शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश गवई म्हणाले- पहलगाम विसरू शकत नाही
3
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
4
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
5
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
6
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
7
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
8
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
9
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
10
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
11
लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
12
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
13
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
14
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
15
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
16
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
17
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
18
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
19
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

‘दुरंगी ते तिरंगी’; पाच वर्षांत निर्माण झाला राष्ट्रध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:02 IST

स्वातंत्र्य सेनानी पिंग़ली व्यंकय्या मूळ ध्वजाचे निर्माते प्रभुदास पाटोळे औरंगाबाद : सुमारे ५ वर्षांपर्यंत ३० वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजांवरील संशोधनातून, ...

स्वातंत्र्य सेनानी पिंग़ली व्यंकय्या मूळ ध्वजाचे निर्माते

प्रभुदास पाटोळे

औरंगाबाद : सुमारे ५ वर्षांपर्यंत ३० वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजांवरील संशोधनातून, वेळोवेळी बदल होऊन, भारतीयांची आण, बाण आणि शान असलेल्या ‘तिरंगा’ राष्ट्रध्वजाची निर्मिती झाली. राष्ट्रध्वजाचा मूळ आराखडा (डिझाइन) आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमजवळील भातलापेनुमारू येथील स्वातंत्र्यसेनानी पिंगली व्यंकय्या यांनी केली होती.

राष्ट्रध्वजाची रचना

काकीनाडा येथे आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान व्यंकय्या यांनी भारताचा स्वतःचा राष्ट्रध्वज असावा, असे सुचविले. गांधीजींना त्यांची कल्पना आवडली. गांधीजींनी त्यांना राष्ट्रध्वजाचा मसुदा तयार करण्याचे सुचविले होते. १९१६ ते १९२१ असे सुमारे ५ वर्षांपर्यंत ३० वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजावरील संशोधनातून व्यंकय्या यांनी तयार केलेला लाल आणि हिरवा पट्टा असलेला झेंडा १९२१ला विजयवाडा येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात दाखविला. यानंतरच देशातील काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिवेशनांमध्ये दोन रंगांचा ध्वज वापरण्यात आला होता. परंतु त्यावेळी काँग्रेसने या ध्वजाला अधिकृतपणे मान्यता दिली नव्हती. प्रगती आणि सामान्य माणसाचे प्रतीक असलेल्या चाकाचा समावेश या ध्वजात करण्यात आला. त्यानंतर गांधीजींच्या सूचनेनुसार व्यंकय्या यांनी शांततेचे प्रतीक असलेला पांढरा रंग राष्ट्रध्वजामध्ये समाविष्ट केला. १९३१ मध्ये कराची येथील अखिल भारतीय परिषदेत भगवा, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांनी बनलेला ध्वज काँग्रेसने एकमताने स्वीकारला. नंतर तिरंग्याच्या मध्यभागी फिरकीची जागा अशोकचक्राने घेतली.

असे झाले ध्वजामध्ये बदल

१. पहिला ध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी कोलकात्यातील पारशी बागान (आताचा 'ग्रीन पार्क') येथे हिरवा, पिवळा आणि लाल या तीन रंगांचे पट्टे असलेला ध्वज फडकविण्यात आला होता. त्यातील हिरव्या पट्टीवर ८ पांढरी कमळाची फुले, पिवळ्या पट्टीवर गडद निळ्या रंगात 'वंदे मातरम' लिहिलेले आणि लाल पट्टीवर डावीकडील सूर्य आणि उजवीकडील चंद्रकोर पांढऱ्या रंगात बनवण्यात आली होती.

२. दुसरा ध्वज २२ ऑगस्ट १९०७ रोजी केवळ भारतातच नव्हे तर जर्मनीच्या स्टटगार्टमध्ये मॅडम कामा यांनी फडकवला होता. यामध्ये हिरव्या पट्ट्यावर ८ फुललेली कमळाची फुले, मधल्या पिवळ्या पट्टीवर 'वंदे मातरम' कोरलेले आणि सर्वांत खालच्या लालपट्टीवर डावीकडे सूर्य आणि उजवीकडे चंद्र होता.

३. तिसरा ध्वज डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 'स्वराज्य चळवळी' दरम्यान फडकवला होता. यात ५ लाल आणि ४ हिरवे पट्टे , ७ तारे म्हणजे 'सप्तर्षी' डाव्या बाजूला ‘युनियन जॅक’ही कोरलेला होता.

४. चौथा ध्वज १९२१ मध्ये पांढरा, हिरवा आणि भगवा रंगाचा पट्टा आणि मध्यभागी निळा चरखा (कताईचे चाक) असलेला ध्वज गांधीजींनी विजयवाडा येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत स्वीकारला. हा ध्वज दहा वर्षे सर्वांसाठी वैध राहिला.

५. पाचवा ध्वज २२ जुलै १९४७ रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या सात सदस्यांनी भगवा, पांढरा आणि हिरवा असे पट्टे आणि मध्यभागी निळे 'अशोक चक्र' असलेला ध्वज पंडित जवाहरलाल नेहरूंमार्फत संविधान सभेपुढे सादर केला. संविधान सभेने हा ध्वज स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला होता. तोच आजचा आपला तिरंगा राष्ट्रध्वज होय.