मानणाऱ्या गटाला पडला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता आहे.हिंगोली जिल्ह्यावर एकेकाळी शिवसेना-भाजपाचे एकहाती वर्चस्व होते. हळूहळू एकेक गड कोसळत गेला अन् आज पूर्ण जिल्ह्यावरच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. बेरजेच्या राजकारणात कॉंग्रेस व राष्ट्रवादीने घेतलेले परिश्रम फळाला येत गेल्याचा हा परिणाम आहे. मात्र इतर निवडणुकांमध्ये अधून-मधून शिवसेना-भाजपा आपला करिष्मा दाखवतच असते. ही एकजूट पुढे टिकत नाही अन् सगळेच मुसळ केरात जाते, असा आजवरचा अनुभव आहे.सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरणनिर्मितीला प्रारंभ झाला आहे. जो-तो आपापल्या परीने दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. हिेंगोलीत कॉंग्रेसकडून आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे चौथ्यांदा विजयासाठी प्रयत्नरत आहेत. तर भाजपाकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. पक्षातच कमी आहेत म्हणून की काय बाहेरून येणारेही थेट उमेदवारी आणणारच, अशा भीमदेवी थाटात घोषणा करीत आहेत. कॉंग्रेसचे जि.प.सदस्य मिलिंद यंबल यांनी तर भाजपाकडून मुलाखतच दिली. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील या भाजपाच्या वाटेवर असल्याची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वेगवान आहेत. सूर्यकांता पाटील यांच्यामागे पाठबळ उभे करताना आपल्यालाही बळ मिळणार की कसे? याची चाचपणी करून काहीजण निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यातही काही जणांना तर आगामी विधानसभेची उमेदवारीच पाहिजे आहे. त्याच अटीवर त्यांना पुढचा निर्णय घ्यायचा आहे. माजी खा. शिवाजी माने यांची लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेशी झालेली जवळीकही काहींची अस्वस्थता वाढवत आहे. ते राष्ट्रवादीत असले तरी अचानक भगव्याखाली जातील की काय? हाही एक विषय आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत कळमनुरी व वसमत विधानसभा मतदारसंघात सगळे काही आलबेल आहे, असे नाही. भाजपात मात्र बाहेरून येणाऱ्यांमुळे अस्वस्थता आहे. मरगळलेल्या भाजपाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. त्यावेळी आम्ही कमळाला पाणी घातले. आता मात्र बाहेरून येणारे झाडच उपटून आपल्या दारात नेण्याची भाषा करू लागल्याने निष्ठावंत नाराज आहेत. उमेदवारी कोणाला मिळेल, हे अजून निश्चित नाही. त्यामुळे या अस्वस्थेत भर पडणाऱ्या अंतर्गत घडामोडी घडत आहेत. रोज कोणीतरी पक्षश्रेष्ठींकडे जाते. काहीतरी बोलणी करते. त्याची मतदारसंघात पेरणी करते. अशा प्रकारांमुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत अस्वस्थता कायम राहणार आहे.सेनेतील अस्वस्थतेचा वसमतमध्ये उद्रेकशिवसेनेतील दोन गटांच्या राजकारणाबाबत नवे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी सर्वांचेच कान उपटले. मात्र त्यांनी दोन ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमांतच त्याला खतपाणी मिळाले, हे त्यांच्याही लक्षात आले नसावे. एवढ्या बेमालूमपणे सेनेतील मंडळी आपापल्या गटांचा जीवंतपणा सिद्ध करते, असे वैशिष्ट्य असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण असेल. वसमतमध्ये शनिवारी प्रकरण हातघाईवर आले. शिवसेनेचा मेळावाच उधळला गेला. कोणी कोणाला धोपटले हेही कळत नव्हते, इतकी धुमश्चक्री झाली. चक्क संपर्कप्रमुखांनीच काढता पाय घेतला.कळमनुरीत अशीही शांतताकळमनुरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून इच्छुक असलेल्यांची संख्या मुंबईतील मुलाखतींनंतर १९ एवढी झाली आहे. येथून उमेदवारी मिळाली म्हणजे विजय आपलाच असे वाटत असल्याने सगळे काही शांत-शांत आहे. या शांततेत काय दडले? हे कळायला मार्ग नाही.