शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

राज्यात वर्ग- १ ते ४ ची दोन लाख पदे रिक्त; सरकारी योजनांच्या अंमबजावणीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:26 IST

राज्यात श्रेणी-१ ची १३ हजार, श्रेणी- २ ची २५ हजार, वर्ग- ३ ची १ लाख ५ हजार तर वर्ग -४ ची ४७ हजार पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देराजपत्रित अधिकारी महासंघाची माहिती सेवानिवृत्तीमुळे दरवर्षी ३ टक्के जागा रिक्त होत आहेत. कंत्राटी पद्धतीने किंवा खाजगी पद्धतीने नोकरभरती केली जात आहे.

औरंगाबाद : राज्य सरकारच्या विविध विभागांतील श्रेणी-१ ते चतुर्थ श्रेणीमधील एकूण ७ लाख पदांपैकी तब्बल १ लाख १४ हजार पदे रिक्त आहेत. ही पदे वर्षानुवर्षे भरली जात नसल्याने जनतेची कामे करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. कोणत्याही सरकारी योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे पूर्ण करणे अवघड झाले आहे. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. यामुळे कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होत आहे. जनतेच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ही रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी येथे केली. 

महासंघाच्या कार्यसंस्कृतीवरील दोनदिवसीय परिषदेच्या समारोपासाठी ते शहरात आले होते. त्यानंतर पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, आम्ही राज्य सरकारचे हात आहोत आणि सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी आम्ही मनापासून काम करीत आहोत. सरकारच्या धोरणानुसार लोकांना चांगल्या आणि दर्जेदार सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. परंतु  सुमारे २ लाख रिक्त पदे वर्षानुवर्षे भरली जात नसल्याने त्याचा परिणाम सेवेवर होत आहे. यामुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कारभार वाढला आहे. त्यामुळे ताणतणाव आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे. दैनंदिन कामात अधिकाऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.

राज्यात श्रेणी-१ ची १३ हजार, श्रेणी- २ ची २५ हजार, वर्ग- ३ ची १ लाख ५ हजार तर वर्ग -४ ची ४७ हजार पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तीमुळे दरवर्षी ३ टक्के जागा रिक्त होत आहेत. कंत्राटी पद्धतीने किंवा खाजगी पद्धतीने नोकरभरती केली जात आहे. मात्र, त्यामुळे कामात सुसूत्रता राहत नाही. राज्य सरकारने रिक्त पदे भरली तर कामकाजात सुसूत्रता येऊन सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल, यावर देसाई यांनी भर दिला. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून सरसकट ६० वर्षे करण्यात यावे. तसेच ५ दिवसांचा आठवडा करावा. त्याऐवजी रोज ४५ मिनिटे जास्त काम करण्यास संघटनेची सहमती आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले. या परिषदेत महासंघाचे सरचिटणीस रत्नाकर पेडगावकर, सहचिटणीस उद्धव वाघमारे आदी पदाधिकारी हजर होते.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना कडक शिक्षा द्याअधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारापासून दूर राहावे, असे आवाहन महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार जी. डी. कुलथे यांनी केले. खटल्यानंतर भ्रष्टाचारात दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांना कडक शिक्षा देण्याचे त्यांनी सरकारला सूचना केल्या.  भ्रष्टाचाराचे खटले जलदगती न्यायालयात घेण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थीEmployeeकर्मचारी