शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महाराष्ट्र निवडणूक 2019: आता तरी कागदी घोडे नाचवू नका; शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 15:29 IST

बळीराजाला देण्यात आलेल्या मदतीवरून दोन्ही पक्षांमधले मतभेद समोर आलेले आहेत.

औरंगाबादः महाराष्ट्राच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. सत्तावाटपाचा संघर्ष दोन्ही पक्षांकडून शिगेला पोहोचला आहे. भाजपा शिवसेनेला सत्तेत झुकतं माप देण्यास तयार नाही. प्रसंगी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू, असा इशारा दिल्यानंतर शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेत आमचाच मुख्यमंत्री बसवू, असं म्हटलं आहे. त्यामुळे दोघांमधला हा संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच आता बळीराजाला देण्यात आलेल्या मदतीवरून दोन्ही पक्षांमधले मतभेद समोर आलेले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मराठवाड्याचा दौरा केला असून, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल भूमिका स्पष्ट केली. 

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत द्यावी, जास्त कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना मदत करावी. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी असल्याचीही टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. मी शेतकऱ्यांना भेटी दिल्या, अधिकाऱ्यांची भेट घेतली. पाहणी दौरा हा काय हेलिकॉप्टरमधून करण्याचा दौरा नाही. शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे. हाततोंडाशी आलेला घास आता हिरावून घेतलेला आहे. जी पिकं घराला आधार देतील, अशा परिस्थितीत होती. ती एका रात्रीत मातीमोल झाली. चारासुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांसमोर गुरांना चारा कसा द्यायचा हाही प्रश्न आहे. या परिस्थितीवर मात करणं हे फार गरजेचं असल्याचंही प्रतिपादनही उद्धव ठाकरेंनी केलं आहे.शेतकरी म्हणतात, आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. मी सांगितलं असा शब्दही तुम्ही काढू नका. आत्महत्या करून तुम्ही तुमचं घर पोरखं करू नका. या संकटांत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याचाच चिखल झालेला आहे, त्याला चिखलातून बाहेर काढू या, शेतकऱ्यांना येणाऱ्या बँकांच्या नोटीस तातडीनं थांबवाव्यात.  शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारनंदेखील पुढाकार घ्यावा. तांत्रिक बाबींमध्ये अडकवू नका. माणुसकीतून मदत करा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019