शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
2
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
3
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
4
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
5
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
6
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
7
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
8
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
9
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
10
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
11
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
12
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
13
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
14
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
15
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
16
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
17
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
18
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
19
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
20
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...

उलेमा बोर्डाचा वंचितला पाठिंबा; २५ मुस्लिम उमेदवार देणार - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 02:37 IST

कापसाला शासनाने ५ हजार ५०० रु. प्रति क्विंटल भाव जाहीर केला; पण दीड हजार रुपये स्वस्ताने अमेरिकेचा कापूस भारतात येतोय.

औरंगाबाद : ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर केला असून, त्यांच्या पाठिंब्यावर वंचित बहुजन आघाडी एकूण २५ मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवत असल्याची घोषणा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत केली. बोर्डाचे अध्यक्ष मौलवी उस्मान रहमान शेख व नायब अन्सारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

जालना येथील आलुतेदार-बलुतेदार सत्ता संपादन मेळाव्यास मार्गदर्शन करून ते सायंकाळी औरंगाबादेत आले होते. ‘एमआयएम सोडून गेलेली आहे. आम्ही नाही. यशासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा. असदुद्दीन ओवेसी हे मला मोठे भाऊ मानतात. ते नाते अजूनही कायम आहे. फक्त राजकीय संबंध संपले. भूमिका त्यांनी बदलली. आमच्या भूमिकेत बदल झालेला नाही, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, वामनराव चटपांची शेतकरी संघटना, भाकप, माकप, सत्यशोधक कम्युनिष्ट पार्टी, लाल निशाण पक्ष यांच्याशी आमची आघाडी होईल.नेते संपवले, कार्यकर्ते संपवले का हा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजप पक्ष प्रवेशासंबंधाने नोंदवत आंबेडकर म्हणाले, आम्ही भाजपची बी टीम, रा.स्व. संघ धार्जिणे ही टीका मागच्या चाळीस वर्षांपासून सहन करीत आलो आहोत; पण रा.स्व. संघाच्या विरोधात माझ्याइतके ताकदीने लढणारे कुणी नसावे. भान ठेवून टीका केली जायला हवी. अशा टीकेची मला चिंता नाही.

कापसाला शासनाने ५ हजार ५०० रु. प्रति क्विंटल भाव जाहीर केला; पण दीड हजार रुपये स्वस्ताने अमेरिकेचा कापूस भारतात येतोय. याचा अर्थ सरकार भारतीय कापूस उत्पादकांना ३ हजार ५०० च्या वर भाव देऊ शकणार नाही. म्हणजेच ट्रम्पला मोदींनी दिलेल्या टाळीची किंमत मोजावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी १० आॅक्टोबरला कापूस खरेदीचा मुहूर्त काढावा. या निवडणुकीत शेतकरी जातीला महत्त्व देतो की कापसाच्या भावाला हे पाहावयाचे आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.

विरोधी पक्ष जगला नाही तर वाटोळे...एखाद्या दारुड्या माणसासारखी या सरकारची अवस्था झाली आहे. महाराष्ट्रातही २५० जागा आमच्याच निवडून येतील, असा दावा आता मुख्यमंत्री करू लागले आहेत. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत हवा. तो जगला नाही तर वाटोळे होईल. बहुमतामुळे सत्ताधाऱ्यांची वाटचाल जणू हुुकूमशाहीकडेच सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीElectionनिवडणूक