शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

अनेक भागात अघोषित भारनियमन; महावितरणचे फोन बंद, सर्वसामान्यांचे कोण ऐकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 20:06 IST

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुल; महावितरणचे अधिकारी उचलेनात फोन

छत्रपती संभाजीनगर : मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. दाद मागण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावले तर ते फोन उचलत नाहीत. सर्वसामान्यांचे कोण ऐकणार ? नेमकी सायंकाळी वीज गुल होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुलशहरातील रोशन गेट, किराडपुरा, बारी कॉलनी, रहमानिया कॉलनी, रहिमनगर या भागात गुरुवार, शुक्रवार व शनिवारी सलग तीन दिवस सायंकाळी ६:३० ते रात्री ८ वाजेदरम्यान विद्युतपुरवठा खंडित होत आहे. त्याचा येथील व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय सातारा परिसर, देवळाई परिसर, जाधववाडी, चिकलठाणा, छावणी, हिमायतबाग, बायजीपुरा, हर्सूल शहरातील काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. विद्युतपुरवठा कधी खंडित होईल याचा नेम नाही.

कोणीच फोन घेत नाहीमहावितरणची सेवाही अत्यावश्यक सेवेत येते. यामुळे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना २४ तास अलर्ट मोडवर रहावे लागते. विद्युतपुरवठा खंडित होतो त्याचवेळी नागरिक फोन करीत असतात. जेव्हा फ्यूज कॉल सेंटरमध्ये कोणी फोन उचलत नाही त्यावेळेस नागरिक अधिकाऱ्यांना फोन लावतात; पण अधिकारी फोन उचलत नाहीत. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांना फोन लावला असता त्यांनी तो कॉल उचलला नाही.

भारनियमनाची आधी सूचना देणे आवश्यकविजेची मागणी वाढल्यावर व त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यावर भारनियमन केले जाते; मात्र महावितरणची जबाबदारी आहे की त्यांनी भारनियमन करण्याआधी ग्राहकांना सूचना देणे आवश्यक आहे; पण महावितरण आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून आले आहे. शहरात शक्यतो भारनियमन करू नाही. भारनियमनाआधी सूचना देणे व सायंकाळी भारनियमन न करता दुपारी किंवा सकाळी करावे.- रहिम खान, रहिवासी, किराडपुरा

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज