शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक, अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 18:46 IST

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गोळेगाव जवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ट्रकमधील दोन जणांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देघटनास्थळी दोन जणांचा तडफडून मृत्यूरुग्णवाहिका घटनास्थळी उशिराने दाखल, स्थानिकांचा आरोप

सिल्लोड : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गोळेगाव जवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ट्रकमधील दोन जणांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तर दुसऱ्या ट्रकमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.  शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मोहमद शोकेनखान नासिबखान आणि मुस्तकीम गणी अशी मृतांची नावे आहेत.  जितेंद्र बुनकर आणि सुंदर रामकीसन हे दोघे जण जखमी झाले आहेत.  

गोळेगाव येथे गजानन महाराज मंदिरासमोर हा अपघात झाला. जळगावहून गहूची वाहतूक करणारा ट्रक सिल्लोडच्या दिशेनं जात होता. यावेळेस ओव्हरटेक करताना या ट्रकची औरंगाबाद हून जळगावकडे लिंबू घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक बसली. 

हा अपघात इतका भीषण होता की मृत्युमुखी पडलेले  दोन्ही जण गाड्यांच्या मध्ये दाबले गेले. गोळेगावातील युवकांनी त्यांची सुटका करुन रुग्णवाहिकेला फोन लावला. पण रुग्णवाहिका  घटनास्थळी उशिरा पोहोचल्यानं दोघांचा तडफडून मृत्यू झाला. वेळेवर रुग्णवाहिका आली असती तर कदाचित या दोघांचे प्राण वाचू शकले असते. दरम्यान,  108 क्रमांकावर मदत घेतली असता रुग्ण वाहिका कधीच वेळेवर उपलब्ध होत नाही, असा आरोप गोळेगाव येथील युवकांनी केला आहे. यावेळी सिल्लोडचे नगरसेवक सुनील मिरकर यांनी  त्यांची रुग्णवाहिका पाठवून जखमींना सिल्लोड येथे उपचारांसाठी घेऊन गेली. तरीही शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.

या अपघातमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद