शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अनेक भागात अघोषित भारनियमन; महावितरणचे फोन बंद, सर्वसामान्यांचे कोण ऐकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 20:06 IST

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुल; महावितरणचे अधिकारी उचलेनात फोन

छत्रपती संभाजीनगर : मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. दाद मागण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावले तर ते फोन उचलत नाहीत. सर्वसामान्यांचे कोण ऐकणार ? नेमकी सायंकाळी वीज गुल होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुलशहरातील रोशन गेट, किराडपुरा, बारी कॉलनी, रहमानिया कॉलनी, रहिमनगर या भागात गुरुवार, शुक्रवार व शनिवारी सलग तीन दिवस सायंकाळी ६:३० ते रात्री ८ वाजेदरम्यान विद्युतपुरवठा खंडित होत आहे. त्याचा येथील व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय सातारा परिसर, देवळाई परिसर, जाधववाडी, चिकलठाणा, छावणी, हिमायतबाग, बायजीपुरा, हर्सूल शहरातील काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. विद्युतपुरवठा कधी खंडित होईल याचा नेम नाही.

कोणीच फोन घेत नाहीमहावितरणची सेवाही अत्यावश्यक सेवेत येते. यामुळे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना २४ तास अलर्ट मोडवर रहावे लागते. विद्युतपुरवठा खंडित होतो त्याचवेळी नागरिक फोन करीत असतात. जेव्हा फ्यूज कॉल सेंटरमध्ये कोणी फोन उचलत नाही त्यावेळेस नागरिक अधिकाऱ्यांना फोन लावतात; पण अधिकारी फोन उचलत नाहीत. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांना फोन लावला असता त्यांनी तो कॉल उचलला नाही.

भारनियमनाची आधी सूचना देणे आवश्यकविजेची मागणी वाढल्यावर व त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यावर भारनियमन केले जाते; मात्र महावितरणची जबाबदारी आहे की त्यांनी भारनियमन करण्याआधी ग्राहकांना सूचना देणे आवश्यक आहे; पण महावितरण आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून आले आहे. शहरात शक्यतो भारनियमन करू नाही. भारनियमनाआधी सूचना देणे व सायंकाळी भारनियमन न करता दुपारी किंवा सकाळी करावे.- रहिम खान, रहिवासी, किराडपुरा

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज