शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

औरंगाबादेतील आणखी दोन व्हर्टिकल गार्डनचे काम पूर्ण; विविध चौकात कारंजेही होणार सुरु

By मुजीब देवणीकर | Updated: August 30, 2022 18:34 IST

हवेच्या शुद्धतेसाठी या निधीचा वापर करावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने शहरात आठ ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत औरंगाबाद शहरात आठ ठिकाणी आधुनिक व्हर्टिकल गार्डन उभारण्यात येत आहेत. शहरातील पहिले उद्यान सिद्धार्थ उद्यानासमोरील नाल्यावर उभारण्यात आले. यात आणखी दोन उद्यानांची भर पडली असून, मनपा मुख्यालयाजवळ वज्द मेमोरिअल हॉलजवळ आणि महावीर चौकातील काम पूर्ण झाल्याचे उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या १५ वित्त आयोगांतर्गत मनपाला निधी मिळाला. हवेच्या शुद्धतेसाठी या निधीचा वापर करावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने शहरात आठ ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या देखरेखीखाली शहरात विविध ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्यात येत आहेत. महापालिका मुख्यालयाजवळ वज्द मेमोरिअल हॉलच्या बाजूला असलेल्या नाल्यावर व्हर्टिकल गार्डनचे काम पूर्ण करण्यात आले. तसेच महावीर चौकातील कामदेखील पूर्ण झाले. यापूर्वी सिद्धार्थ उद्यानाशेजारी व्हर्टिकल गार्डनचे काम पूर्ण झालेले आहे. नागेश्वरवाडी, सरस्वती भुवन महाविद्यालय मार्ग, सिडको बस स्थानक, जुना मोंढा, औरंगपुरा व अन्य ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्यात येत आहेत. या उद्यानांमुळे हवा शुद्ध होण्यास मदत होईल तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडेल. शहरातील नागरिक आणि पर्यटक यांच्या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वाचे आहेत.

विविध चौकात कारंजेहवेतील धुळीचे कण कमी व्हावेत यासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत आठ ठिकाणी कारंजे बसविले जात आहेत. यातील महावीर चौक व दमडी महल येथील काम पूर्ण होत आले असून, अन्य ठिकाणचे काम प्रगतिपथावर असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

देखभाल दुरुस्ती अशक्यसिद्धार्थ उद्यानासमोरील पहिले व्हर्टिकल गार्डनची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चाचली आहे. अत्यंत छोट्या-छोट्या प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये अत्यंत नाजूक स्वरूपाची झाडे लावली आहेत. या कुंड्यांना पाणी मिळत नसल्याने ती पिवळी पडत आहेत. काही ठिकाणी कुंड्यांवरील जाळीही गायब झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाenvironmentपर्यावरण