शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

"रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र"

By बापू सोळुंके | Updated: April 25, 2023 19:59 IST

रत्नागिरी रिफायनरी  प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे.

छत्रपती संभाजी नगर: मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प राज्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे आणि बारसू येथेच या प्रकल्पासाठी  योग्य जागा असल्याचे नमूद केले होते, असा खळबळजनक खुलासा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे केला. मात्र, आता ते विरोध करत आहेत, अशा नकारात्मक प्रवृत्तीला उद्योजकांनी  मोडीत काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

चिकलठाणा, शेंद्रा एमआयडीसीतील ७० कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्याच्या विकास कामाचे भूमीपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते  मंगळवारी येथे झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, मसिआ संघटनेचे अध्यक्ष किरण जगताप, माजी उपमहापौर राजू शिंदे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतनकुमार गिरासे, मुख्य अभियंता राजेंद्र केंद्रे, कार्यकारी अभियंता रमेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उद्योगमंत्री म्हणाले की, राज्यातून उद्योग बाहेर गेले की, पत्रकार परिषदा घेऊन आरोप करणाऱ्यांनी आता हा हा प्रकल्प होऊ नये, म्हणून विरोध सुरू केला. रत्नागिरी रिफायनरी  प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी कसा आवश्यक आणि महत्वाचा आहे, याविषयी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना पंतप्रधांनाना पत्र लिहीले होते. आता तेच राजकारणासाठी या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. ही नकारात्मक प्रवृती मोडीत काढण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामंत यांनी केले. यावेळी पालकमंत्री भुमरे यांनी मनोगत व्यक्त करताना एवढ्या वेगाने काम करणारा उद्योगमंत्री आतापर्यंत पाहिला नसल्याचे नमूद करीत सामंत यांचे कौतुक केले. मंत्री सावे, मसिआचे जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

पुढील २५ वर्ष रस्ते टिकले पाहिजेसहा महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आलो होतो,तेव्हा रस्त्याच्या विकासासाठी मसिआ संघटनेने ४० कोटी रुपयांची मागणी केली होती. उदय सामंत यांच्या कार्यकाळात ही रस्ते झाले हे लोकांच्या लक्षात राहण्यासाठी ही रस्ते २५ वर्ष टिकतील अशी मजबूत बांधा,असे निर्देश त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. हे काम चांगले करून घेण्याची जबाबदारी मसिआची आहे. यात कुठेही निकृष्ट दर्जा दिसल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी उद्योजकांना सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद