शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

रांजणगावातून दुचाकी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:04 IST

वाळूज महानगर : रांजणगावातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पांडुरंग नागवे ...

वाळूज महानगर : रांजणगावातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पांडुरंग नागवे (रा. चिकलठाण) यांनी ७ मार्चला रांजणगावातील कमळापूररोडवर दुचाकी (क्र. एमएच २०, एफआर ८७२८) उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.

---------

यश फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

वाळूज महानगर : साउथसिटीतील यश फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जीपीएटी या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत पवन बिगरड, भगवान झोटे, राजेंद्र खरात, ऋषिकेश लिंगायत, अयोध्या तोतरे, पूजा करपे, सतीश कुरधणे, कैलास सोनपसारे, प्रा. रेखा गजरे या नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या यशाबद्दल प्राचार्य व संस्थेच्या अध्यक्षांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

-------------------------

प्रेस मशीनवर महिला कामगाराचा अपघात

वाळूज महानगर : प्रेस मशीनवर काम करताना ३५ वर्षीय महिला कामगाराची दोन बोटे तुटल्याची घटना वाळूज एमआयडीसीतील प्रेस कंपनीत घडली. सरिता राजू ढेंबरे (३५, रा. बजाजनगर) या १८ मार्चला प्रेस मशीनवर काम करीत असताना मशीनमध्ये हात अडकून त्यांचा अंगठा व एक बोट तुटले. यानंतर जखमी सरिता ढेंबरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जखमी महिलेच्या तक्रारीवरून व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------------------

पर्यायी रस्त्याअभावी वाहनधारकांची गैरसोय

वाळूज महानगर : रांजणगाव ते फाटा या रस्त्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी रस्ता नसल्यामुळे गावातून तसेच बाहेरहून गावात येणाऱ्या वाहनधारकांना मोठा वळसा टाकून ये-जा करावी लागत आहे. गत पंधरा दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना नागरी वसाहतीतील अरुंद रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. रस्त्याचे काम करण्यापूर्वी पर्यायी रस्त्याची व्यवस्था न करण्यात आल्याने वाहनधारकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

------------------------

वाळूजला भाजीपाल्याचे भाव गडगडले

वाळूज महानगर : वाळूजला सोमवारी आठवडी बाजारात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने ग्राहकांनी स्वस्तात भाजीपाला खरेदी केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शनिवार व रविवार पूर्ण लॉकडाऊन केल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करता आला नव्हता. सोमवारच्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणला होता. मात्र ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांनी स्वस्तात भाजीपाला विक्री केला.