शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अनेक भागात अघोषित भारनियमन; महावितरणचे फोन बंद, सर्वसामान्यांचे कोण ऐकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 20:06 IST

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुल; महावितरणचे अधिकारी उचलेनात फोन

छत्रपती संभाजीनगर : मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. दाद मागण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावले तर ते फोन उचलत नाहीत. सर्वसामान्यांचे कोण ऐकणार ? नेमकी सायंकाळी वीज गुल होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुलशहरातील रोशन गेट, किराडपुरा, बारी कॉलनी, रहमानिया कॉलनी, रहिमनगर या भागात गुरुवार, शुक्रवार व शनिवारी सलग तीन दिवस सायंकाळी ६:३० ते रात्री ८ वाजेदरम्यान विद्युतपुरवठा खंडित होत आहे. त्याचा येथील व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय सातारा परिसर, देवळाई परिसर, जाधववाडी, चिकलठाणा, छावणी, हिमायतबाग, बायजीपुरा, हर्सूल शहरातील काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. विद्युतपुरवठा कधी खंडित होईल याचा नेम नाही.

कोणीच फोन घेत नाहीमहावितरणची सेवाही अत्यावश्यक सेवेत येते. यामुळे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना २४ तास अलर्ट मोडवर रहावे लागते. विद्युतपुरवठा खंडित होतो त्याचवेळी नागरिक फोन करीत असतात. जेव्हा फ्यूज कॉल सेंटरमध्ये कोणी फोन उचलत नाही त्यावेळेस नागरिक अधिकाऱ्यांना फोन लावतात; पण अधिकारी फोन उचलत नाहीत. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांना फोन लावला असता त्यांनी तो कॉल उचलला नाही.

भारनियमनाची आधी सूचना देणे आवश्यकविजेची मागणी वाढल्यावर व त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यावर भारनियमन केले जाते; मात्र महावितरणची जबाबदारी आहे की त्यांनी भारनियमन करण्याआधी ग्राहकांना सूचना देणे आवश्यक आहे; पण महावितरण आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून आले आहे. शहरात शक्यतो भारनियमन करू नाही. भारनियमनाआधी सूचना देणे व सायंकाळी भारनियमन न करता दुपारी किंवा सकाळी करावे.- रहिम खान, रहिवासी, किराडपुरा

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज