शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

तडा गेलेल्या रुळावरून दोन रेल्वे गेल्या; वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रवासी बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 11:31 IST

जोडावरची वेल्डिंग तुटल्यामुळे घडली घटना, तातडीने तासाभरात दुरुस्ती करण्यात आली

औरंगाबाद : मुख्य रेल्वेस्थानकातून मुकुंदवाडीच्या दिशेने जाणारी रेल्वे राजनगर येथील तडा गेलेल्या रुळावर गेल्याचा प्रकार सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर तात्काळ दुरुस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात पुन्हा वेल्डिंगचा मजबुत जोड दिला. तसेच निखळलेल्या क्लिपा जोडल्या. या घटनेत रुळावरुन जाणाऱ्या रेल्वेची गती आवघ्या २० वर होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून रेल्वे प्रवासी बालंबाल बचावल्याचे पुढे आले आहे.

उन्हाळ्यामध्ये रेल्वेचे रुळ हे प्रसरण पावत असतात. त्यांची लांबी-रुंदी वाढत असते. हे सर्व उन्हामुळे घडते. गरम झालेल्या पटरीवरुन वजनदार रेल्वे गेल्यामुळे हा प्रकार होतो. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर रेल्वे पटरीच्या खाली असलेला पायटा माती दबल्यास त्याठिकाणी पम्पिंग होते. अशा ठिकाणाहुन रेल्वे गेल्यामुळे रुळाच्या मध्यभागालाही क्रॅक जाण्याची शक्यता अधिक असते. त्याच पद्धतीचा प्रकार रविवारी सकाळी मुकुंदवडी ते चिकलठाणा रेल्वेस्थानकादरम्यान राजनगर येथे घटना घडली.

जनशताब्दी एक्सप्रेस रुळावरुन गेल्यानंतर त्या गाडीच्या चालकाला रुळावर मोठा आवाज झाल्याचे कळले. त्यामुळे त्या चालकांने तात्काळ माहिती रेल्वे विभागाला कळविली. या रेल्वेच्या नंतर आलेली मराठवाडा एक्सप्रेस गाडीही क्रॅक गेलेल्या रुळावरुनच गेली. या गाडीचा वेग अतिशय कमी होता. त्यामुळे रेल्वे रुळ बाजूला सरकले नाहीत. अन्यथा वेगात गाडी असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी दिली. मराठवाडा एक्सप्रेस गाडी क्रॅक झालेल्या रुळावरुन गेल्यानंतर रेल्वेच्या अभियंत्रिकी विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. या पथकाने सुरुवातीला क्लॅम पट्टी लावली. त्यानंतर काही वेळातच रुळाला वेल्डिंगने जोडून घेत दुरुस्ती केली. यानंतर काही वेळातच रुळावरुन रेल्वे गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

चालकाने दिली कल्पनाजनशताब्दी एक्सप्रेस गाडी रेल्वे रुळावरुन गेल्यानंतर मोठा आवाज झाल्याची माहिती चालकाने दिल्यामुळे पुढील घटनांची दुर्घटना टळली आहे. हा सर्व प्रकार रेल्वे विभागासाठी रुटीनचाच प्रकार असल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे