शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

प्रेमप्रकरणातून तरुणाचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:26 IST

प्रेमप्रकरणातून मित्रांचे कारमधून अपहरण करून नेणाऱ्या दोन जणांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक करून अपहत तरूणाची मुक्तता केली.

औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून मित्रांचे कारमधून अपहरण करून नेणाऱ्या दोन जणांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक करून अपहत तरूणाची मुक्तता केली. हे अपहरण आज १ आॅक्टोबर रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास उस्मानपुरा येथील गोपाल टी जवळ घडले. अमोल दिलीप अंभोरे (वय २६,रा. भगतसिंगनगर, मयुरपार्क) आणि सागर विष्णू खंडागळे (वय २४,रा. सातारा परिसर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. भावेश संजय सोनवणे (वय २२) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अक्षय परमानंद मेहता याने या अपहरणाची उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, भावेशला अमोल आणि विष्णू यांनी आज सकाळी क्रांती चौकात भेटण्यास बोलावले होते. यावर भावेश अक्षयला सोबत घेऊन क्रांती चौकात गेला. येथे अमोल आणि विष्णू आले असता त्यांनी भावेशाकडून त्याचा मोबाईल घेतला. अमोलने भावेश आणि त्याच्या माजी प्रेयसीची चॅटींग मोबाईलमध्ये पाहिली. ती सर्व चॅटींग डिलीट करत त्याने अक्षयला तिथेच थांबवत भावेशला कारमध्ये बसवून तेथून अज्ञातस्थळी नेले.

या प्रकारानंतर अक्षयने भावेशला फोन लावला असता तो बंद असल्याचे कळले. यामुळे अक्षयने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी झटपट कारवाई करून अपहरणकर्त्यांना निरालाबाजार येथे पकडले. आरोपींच्या ताब्यातून भावेशची मुक्तता करून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादKidnappingअपहरणArrestअटक