शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

औरंगाबादेत आतापर्यंत दोन अल्पसंख्याक उमेदवारांना यश; एक शायर तर दूसरा पत्रकार

By मुजीब देवणीकर | Updated: April 25, 2024 18:49 IST

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, माजी मंत्री अब्दुल अजीम यांनाही अपयश

छत्रपती संभाजीनगर : दख्खनचा प्रदेश अशी कधी काळी ओळख असलेल्या मराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणजे औरंगाबाद होय. या जिल्ह्याने आजपर्यंत दोनच अल्पसंख्याक खासदार दिले. १९८० मध्ये विख्यात लेखक, शायर काझी सलीम काँग्रेसच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. त्यानंतर, अल्पसंख्याक खासदारासाठी या मतदारसंघाला तब्बल ३९ वर्षे वाट पाहावी लागली. २०१९ मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले.

दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी १९९९ मध्ये नशीब आजमावले. त्यापूर्वी माजी मंत्री अब्दुल अजीम यांनीही काँग्रेसकडून प्रयत्न केले, पण दोन्ही नेत्यांना यश आले नाही.

१९८० मध्ये काझी सलीम १९६२ ते १९७२ पर्यंत विधान परिषदेत नेतृत्व केलेले प्रख्यात शायर काझी सलीम यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. १९८० मध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली. नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले सलीम यांनी एकहाती विजय मिळविला. त्यांना तब्बल १ लाख ६९ हजार ७२३, तर त्यांचे प्रतिस्पर्धी डी. एस. पाटील यांना ८५ हजार ९७५ मते पडली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अल्पसंख्याक उमेदवार निवडून आला होता. मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत होता.

१९८४ मध्ये अल्पसंख्याक उमेदवार, पण... १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री अब्दुल अजीम यांना काँग्रेसने संधी दिली. अजीम यांना मोठ्या मताधिक्याने पराभव पचवावा लागला. कारण शरद पवार यांच्या एस. काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावकर मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. अजीम यांना १ लाख ५३ हजार, तर पाटील यांना तब्बल २ लाख ४६ हजार मते पडली होती.

१९८९ मध्ये मराठा कार्डमागील निवडणुकीचा अनुभव डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने १९८९ मध्ये मराठा उमेदवार म्हणून सुरेश पाटील यांना मैदानात उतरविले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांना शिवसेनेने पाठिंबा दर्शविला होता. सावे ३ लाख २२ हजार मते मिळवून विजयी झाले. सुरेश पाटील यांना ३ लाख ४ हजार मते मिळाली. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला शिवसेनेने सुरुंग लावला.

१९९१ पर्यंत सेनेची पाळेमुळे घट्ट १९९१च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोहन देशमुख यांच्यावर डाव खेळला, पण हा प्रयोगही यशस्वी झाला नाही. कारण शिवसेनेने आपली पाळेमुळे अधिक घट्ट केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा सुरू झाला होता. या निवडणुकीतही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मोरेश्वर सावे २ लाख ३५ हजार मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी मोहन देशमुख यांना १ लाख ४५ हजार मते मिळाली होती.

१९९९ मध्ये माजी मुख्यमंत्र्यांची एन्ट्रीमराठवाड्याच्या राजधानीतील मुस्लिम मतांची आकडेवारी लक्षात घेऊन काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनेही आपला उमेदवार बदलत चंद्रकांत खैरे यांना मैदानात उतरविले. अंतुले यांना ३ लाख २५ हजार मतांवर समाधान मानावे लागले.खैरे यांनी ३ लाख ८१ हजार मते मिळवून पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश केला.

२०१९ मध्ये अल्पसंख्याक खासदारमागील दोन दशकांत काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार देण्याची हिंमत दाखविली नाही. २०१४ मध्ये औरंगाबादेत एमआयएमची एन्ट्री झाली होती. आमदार असलेले इम्तियाज जलील यांनी लोकसभेसाठी उडी घेतली. जलील यांना ३ लाख ८९ हजार, तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी खा. चंद्रकांत खैरे यांना ३ लाख ८४ हजार मते मिळाली. ४ हजार ४९२ मतांनी जलील निवडून आले. ३९ वर्षांनंतर जलील यांनी अल्पसंख्याक खासदाराचा अनुशेष भरून काढला.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Imtiaz Jalilइम्तियाज जलील