शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

औरंगाबाद शहरात अनधिकृत मोबाईल टॉवर २९९ , कारवाई मात्र एकावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:53 IST

पुण्यात लोखंडी होर्डिंग कोसळून चार निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर औरंगाबाद शहरातील धोकादायक होर्डिंग, कमानी आणि अनधिकृत मोबाईल टॉवरचा मुद्या ऐरणीवर आला आहे. सोमवारी गादिया विहार परिसरातील शिवनगर येथील एक मोबाईल टॉवर सील करण्यात आले. अनधिकृत इमारतीवरील अनधिकृत टॉवरला सील लावा, अशी तक्रार या भागाच्या नगरसेविका स्मिता घोगरे यांनी प्रशासनाकडे केली होती. शहरात अद्यापही २९९ मोबाईल टॉवर अनधिकृत आहेत. यातील बहुतांश टॉवर गुंठेवारी भागातील अनधिकृत इमारतींवर आहेत. इमारतीची क्षमता नसतानाही हे टॉवर दिमाखात उभे आहेत.

ठळक मुद्देअन्य टॉवरला महापालिकेचे सततचे अभय का?

औरंगाबाद : पुण्यात लोखंडी होर्डिंग कोसळून चार निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर औरंगाबाद शहरातील धोकादायक होर्डिंग, कमानी आणि अनधिकृत मोबाईल टॉवरचा मुद्या ऐरणीवर आला आहे. सोमवारी गादिया विहार परिसरातील शिवनगर येथील एक मोबाईल टॉवर सील करण्यात आले. अनधिकृत इमारतीवरील अनधिकृत टॉवरला सील लावा, अशी तक्रार या भागाच्या नगरसेविका स्मिता घोगरे यांनी प्रशासनाकडे केली होती. शहरात अद्यापही २९९ मोबाईल टॉवर अनधिकृत आहेत. यातील बहुतांश टॉवर गुंठेवारी भागातील अनधिकृत इमारतींवर आहेत. इमारतीची क्षमता नसतानाही हे टॉवर दिमाखात उभे आहेत.चिकलठाणा विमानतळाच्या आजूबाजूला अनेक अनधिकृत वसाहती आहेत. येथेही छोट्या-छोट्या इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. या टॉवरची उंची विमानतळासाठी डोकेदुखी ठरत आहे. विमानतळ प्राधिकरणाने पन्नास वेळेस मनपाकडे टॉवर काढण्याची मागणी केल्यानंतरही प्रशासन कारवाई करायला तयार नाही. जटवाडा रोड, पडेगाव, हर्सूल, जाधववाडी, शहानूरमियाँ दर्गा, शिवाजीनगर, सातारा-देवळाई, टाऊन हॉल, भावसिंगपुरा आदी भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत टॉवर उभारण्यात आले आहेत. इमारत मालकांसोबत करार करून मोबाईल कंपन्यांनी नियम धाब्यावर बसवून टॉवर उभारले आहेत. हे मोबाईल टॉवर दाट नागरी वसाहतींमध्ये आहेत. टॉवर कोसळल्यास अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जाणार हे निश्चित.गादिया विहार परिसरातही अनधिकृत तीन मजली इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतरही मनपा प्रशासन दखल घेत नव्हते. सोमवारी नगरसेविका स्मिता घोगरे यांनी तक्रार दिली. त्यानंतर लगेच अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित टॉवर सील करण्याची कारवाई केली.कोट्यवधींचा महसूल बुडतोयशहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरमुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे. महापालिका प्रशासनाने मोबाईल टॉवरच्या मुद्यावर कधीच गांभीर्याने कारवाई केली नाही. यापूर्वी कंपन्यांना नोटिसा देण्याचे काम चतुर अधिकाऱ्यांनी केले. नोटीस मिळताच काही कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. वर्षानुवर्षे ही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलAurangabadऔरंगाबाद