शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

‘दुरंगी ते तिरंगी’; पाच वर्षांत निर्माण झाला राष्ट्रध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:02 IST

स्वातंत्र्य सेनानी पिंग़ली व्यंकय्या मूळ ध्वजाचे निर्माते प्रभुदास पाटोळे औरंगाबाद : सुमारे ५ वर्षांपर्यंत ३० वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजांवरील संशोधनातून, ...

स्वातंत्र्य सेनानी पिंग़ली व्यंकय्या मूळ ध्वजाचे निर्माते

प्रभुदास पाटोळे

औरंगाबाद : सुमारे ५ वर्षांपर्यंत ३० वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजांवरील संशोधनातून, वेळोवेळी बदल होऊन, भारतीयांची आण, बाण आणि शान असलेल्या ‘तिरंगा’ राष्ट्रध्वजाची निर्मिती झाली. राष्ट्रध्वजाचा मूळ आराखडा (डिझाइन) आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमजवळील भातलापेनुमारू येथील स्वातंत्र्यसेनानी पिंगली व्यंकय्या यांनी केली होती.

राष्ट्रध्वजाची रचना

काकीनाडा येथे आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान व्यंकय्या यांनी भारताचा स्वतःचा राष्ट्रध्वज असावा, असे सुचविले. गांधीजींना त्यांची कल्पना आवडली. गांधीजींनी त्यांना राष्ट्रध्वजाचा मसुदा तयार करण्याचे सुचविले होते. १९१६ ते १९२१ असे सुमारे ५ वर्षांपर्यंत ३० वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजावरील संशोधनातून व्यंकय्या यांनी तयार केलेला लाल आणि हिरवा पट्टा असलेला झेंडा १९२१ला विजयवाडा येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात दाखविला. यानंतरच देशातील काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिवेशनांमध्ये दोन रंगांचा ध्वज वापरण्यात आला होता. परंतु त्यावेळी काँग्रेसने या ध्वजाला अधिकृतपणे मान्यता दिली नव्हती. प्रगती आणि सामान्य माणसाचे प्रतीक असलेल्या चाकाचा समावेश या ध्वजात करण्यात आला. त्यानंतर गांधीजींच्या सूचनेनुसार व्यंकय्या यांनी शांततेचे प्रतीक असलेला पांढरा रंग राष्ट्रध्वजामध्ये समाविष्ट केला. १९३१ मध्ये कराची येथील अखिल भारतीय परिषदेत भगवा, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांनी बनलेला ध्वज काँग्रेसने एकमताने स्वीकारला. नंतर तिरंग्याच्या मध्यभागी फिरकीची जागा अशोकचक्राने घेतली.

असे झाले ध्वजामध्ये बदल

१. पहिला ध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी कोलकात्यातील पारशी बागान (आताचा 'ग्रीन पार्क') येथे हिरवा, पिवळा आणि लाल या तीन रंगांचे पट्टे असलेला ध्वज फडकविण्यात आला होता. त्यातील हिरव्या पट्टीवर ८ पांढरी कमळाची फुले, पिवळ्या पट्टीवर गडद निळ्या रंगात 'वंदे मातरम' लिहिलेले आणि लाल पट्टीवर डावीकडील सूर्य आणि उजवीकडील चंद्रकोर पांढऱ्या रंगात बनवण्यात आली होती.

२. दुसरा ध्वज २२ ऑगस्ट १९०७ रोजी केवळ भारतातच नव्हे तर जर्मनीच्या स्टटगार्टमध्ये मॅडम कामा यांनी फडकवला होता. यामध्ये हिरव्या पट्ट्यावर ८ फुललेली कमळाची फुले, मधल्या पिवळ्या पट्टीवर 'वंदे मातरम' कोरलेले आणि सर्वांत खालच्या लालपट्टीवर डावीकडे सूर्य आणि उजवीकडे चंद्र होता.

३. तिसरा ध्वज डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 'स्वराज्य चळवळी' दरम्यान फडकवला होता. यात ५ लाल आणि ४ हिरवे पट्टे , ७ तारे म्हणजे 'सप्तर्षी' डाव्या बाजूला ‘युनियन जॅक’ही कोरलेला होता.

४. चौथा ध्वज १९२१ मध्ये पांढरा, हिरवा आणि भगवा रंगाचा पट्टा आणि मध्यभागी निळा चरखा (कताईचे चाक) असलेला ध्वज गांधीजींनी विजयवाडा येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत स्वीकारला. हा ध्वज दहा वर्षे सर्वांसाठी वैध राहिला.

५. पाचवा ध्वज २२ जुलै १९४७ रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या सात सदस्यांनी भगवा, पांढरा आणि हिरवा असे पट्टे आणि मध्यभागी निळे 'अशोक चक्र' असलेला ध्वज पंडित जवाहरलाल नेहरूंमार्फत संविधान सभेपुढे सादर केला. संविधान सभेने हा ध्वज स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला होता. तोच आजचा आपला तिरंगा राष्ट्रध्वज होय.