शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धवसेनेने रोखला महावीर चौक; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

By बापू सोळुंके | Updated: June 12, 2025 17:37 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी तसेच महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गुुरुवारी सकाळी  शहरातील महावीर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे. यांतर्गत बुधवारी शहरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आज महावीर चौक(बाबा पेट्रोल पंप )येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. उद्धवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.  शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे...शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळालाच पाहिजे...लबाड सरकार मुर्दाबाद.. आश्वासन देऊन पळ काढणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी काही काळ रस्ता रोखून धरला. यामुळे चौकात आलेली  वाहने काही काळ एकाच ठिकाणी थांबली होती. 

शहरातील मुख्य चौकच अडविल्याने  पोलिसांनी आ.दानवे यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. क्रांती चौक पोलीस स्टेशनात नेल्यानंतर त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनात महानगरप्रमुख राजू वैद्य, अरविंद धिवर, संतोष जेजुरकर, अशोक शिंदे, विजय वाघमारे, संतोष खेंडके, विठ्ठल बदर पाटील, चंद्रकांत गवई, दिग्विजय शेरखाने, वीरभद्र गादगे, सचिन तायडे, संजय मोटे, शंकरराव ठोंबरे, विष्णू जाधव, विशाल खंडागळे, बापू कवळे, जयसिंग होलीये, प्रमोद ठेंगडे, संजय बापू पवार, रवी गायकवाड, रामेश्वर कोरडे, सुनिता आऊलवार, सुनिता देव, दुर्गा भाटी, आशा दातार, सुकन्या भोसले आदींनी सहभाग नोंदविला.

१० कलमी योजना राबवाव्यातमहायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. राज्य सरकारला शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याने लबाड सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात यावा. तसेच विधानसभा निवडणूक दरम्यान आश्वासन दिलेल्या १० कलमी योजना राबविण्यात याव्या, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांनी गुलाबी फेटा, धोतर आणि कुर्ता घालून शेतकऱ्यांचा आसूड पुस्तकांचे लेखक व दिवंगत थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या पेहरावात या आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन