शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धवसेनेने रोखला महावीर चौक; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

By बापू सोळुंके | Updated: June 12, 2025 17:37 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी तसेच महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गुुरुवारी सकाळी  शहरातील महावीर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे. यांतर्गत बुधवारी शहरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आज महावीर चौक(बाबा पेट्रोल पंप )येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. उद्धवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.  शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे...शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळालाच पाहिजे...लबाड सरकार मुर्दाबाद.. आश्वासन देऊन पळ काढणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी काही काळ रस्ता रोखून धरला. यामुळे चौकात आलेली  वाहने काही काळ एकाच ठिकाणी थांबली होती. 

शहरातील मुख्य चौकच अडविल्याने  पोलिसांनी आ.दानवे यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. क्रांती चौक पोलीस स्टेशनात नेल्यानंतर त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनात महानगरप्रमुख राजू वैद्य, अरविंद धिवर, संतोष जेजुरकर, अशोक शिंदे, विजय वाघमारे, संतोष खेंडके, विठ्ठल बदर पाटील, चंद्रकांत गवई, दिग्विजय शेरखाने, वीरभद्र गादगे, सचिन तायडे, संजय मोटे, शंकरराव ठोंबरे, विष्णू जाधव, विशाल खंडागळे, बापू कवळे, जयसिंग होलीये, प्रमोद ठेंगडे, संजय बापू पवार, रवी गायकवाड, रामेश्वर कोरडे, सुनिता आऊलवार, सुनिता देव, दुर्गा भाटी, आशा दातार, सुकन्या भोसले आदींनी सहभाग नोंदविला.

१० कलमी योजना राबवाव्यातमहायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. राज्य सरकारला शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याने लबाड सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात यावा. तसेच विधानसभा निवडणूक दरम्यान आश्वासन दिलेल्या १० कलमी योजना राबविण्यात याव्या, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांनी गुलाबी फेटा, धोतर आणि कुर्ता घालून शेतकऱ्यांचा आसूड पुस्तकांचे लेखक व दिवंगत थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या पेहरावात या आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन