शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

तडा गेलेल्या रुळावरून दोन रेल्वे गेल्या; वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रवासी बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 11:31 IST

जोडावरची वेल्डिंग तुटल्यामुळे घडली घटना, तातडीने तासाभरात दुरुस्ती करण्यात आली

औरंगाबाद : मुख्य रेल्वेस्थानकातून मुकुंदवाडीच्या दिशेने जाणारी रेल्वे राजनगर येथील तडा गेलेल्या रुळावर गेल्याचा प्रकार सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर तात्काळ दुरुस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात पुन्हा वेल्डिंगचा मजबुत जोड दिला. तसेच निखळलेल्या क्लिपा जोडल्या. या घटनेत रुळावरुन जाणाऱ्या रेल्वेची गती आवघ्या २० वर होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून रेल्वे प्रवासी बालंबाल बचावल्याचे पुढे आले आहे.

उन्हाळ्यामध्ये रेल्वेचे रुळ हे प्रसरण पावत असतात. त्यांची लांबी-रुंदी वाढत असते. हे सर्व उन्हामुळे घडते. गरम झालेल्या पटरीवरुन वजनदार रेल्वे गेल्यामुळे हा प्रकार होतो. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर रेल्वे पटरीच्या खाली असलेला पायटा माती दबल्यास त्याठिकाणी पम्पिंग होते. अशा ठिकाणाहुन रेल्वे गेल्यामुळे रुळाच्या मध्यभागालाही क्रॅक जाण्याची शक्यता अधिक असते. त्याच पद्धतीचा प्रकार रविवारी सकाळी मुकुंदवडी ते चिकलठाणा रेल्वेस्थानकादरम्यान राजनगर येथे घटना घडली.

जनशताब्दी एक्सप्रेस रुळावरुन गेल्यानंतर त्या गाडीच्या चालकाला रुळावर मोठा आवाज झाल्याचे कळले. त्यामुळे त्या चालकांने तात्काळ माहिती रेल्वे विभागाला कळविली. या रेल्वेच्या नंतर आलेली मराठवाडा एक्सप्रेस गाडीही क्रॅक गेलेल्या रुळावरुनच गेली. या गाडीचा वेग अतिशय कमी होता. त्यामुळे रेल्वे रुळ बाजूला सरकले नाहीत. अन्यथा वेगात गाडी असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी दिली. मराठवाडा एक्सप्रेस गाडी क्रॅक झालेल्या रुळावरुन गेल्यानंतर रेल्वेच्या अभियंत्रिकी विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. या पथकाने सुरुवातीला क्लॅम पट्टी लावली. त्यानंतर काही वेळातच रुळाला वेल्डिंगने जोडून घेत दुरुस्ती केली. यानंतर काही वेळातच रुळावरुन रेल्वे गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

चालकाने दिली कल्पनाजनशताब्दी एक्सप्रेस गाडी रेल्वे रुळावरुन गेल्यानंतर मोठा आवाज झाल्याची माहिती चालकाने दिल्यामुळे पुढील घटनांची दुर्घटना टळली आहे. हा सर्व प्रकार रेल्वे विभागासाठी रुटीनचाच प्रकार असल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे