शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

"रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र"

By बापू सोळुंके | Updated: April 25, 2023 19:59 IST

रत्नागिरी रिफायनरी  प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे.

छत्रपती संभाजी नगर: मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प राज्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे आणि बारसू येथेच या प्रकल्पासाठी  योग्य जागा असल्याचे नमूद केले होते, असा खळबळजनक खुलासा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे केला. मात्र, आता ते विरोध करत आहेत, अशा नकारात्मक प्रवृत्तीला उद्योजकांनी  मोडीत काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

चिकलठाणा, शेंद्रा एमआयडीसीतील ७० कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्याच्या विकास कामाचे भूमीपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते  मंगळवारी येथे झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, मसिआ संघटनेचे अध्यक्ष किरण जगताप, माजी उपमहापौर राजू शिंदे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतनकुमार गिरासे, मुख्य अभियंता राजेंद्र केंद्रे, कार्यकारी अभियंता रमेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उद्योगमंत्री म्हणाले की, राज्यातून उद्योग बाहेर गेले की, पत्रकार परिषदा घेऊन आरोप करणाऱ्यांनी आता हा हा प्रकल्प होऊ नये, म्हणून विरोध सुरू केला. रत्नागिरी रिफायनरी  प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी कसा आवश्यक आणि महत्वाचा आहे, याविषयी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना पंतप्रधांनाना पत्र लिहीले होते. आता तेच राजकारणासाठी या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. ही नकारात्मक प्रवृती मोडीत काढण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामंत यांनी केले. यावेळी पालकमंत्री भुमरे यांनी मनोगत व्यक्त करताना एवढ्या वेगाने काम करणारा उद्योगमंत्री आतापर्यंत पाहिला नसल्याचे नमूद करीत सामंत यांचे कौतुक केले. मंत्री सावे, मसिआचे जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

पुढील २५ वर्ष रस्ते टिकले पाहिजेसहा महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आलो होतो,तेव्हा रस्त्याच्या विकासासाठी मसिआ संघटनेने ४० कोटी रुपयांची मागणी केली होती. उदय सामंत यांच्या कार्यकाळात ही रस्ते झाले हे लोकांच्या लक्षात राहण्यासाठी ही रस्ते २५ वर्ष टिकतील अशी मजबूत बांधा,असे निर्देश त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. हे काम चांगले करून घेण्याची जबाबदारी मसिआची आहे. यात कुठेही निकृष्ट दर्जा दिसल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी उद्योजकांना सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद