शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षे, 70,000 किलोमीटरचा प्रवास; शहिदांच्या मृतिकेसाठी एका वेड्याचे साहस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 14:44 IST

सैनिकांना घडविणारी त्यांच्या जन्मभूमीची, त्यांच्या अंगणातली माती जमा करण्याचा प्रयत्न उमेश संपूर्ण भारतात फिरून करीत आहेत.

ठळक मुद्देशहिदांच्या आठवणी वेचणारा अवलिया  संगीतकार उमेश जाधव यांची अनोखी देशभक्तीलष्कराच्या परवानगीने ९ एप्रिल २०१९ रोजी बंगळुरू येथून प्रवास सुरू

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : श्रीनगर ते कन्याकुमारी अन्‌ गुजरात ते मिझोराम असा तो अवलिया झपाटल्यासारखा अखंड फिरतो  आहे. उद्देश फक्त एकच भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सैनिकांना घडविणाऱ्या मातीला म्हणजेच त्यांच्या जन्मभूमीला नमन करून ती माती आपल्या भाळी लावणे आणि या सर्व वीर शहिदांच्या स्मृतीतून भारतीयत्वाचा संदेश देणारे स्मारक त्या मातीतून उभारणे. औरंगाबादचे रहिवासी उमेश गोपीनाथ जाधव यांची ही अनोखी देशभक्ती रोमांचित करणारी आहे. ‘तेरी मिट्टी मे मिलजावा, गुल बन कें मै खिलजावा, इतनी सी हैं दिलकी आरजू....’ हेच स्वप्न बघत भारताचे वीर सुपुत्र प्राणपणाने लढत अखेरीस शहिद होतात. या सैनिकांना घडविणारी त्यांच्या जन्मभूमीची, त्यांच्या अंगणातली माती जमा करण्याचा प्रयत्न उमेश संपूर्ण भारतात फिरून करीत आहेत.

संगीताची आवड असलेले उमेश सध्या बंगळुरूत  स्थायिक आहेत.  या रोमांचकारी प्रवासाविषयी सांगताना ते म्हणाले की, पुलवामा हल्ल्याची बातमी कानावर आली. या हल्ल्यात जर माझ्या घरातील व्यक्ती शहीद झाली असती, तर मी काय केले असते, हा विचार मनात डोकावला आणि मी शहारून गेलो. या सैनिकांसाठी काहीतरी करावे, असे मनापासून वाटू लागले. यातूनच आजवर भारतासाठी लढताना विविध युद्धांत शहीद झालेल्या जवानांच्या जन्मभूमीची माती जमा करण्याचा विचार दिनेशला सुचला. भारतीय लष्कराच्या परवानगीने ९ एप्रिल २०१९ रोजी उमेश यांचा प्रवास बंगळुरू येथून सुरू झाला. तेथील सीआरपीएफचे डीआयजी सानंद कमल यांनी फ्लॅगऑफ करून उमेश यांच्या प्रवासाची सुरुवात करून दिली. ९ एप्रिल २०२० ला हा प्रवास पूर्ण होणार होता. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रवास थांबला. २१ ऑक्टोबरपासून उमेश यांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आजवर त्यांनी ७० हजार कि.मी.चा प्रवास करून ९० शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांच्या घरासमोरील माती घेतली आहे. पुलवामा घटनेतील ४० शहीद जवानांच्या घरासमोरील माती त्यांनी लष्काराकडे सुपूर्तही केली आहे. आता अंदमान लक्षद्वीप, लडाख आणि हिमाचल या चार राज्यांचा प्रवास करून ९ एप्रिल २०२१ रोजी हा प्रवास पूर्ण करण्याचा उमेश यांचा मानस आहे.

वाटेत भेटणाऱ्या सामान्य लोकांकडून मिळणारी मदत आणि स्वत:जवळचे भांडवल या जोरावर उमेश यांचा प्रवास सुरू आहे. या प्रवासात उमेश सध्या पुणे येथून औरंगाबादला आले असून, ते नाशिकमार्गे सिल्वासा येथे जाणार आहेत. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या जवानांच्या तिसऱ्या पिढीला भेटून आणि हायफा युद्धातील म्हैसूर लॅन्सर यांच्या घरी जाऊनही उमेश यांनी माती घेतली आहे. एका चारचाकी गाडीला दुसरी चारचाकी जाेडून         उमेश यांचा प्रवास सुरू आहे. गाडीवर लिहिलेले देशभक्तीपर संदेश पाहूनच अनेकांच्या मनात आदरभाव दाटून येतात.

डोळ्यांत दाटले पाणीऔरंगाबाद जिल्ह्यातील गायकवाड कुटुंबात उमेश गेले असता, त्यांच्या घरात लग्नाची लगबग दिसून आली. १७ महिन्यांची असताना ज्या चिमुकलीचे वडील शहीद झाले होते, आज तिच्याच लग्नासाठी घर सजले होते. आपल्या वडिलांच्या आठवणी जागवत ऐन लग्नाच्या वेळी आलेले उमेश पाहून त्या नवरीला आणि घरातील प्रत्येकालाच भावना आवरणे कठीण झाले होते. असाच अनुभव प्रत्येक घरात येतो आणि अगदी कालच घटना घडली असावी एवढे ते लोक भावनिक होतात, असे उमेश यांनी सांगितले. 

टॅग्स :MartyrशहीदAurangabadऔरंगाबादBengaluruबेंगळूरSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान